शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव : नागपुरात पाच कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 20:14 IST

यावर्षी होळीत नागपुरात ठोक बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली. यंदा लोकांनी भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला.

ठळक मुद्दे चीनमधून आयात बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी चीनची खेळणी आणि पिचकाऱ्यांवर जास्त अबकारी शुल्क आकारल्याने आयात कमी झाली आहे. शिवाय यावर्षी कोरोना विषाणूमुळे आयात जवळपास बंद झाली. त्यामुळे भारतात या उद्योगात पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. यावर्षी होळीत नागपुरात ठोक बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली. यंदा लोकांनी भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला.केंद्र सरकारने कस्टम पॉलिसी लागू करण्याआधी देशातील बाजारपेठांमध्ये भारतीय बनावटीच्या ४० टक्के आणि ६० टक्के चिनी खेळणी आणि पिचकाऱ्यांची विक्री व्हायची. पण गेल्या वर्षीपर्यंत भारतीय बनावटीच्या मालांनी ७० टक्के बाजारपेठ काबीज केली. यावर्षी ९५ टक्के भारतीय मालाची विक्री झाली. तीन महिन्यांपूर्वी काही विक्रेत्यांनी चीनमधून मागविलेल्या ५ टक्के पिचकाऱ्यांची विक्री झाल्याची माहिती इतवारी जनरल मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक सिंघवी यांनी दिली.दरवर्षी नवीन पिचकारी खरेदीची भारतीय लोकांची मानसिकता असल्याने यंदाही लोकांनी उत्साहात खरेदी केली. जास्त किमतीच्या कॅप्सूल आणि टॅन्कला जास्त मागणी होती. सिंघवी म्हणाले, भारतीय बनावटीची खेळणी आणि पिचकाऱ्यांची मागणी देशांतर्गत वाढल्याने दिल्ली, गुडगाव, मुंबई येथील उत्पादकांनी मालाच्या दर्जात सुधारणा केली. स्पर्धा होऊ लागल्याने चिनी मालाच्या किमतीतच भारतीय माल ग्राहकांना मिळू लागला. केंद्र सरकारच्या धोरणामुळे चीनमधून या मालाची आयात करणे कठीण झाले. त्यामुळे देशांतर्गत उद्योग वाढले असून, रोजगारातही वाढ झाली आहे.रिटेल व्यवसायावर थोडा फार परिणामयावर्षी कोरोना व्हायरसचा परिणाम ठोक व्यवसायाऐवजी रिटेल व्यवसायावर झाला. होळीचा व्यवसाय दोन महिन्यांपूर्वी सुरू होतो. ठोक विक्रेते होळीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा संग्रह करतात. अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच पिचकाऱ्या आणि अन्य वस्तू मागविणे सुरू केले. त्यानुसार रिटेल व्यावसायिकांनीही होळीच्या १५ दिवसांपूर्वी मालाची खरेदी केली. पण दोन-चार दिवसांपूर्वी होळी सण एकत्रितरीत्या साजरा करण्यावर निर्बंध आल्याने रिटेलमधून पिचकाऱ्यांची विक्री कमी झाली. त्याचा परिणाम होळीच्या व्यवसायावर झाल्याचे सिंघवी म्हणाले.

टॅग्स :Holiहोळीbusinessव्यवसाय