शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपूर ग्रामीण भागात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ५३ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 20:41 IST

एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात, असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभरात १०१ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५३ टक्क्यांनी अधिक आहे.

ठळक मुद्देमहिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह : ४९ गुन्हेगार तडीपार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात, असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभरात १०१ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५३ टक्क्यांनी अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे विविध गुन्ह्यांसंदर्भात विचारणा केली होती. नागपूर ग्रामीणमध्ये २०१७ मध्ये दरोडा, बलात्कार, चोरी, खून, विनयभंग इत्यादींचे किती गुन्हे दाखल झाले व किती आत्महत्या झाल्या, यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ग्रामीण भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराचे ५५६ गुन्हे नोंदविण्यात आले. यात बलात्काराच्या १०१ प्रकरणांची नोंद आहे. २०१६ मध्ये हाच आकडा ६६ इतका होता. याशिवाय २०१७ या वर्षभरात विनयभंगाचे २१२ तर अपहरणाचे १४९ गुन्हे दाखल झाले.वर्षभरात ४१ हत्याया कालावधीत ग्रामीण भागात ४१ हत्या झाल्या. जबरी चोरीच्या ६२ प्रकरणांची नोंद झाली तर ८ ठिकाणी दरोडे पडले. दंगा पसरविण्यासाठी ८९ गुन्हे दाखल झाले.दिवसाला एक आत्महत्याजिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात थोड्याथोडक्या नव्हे तर ३४९ नागरिकांनी विविध कारणांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. सरासरी प्रत्येक महिन्याला २९ आत्महत्यांची नोंद झाली. ग्रामीण भागात आत्महत्यांचे प्रमाण कमी असते, असा समज आहे. मात्र ही आकडेवारी निश्चितच विचार करायला लावणारी आहे.तीन गुन्हेगारांवर मोक्का२०१७ या वर्षभरात पोलिसांनी ४९ गुन्हेगारांना तडीपार केले तर ३ गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला. या कालावधीत खुनाच्या गुन्ह्यांत ७३, बलात्काराच्या गुन्ह्यांत ९७ तर दरोड्याच्या गुन्ह्यांतील ३१ आरोपींना अटक झाली. दंग्यांच्या ८९ प्रकरणांत ३२४ आणि विनयभंगाच्या आरोपाखाली २१८ जणांना अटक झाली.

 

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा