शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

५० वर्षानंतरही अयोध्येतील राम मंदिर पाडले जाऊ शकते, तोगडियांनी सांगितलं 'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 11:45 IST

देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले

नागपूर - विश्व हिंदू परिषदेमधून बाहेर पडल्यानंतर प्रविण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचेची स्थापन केली. त्या माध्यमातून ते आपले कार्य पुढे नेत आहेत. आज प्रवीण तोगडिया विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात पत्रकार परिषद घेत तोगडिया म्हणाले की, अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर ५० वर्षांनंतरही पाडले जाऊ शकते. याचे कारण म्हणजे देशाची असतुंलन असलेली लोकसंख्या होय. 

देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले. सध्या देशात भाजपचे बहुमताचे सरकार आहे आणि अद्यापही लोकसभा निवडणुकांना एक वर्ष बाकी आहे. या एका वर्षात केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणावा. तसेच, काशी व मथुरा मंदिर बनवण्याचा कायदा देखील सरकारने केला पाहिजे. अॅन्टी लव जिहाद हा कायदा बनला पाहिजे, अशी या सरकारला आपली विनंती असल्याचेही प्रविण तोगडिया यांनी म्हटले. ज्या देशात धर्मासाठी काम करणारे लोक सन्मानित होत नाहीत त्या देशाचे कधीच कल्याण होत नाही. जनसंख्येचे असंतुलन रोखले नाही तर, ५० वर्षानंतर ही बनवलेल्या राम मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो. 

फडणवीसांच्या घरी जाऊन कायदा बनवा

महाराष्ट्रातील लव्ह जिहाद आणि धर्मांतरणच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांत आंदोलन व मोर्चे निघाले आहेत. हिंदूंच्या या आंदोलनावर बोलताना तोगडिया यांनी सरकारला लक्ष्य केलं. सरकार नाही आणि आंदोलन झाले तर समजू शकतो. पण, सत्तेत असून आंदोलन करतात ही हास्यास्पद बाब आहे. महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन कायदा होऊ शकतो. उपमुख्यमंत्री यांच्या घरी बसुन कायदा बनवा आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असे म्हणत तोगडिया यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. 

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या

राम मंदिरासाठी कारसेवकांचे नेतृत्व करणारे अशोक सिंघल, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, गोरख पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथ, अयोध्येतील रामचंद्र परमहंस, कोठारी बंधू या सर्वांना भारताने केंद्र सरकाने भारत रत्न देऊन सन्मानित करायला हवे, अशी मागणी तोगडिया यांनी केली. 

टॅग्स :HinduहिंदूnagpurनागपूरLove Jihadलव्ह जिहादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRam Mandirराम मंदिर