शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

रतन टाटांचे सोशल मीडियावरील फेक वक्तव्य बारावीच्या प्रश्नपत्रिकेत; इंग्रजीच्या पेपरमध्ये घाेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 07:45 IST

Nagpur News उद्याेगपती रतन टाटा यांच्या नावाने साेशल मीडियामध्ये प्रसारित हाेणारे एक फेक वक्तव्य बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षेतही नमूद केल्याने गाेंधळ उडाला आहे.

संदीप दाभेकर

नागपूर : साेशल मीडियामध्ये काेणतेही विधान महान व्यक्तीच्या नावे प्रसारित करण्याचा प्रकार सर्रासपणे हाेताे. मात्र, हा प्रकार बाेर्डाच्या परीक्षेतही व्हावा, हे आश्चर्यच आहे. उद्याेगपती रतन टाटा यांच्या नावाने साेशल मीडियामध्ये प्रसारित हाेणारे एक फेक वक्तव्य बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षेतही नमूद केल्याने गाेंधळ उडाला आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली. पहिला पेपर इंग्रजीचा हाेता. व्याकरणाच्या अनेक चुकांमुळे चर्चेत असलेला हा पेपर आणखी एका गाेंधळामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध उद्याेगपती रतन टाटा यांच्या नावाचे हे बनावट काेट चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये टाकलेले आहे. प्रश्नपत्रिकेच्या सेक्शन-१ मध्ये दुसरा प्रश्न हा रतन टाटा यांच्याशी संबंधित आहे. या १८ गुणांच्या प्रश्नात टाटा यांच्याबद्दल न पाहिलेला उतारा दिलेला आहे. परीक्षेसाठी प्रश्न निवडण्याचे निकष प्रामाणिक आणि विश्वासार्ह असावेत असा नियम आहे. मात्र, परीक्षेसाठी हा उतारा देण्यापूर्वी योग्य ती दक्षता घेण्यास राज्य शिक्षण मंडळ नियमांना विसरल्याचे दिसते.

‘लाेकमत’ने याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांना ही चूक लक्षात आणून दिली. या मुद्यावर सविस्तर माहिती नसल्याने काही बाेलण्यास गाेसावी यांनी नकार दिला. मात्र, मंडळाच्या नियंत्रण समितीच्या लक्षात ही चूक का आली नाही, असा सवाल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने नामाेल्लेख न करण्याच्या अटीवर सांगितले की, परीक्षेत एखादा उतारा देताना अनेकदा क्राॅसचेक केला जाताे. उतारा घेतलेल्या स्राेताची प्रामाणिकता व विश्वासार्हतेची अनेकदा छाननी केली जाते. त्यामुळे अशा प्रकारचे असत्य साहित्य परीक्षेत घेण्यासाठी बाेर्डाची स्क्रुटिनी समिती जबाबदार आहे. त्यामुळे असत्य विधान असलेला अनाेळखी उतारा परीक्षेत आलाच कसा, हे आश्चर्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

बाेर्डाने नवीन पॅटर्न स्वीकारल्यानंतरची ही पहिली परीक्षा आहे. मात्र, या प्रश्नपत्रिकेत बाेर्ड पॅटर्न पाळला गेला नाही आणि व्याकरणाच्या अनेक चुकाही केल्याचे दिसत असल्याची माहिती नूतन कन्या विद्यालय, भंडाराचे प्रा. नदीम खान यांनी दिली. खान हे इंग्रजीच्या ऑनलाइन प्रकल्पाचे राज्य शैक्षणिक समन्वयक आहेत. फेसबुक, व्हाॅटस्ॲपसारख्या साेशल मीडियावर येणाऱ्या चुकीच्या माहितीवर अनेक जण डाेळे बंद ठेवून विश्वास ठेवतात. मात्र, अशी चुकीची माहिती शिक्षणात येणे हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे जबाबदार प्रशासनाने उतारा निवडण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासणे आवश्यक हाेते, असे मत त्यांनी मांडले.

ते फेक वक्तव्य

हा अनाेळखी उतारा टाटांच्या वक्तव्याने सुरू हाेतो. ‘मी याेग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही. मी आधी निर्णय घेताे आणि नंतर ताे याेग्य करताे’, असे हे वक्तव्य आहे. टाटा यांनी यापूर्वी असे काेणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्या बाेलण्याने तुम्ही निराश व्हाल; पण हे वक्तव्य फेसबुक किंवा ट्विटरकडून आले आहे. मी कधीही असे वक्तव्य केले नाही, असे सांगणारा टाटा यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटा