शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

राऊतांची मुत्सद्देगिरी तर ठाकरेंच्या संघर्षाचा विजय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 22:43 IST

उत्तर नागपुरात नितीन राऊत यांची मुत्सद्देगिरी कामी आली, तर पश्चिम नागपुरात विकास ठाकरे यांच्या संघर्षाला फळ मिळाले. या दोन्ही नेत्यांनी दमदार एन्ट्री करीत ‘काँग्रेस अभी जिंदा है’ हे सिद्ध केले. त्यांच्या विजयाने काँग्रेसची शान राखली गेली.

ठळक मुद्देदमदार एन्ट्रीने राखली काँग्रेसची शान : कार्यकर्त्यांना मिळाली ताकद

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नागपुरात गेल्या दशकापासून भाजपचा बोलबाला आहे. भाजपच्या हेवीवेट नेत्यांचे वास्तव्य व इलेक्शन मॅनेजमेंटमुळे काँग्रेस कोमात गेल्याचे चित्र होते. मात्र, अशाही परिस्थितीत काँग्रेस नेते न खचता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले. उत्तर नागपुरात नितीन राऊत यांची मुत्सद्देगिरी कामी आली, तर पश्चिम नागपुरात विकास ठाकरे यांच्या संघर्षाला फळ मिळाले. या दोन्ही नेत्यांनी दमदार एन्ट्री करीत ‘काँग्रेस अभी जिंदा है’ हे सिद्ध केले. त्यांच्या विजयाने काँग्रेसची शान राखली गेली.गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवापासून नितीन राऊतविकास ठाकरे यांनी धडा घेतला. काहीही झाले तरी सर्वांना सोबत घ्यायचे व एकमेकांच्या विरोधात षड्यंत्र रचायचे नाही, अशी भूमिका घेतली. उत्तर नागपुरात नितीन राऊत रणनीती आखून लढले. राऊत यांचे तिकीट कापण्यासाठी दिल्लीवारी करणाऱ्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना त्यांनी सर्वप्रथम सोबत घेतले. ही लढाई सत्तेची नाही तर विचारांची आहे, हे पटवून दिले. आंबेडकरवादी विचारवंत, साहित्यिक व धर्मगुरुंच्या भेटी घेत त्यांची अप्रत्यक्षपणे मदत मिळविली. डॉ. माने यांच्यासाठी भाजपचे पक्ष संघटन पूर्णपणे कामाला लागले होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा महोत्सवात डॉ. माने हे संघ प्रणाम करतानाचा फोटो व्हायरल झाला. हे चित्र आंबेडकरी मतदारांनी चांगलेच मनावर घेतले. उत्तरमध्ये ज्या दिवशी बसपाने प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांना नागपुरातून उमेदवारी दिली, यामागे राजकीय कट असल्याचे आंबेडकरवादी मतदारांना पटवून देण्यात राऊत यशस्वी झाले. तेथूनच राऊत यांना उघड पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे येथे बसपाला पूर्वीपेक्षा कमी पाठबळ मिळाले. वंचित बहुजन आघाडी देखील निष्प्रभ ठरली.विकास ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षात आपली इमेज सुधारण्यावर भर दिला. जनसंपर्क वाढविला. जीव ओवाळणाºया कार्यकर्त्यांची फळी तयार केली. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे भाजपमध्ये जाणार, त्यांचे भाजपशी सेटिंग झाले आहे, अशा चर्चा पिकल्या. त्यांच्या अवतीभवती असणारी मंडळीही यासाठी आग्रही होती. मात्र, ठाकरे हे सत्तेसोबत वाहून गेले नाही. आमदार नाही झालो तरी चालेल पण एवढी वर्षे सर्वकाही देणाºया काँग्रेस पक्षाशी बेईमान व्हायचे नाही, अशी भूमिका घेतली. हीच भूमिका काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भावली व तोच कार्यकर्ता ठाकरेंच्या विजयाची शपथ घेऊन घराबाहेर पडला. ‘भाऊ’ला आमदार करायचेच, असा निश्चय केला व पूर्णत्वासही नेला. महापालिकेच्या निवडणुकीत जिंकलेले, हरलेले, तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले, पक्ष संघटनेत काम करणारे सारेच एकत्र आण्यात ठाकरे यशस्वी झाले.२०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे संपले, अशा वावड्या हेतूपूरस्सर उठविण्यात आल्या. दोनदा विधानसभेची निवडणूक हरणारा व नगरसेवकही बनू न शकणारा आता काय आमदार बननार, असा मुद्दा समोर करीत विरोधकांनीही प्रचारात ठाकरे यांना लक्ष्य केले. पण ठाकरे हे चार वेळा वेगवेगळ्या प्रभागातून विजयी झाले आहेत, याचा विसर टीकाकारांना पडला होता. ठाकरेंनी अखेरपर्यंत संयम सोडला नाही. उलट समर्थक, कार्यकर्त्यांना धीर दिला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल अशा मोठमोठ्या नेत्यांच्या नागपुरात प्रचारसभा झाल्या. मात्र, ठाकरे यांच्या मतदारसंघात एकही मोठी सभा झाली नाही. सभेत जाणारा वेळ गल्लीबोळात राहणाऱ्या मतदारांपर्यत पोहचण्यासाठी वापरण्याची रणनीती त्यांनी आखली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पडद्यामागे गाठून शांत करण्याची रणनीती भाजप आखत होती. यावेळी ठाकरे यांनी तीच रणनीती वापरली. भाजपमध्ये जाणार म्हणून जे भाजप कार्यकर्ते एकदा संपर्कात आले, त्यांना पुढे दूर जाऊ दिले नाही. त्यांच्या माध्यमातून भाजपची मते पोखरण्यात ठाकरे यशस्वी झाले.गेली अनेक वर्ष ठाकरे यांनी काँग्रेससाठी संघर्ष केला. धरणे, आंदोलने, मोर्चे काढण्यासह नेत्यांच्या सभांसाठी गर्दी जमविण्याचे काम केले. राजकीय आमिषाला अन् दबावाला बळी पडले नाही. काँग्रेसचा ‘हात’ सोडला नाही. शेवटी त्यांच्या संघर्षाला यश मिळाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Rautनितीन राऊतVikas Thakreविकास ठाकरे