शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षानंतरही अयोध्येतील राम मंदिर पाडले जाऊ शकते, तोगडियांनी सांगितलं 'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 11:45 IST

देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले

नागपूर - विश्व हिंदू परिषदेमधून बाहेर पडल्यानंतर प्रविण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचेची स्थापन केली. त्या माध्यमातून ते आपले कार्य पुढे नेत आहेत. आज प्रवीण तोगडिया विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात पत्रकार परिषद घेत तोगडिया म्हणाले की, अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर ५० वर्षांनंतरही पाडले जाऊ शकते. याचे कारण म्हणजे देशाची असतुंलन असलेली लोकसंख्या होय. 

देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले. सध्या देशात भाजपचे बहुमताचे सरकार आहे आणि अद्यापही लोकसभा निवडणुकांना एक वर्ष बाकी आहे. या एका वर्षात केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणावा. तसेच, काशी व मथुरा मंदिर बनवण्याचा कायदा देखील सरकारने केला पाहिजे. अॅन्टी लव जिहाद हा कायदा बनला पाहिजे, अशी या सरकारला आपली विनंती असल्याचेही प्रविण तोगडिया यांनी म्हटले. ज्या देशात धर्मासाठी काम करणारे लोक सन्मानित होत नाहीत त्या देशाचे कधीच कल्याण होत नाही. जनसंख्येचे असंतुलन रोखले नाही तर, ५० वर्षानंतर ही बनवलेल्या राम मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो. 

फडणवीसांच्या घरी जाऊन कायदा बनवा

महाराष्ट्रातील लव्ह जिहाद आणि धर्मांतरणच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांत आंदोलन व मोर्चे निघाले आहेत. हिंदूंच्या या आंदोलनावर बोलताना तोगडिया यांनी सरकारला लक्ष्य केलं. सरकार नाही आणि आंदोलन झाले तर समजू शकतो. पण, सत्तेत असून आंदोलन करतात ही हास्यास्पद बाब आहे. महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन कायदा होऊ शकतो. उपमुख्यमंत्री यांच्या घरी बसुन कायदा बनवा आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असे म्हणत तोगडिया यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. 

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या

राम मंदिरासाठी कारसेवकांचे नेतृत्व करणारे अशोक सिंघल, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, गोरख पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथ, अयोध्येतील रामचंद्र परमहंस, कोठारी बंधू या सर्वांना भारताने केंद्र सरकाने भारत रत्न देऊन सन्मानित करायला हवे, अशी मागणी तोगडिया यांनी केली. 

टॅग्स :HinduहिंदूnagpurनागपूरLove Jihadलव्ह जिहादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRam Mandirराम मंदिर