शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

कस्तूरचंद पार्कवरच रावण दहन, हेरिटेज कमिटीने दिली चार अटींवर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 11:36 PM

शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हेरीटेज कमिटीने चार अटी घालून परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या ६५ वर्षांपासून येथे आयोजित होणारा दसरा उत्सव या वर्षीही आयोजित  करता येणार आहे.  हेरीटेज कमिटीची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली.

नागपूर, दि. 5 - शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हेरीटेज कमिटीने चार अटी घालून परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या ६५ वर्षांपासून येथे आयोजित होणारा दसरा उत्सव या वर्षीही आयोजित  करता येणार आहे.  हेरीटेज कमिटीची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली. अध्यक्षस्थानी नीरी चे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती होते. कमिटीचे सदस्य पी.एस. पाटनकर, उज्ज्वला चक्रदेव, सुप्रिया थूल, अशोक मोखा यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होेते. हेरिटेज कमिटीने कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाची परवानगी देताना आयोजकांना चार अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे बंधन घातले. कमिटीचे सदस्य अशोक मोखा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, हेरीटेज कमिटी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विरोधात नाही.  सांस्कृतिक कार्यक्रम देखील हेरिटेजचाच एक भाग आहे, असे आमचे मानने आहे. विशेषत: जे सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या अनेक वर्षाापासून सुरू आहेत व ते शहराची ऐतिहासिक परंपरा बनले आहेत, अशा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मार्ग काढण्याचीच कमिटीची भूमिका आहे. कमिटीने रावण दहनाची परवानगी दिली. आता आयोजकांनी अटींचे पालन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  

अशा आहेत अटी

- कस्तूरचंद पार्कच्या मध्य भागात असलेले स्मारक ज्याला बारादरी असे संबोधले जाते, ते जीर्ण होत आहे. त्यामुळे या कुणी स्पर्श करू नये याची काळजी घ्यावी. यासाठी या स्मारकापासून २० फूट अंतरावर  सुरक्षा कवच उभारावे लागेल. 

- कार्यक्रमाच्या आयोजनावेळी केवळ दुचाकींनाच प्रवेश दिला जाईल.  चारचाकी वाहनांमुळे मैदानातील माती खालवर होते व त्यामुळे मैदानाचे नुकसान होते. 

- या स्मारकापासून रावणाचा पुतळा शक्य तेवढ्या लांब असावा तसेच पुतळ्याची उंची स्मारकाच्या किमान दुप्पट असावी. त्यामुळे पुतळ्याचे दहन करताना स्मारकाला नुकसान होणार नाही. 

- अशा आयोजनांमध्ये आतिषबाजी केली जाते. यामुळे प्रदूषण होते. पर्यावरणाचे होणारे हे नुकसान भरून काढण्यासाठी आयोजक सनातन धर्म ययुवक सभेला  कस्तूरचंद पार्कमध्ये वृक्षारोपण करून वर्षभर जतन करावे लागेस. विशेष म्हणजे त्यांनी लावलेले रोपे पुढील वर्षांपर्यंत जगणे आवश्यक आहे.