शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेशन वाटप बंद, दुकानदारांनी पुकारला संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 20:59 IST

कोरोनाच्या संकटात गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून काम करीत आहेत; परंतु त्यांची साधी दखलही शासनाने घेतली नाही, अशी खंत व्यक्त आम्हालाही कोविड योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी आज सोमवारपासून राज्यभरात संप पुकारत रेशन वितरण बंद केले आहे.

ठळक मुद्देकोविड योद्धा घोषित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटात गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून काम करीत आहेत; परंतु त्यांची साधी दखलही शासनाने घेतली नाही, अशी खंत व्यक्त आम्हालाही कोविड योद्धा म्हणून घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी रेशन दुकानदारांनी आज सोमवारपासून राज्यभरात संप पुकारत रेशन वितरण बंद केले आहे.डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्यासह रेशन दुकानदारही कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांनाही कोविड योद्धा घोषित करून प्रत्येक रेशन दुकानदाराला ५० लाख रुपयांचा विमा मिळावा. रेशन दुकानदारांचे कमिशन खूप कमी आहे. तेव्हा त्यांना चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मानधन देण्यात यावे, ई-पॉस मशीनमध्ये दर महिन्याला बिघाड होतो. त्यामुळे सर्व्हर, नेटची समस्या दूर करावी. कोरोनाचे संकट संपेपर्यंत रेशन दुकानदार किंवा ग्राहकांचे थम्ब घेण्यात येऊ नये आणि प्रति कार्डधारकांना ४ लिटर केरोसिन देण्यात यावे, अशा मागण्या रेशन दुकानदारांनी केल्या आहेत. या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा १ जून पासून रेशन वितरण बंद केले जाईल, असा इशाराही यापूर्वीच देण्यात आला होता. याअंतर्गत आज सोमवारी राज्यभरातील रेशन दुकानदारांनी संप पुकारला. नागपुरात विदर्भ रास्त भाव दुकानदार केरोसीन विक्रेता संघटनेच्या बॅनरअंतर्गत अन्नपुरवठा अधिकारी अनिल सवई यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विभागाबाहेर मागण्यांकडे लक्ष वेधत धरणे दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, उमाशंकर अग्रवाल, प्रफुल्ल भुरा, रितेश अग्रवाल, सुनील जैस, मिलिंद सोनटक्के, राजेश कामडे, सुभाष मुसळे आदी उपस्थित होते.गरीब-गरजूंना फटकाकोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे गरिबांचे जगणे कठीण झाले होते. ते उपाशी राहू नये म्हणून शासनाने त्यांना तीन महिन्यांचे धान्य मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एप्रिल व मे महिन्याचे धान्य वाटप झाले. जून महिन्याचे वाटप व्हायचे आहे. रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आणि त्यांचा संप हा सुरूच राहिला तर गरीब-गरजूंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Strikeसंपfoodअन्न