शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव : नागपुरात पाच कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 20:14 IST

यावर्षी होळीत नागपुरात ठोक बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली. यंदा लोकांनी भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला.

ठळक मुद्दे चीनमधून आयात बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी चीनची खेळणी आणि पिचकाऱ्यांवर जास्त अबकारी शुल्क आकारल्याने आयात कमी झाली आहे. शिवाय यावर्षी कोरोना विषाणूमुळे आयात जवळपास बंद झाली. त्यामुळे भारतात या उद्योगात पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. यावर्षी होळीत नागपुरात ठोक बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली. यंदा लोकांनी भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला.केंद्र सरकारने कस्टम पॉलिसी लागू करण्याआधी देशातील बाजारपेठांमध्ये भारतीय बनावटीच्या ४० टक्के आणि ६० टक्के चिनी खेळणी आणि पिचकाऱ्यांची विक्री व्हायची. पण गेल्या वर्षीपर्यंत भारतीय बनावटीच्या मालांनी ७० टक्के बाजारपेठ काबीज केली. यावर्षी ९५ टक्के भारतीय मालाची विक्री झाली. तीन महिन्यांपूर्वी काही विक्रेत्यांनी चीनमधून मागविलेल्या ५ टक्के पिचकाऱ्यांची विक्री झाल्याची माहिती इतवारी जनरल मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक सिंघवी यांनी दिली.दरवर्षी नवीन पिचकारी खरेदीची भारतीय लोकांची मानसिकता असल्याने यंदाही लोकांनी उत्साहात खरेदी केली. जास्त किमतीच्या कॅप्सूल आणि टॅन्कला जास्त मागणी होती. सिंघवी म्हणाले, भारतीय बनावटीची खेळणी आणि पिचकाऱ्यांची मागणी देशांतर्गत वाढल्याने दिल्ली, गुडगाव, मुंबई येथील उत्पादकांनी मालाच्या दर्जात सुधारणा केली. स्पर्धा होऊ लागल्याने चिनी मालाच्या किमतीतच भारतीय माल ग्राहकांना मिळू लागला. केंद्र सरकारच्या धोरणामुळे चीनमधून या मालाची आयात करणे कठीण झाले. त्यामुळे देशांतर्गत उद्योग वाढले असून, रोजगारातही वाढ झाली आहे.रिटेल व्यवसायावर थोडा फार परिणामयावर्षी कोरोना व्हायरसचा परिणाम ठोक व्यवसायाऐवजी रिटेल व्यवसायावर झाला. होळीचा व्यवसाय दोन महिन्यांपूर्वी सुरू होतो. ठोक विक्रेते होळीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा संग्रह करतात. अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच पिचकाऱ्या आणि अन्य वस्तू मागविणे सुरू केले. त्यानुसार रिटेल व्यावसायिकांनीही होळीच्या १५ दिवसांपूर्वी मालाची खरेदी केली. पण दोन-चार दिवसांपूर्वी होळी सण एकत्रितरीत्या साजरा करण्यावर निर्बंध आल्याने रिटेलमधून पिचकाऱ्यांची विक्री कमी झाली. त्याचा परिणाम होळीच्या व्यवसायावर झाल्याचे सिंघवी म्हणाले.

टॅग्स :Holiहोळीbusinessव्यवसाय