शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपूर ग्रामीण भागात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ५३ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 20:41 IST

एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात, असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभरात १०१ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५३ टक्क्यांनी अधिक आहे.

ठळक मुद्देमहिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह : ४९ गुन्हेगार तडीपार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात, असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभरात १०१ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५३ टक्क्यांनी अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे विविध गुन्ह्यांसंदर्भात विचारणा केली होती. नागपूर ग्रामीणमध्ये २०१७ मध्ये दरोडा, बलात्कार, चोरी, खून, विनयभंग इत्यादींचे किती गुन्हे दाखल झाले व किती आत्महत्या झाल्या, यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ग्रामीण भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराचे ५५६ गुन्हे नोंदविण्यात आले. यात बलात्काराच्या १०१ प्रकरणांची नोंद आहे. २०१६ मध्ये हाच आकडा ६६ इतका होता. याशिवाय २०१७ या वर्षभरात विनयभंगाचे २१२ तर अपहरणाचे १४९ गुन्हे दाखल झाले.वर्षभरात ४१ हत्याया कालावधीत ग्रामीण भागात ४१ हत्या झाल्या. जबरी चोरीच्या ६२ प्रकरणांची नोंद झाली तर ८ ठिकाणी दरोडे पडले. दंगा पसरविण्यासाठी ८९ गुन्हे दाखल झाले.दिवसाला एक आत्महत्याजिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात थोड्याथोडक्या नव्हे तर ३४९ नागरिकांनी विविध कारणांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. सरासरी प्रत्येक महिन्याला २९ आत्महत्यांची नोंद झाली. ग्रामीण भागात आत्महत्यांचे प्रमाण कमी असते, असा समज आहे. मात्र ही आकडेवारी निश्चितच विचार करायला लावणारी आहे.तीन गुन्हेगारांवर मोक्का२०१७ या वर्षभरात पोलिसांनी ४९ गुन्हेगारांना तडीपार केले तर ३ गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला. या कालावधीत खुनाच्या गुन्ह्यांत ७३, बलात्काराच्या गुन्ह्यांत ९७ तर दरोड्याच्या गुन्ह्यांतील ३१ आरोपींना अटक झाली. दंग्यांच्या ८९ प्रकरणांत ३२४ आणि विनयभंगाच्या आरोपाखाली २१८ जणांना अटक झाली.

 

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा