शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

पाकिस्तानने कारवाई केल्यास चोख प्रत्युत्तर - रविशंकर प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 1:27 PM

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व अन्य नेत्यांच्या इशाऱ्यांना प्रतिसाद देणार नाही, पण पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ असे प्रतिपादन केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले.

ठळक मुद्देराज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अ.भा. संमेलनास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व अन्य नेत्यांच्या इशाऱ्यांना प्रतिसाद देणार नाही, पण पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ असे प्रतिपादन केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. भारत स्वत:ची सुरक्षा करण्यास पूर्णपणे सक्षम आहे असे सांगून आर्टिकल 370 रद्द करण्याचा निर्णय काश्मिरी जनतेच्या भल्यासाठी घेण्यात आला आहे. यात देशाचेही हित आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनाला शनिवारपासून सुरुवात झाली. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होत आहेत. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला पहिल्यांदाच मिळाले आहे.वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित या संमेलनाचे शनिवारी सकाळी केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामना, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग, न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.रविवारी दुपारी १२.१५ वाजता समारोपीय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे प्रधान न्यायमूर्ती रंजन गोगोई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.उद्घाटन कार्यक्रमानंतर राज्य विधी सेवा प्राधिकरणे आणि उच्च न्यायालय विधी सेवा समित्यांचे अध्यक्ष व सचिव यांच्या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत न्यायव्यवस्था अधिक प्रभावी करणे, समाजातील गरजू व्यक्तींना नि:शुल्क व सक्षम विधी सेवा उपलब्ध करून देणे, कारागृहात विधी सेवा, गुन्हे पीडितांना भरपाई, पयार्यी वाद निवारण यंत्रणा इत्यादी मुद्यांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातील.

टॅग्स :Governmentसरकार