शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेत घोळ

By admin | Updated: April 8, 2017 02:39 IST

शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे दरवर्षी दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या अनुसूचित जाती,

पुरस्कार दिल्याचा समाजकल्याणचा दावा : विद्यार्थी म्हणतात पुरस्कार मिळालेच नाही आशिष दुबे   नागपूर शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे दरवर्षी दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यासाठी शासनातर्फे विभागनिहाय निधीची तरतूद करण्यात येते. परंतु २००७ पासून हे पुरस्कार दिलेच गेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. निधीची तरतूद केली असताना एकाही विद्यार्थ्याला पुरस्कार देण्यात आला नाही. मात्र समाजकल्याण विभागाने पुरस्कार दिला असल्याचा दावा केला आहे. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी केलेला दावा योग्य असले तर, पुरस्काराची राशी गेली कुठे?, कुणाला पुरस्कार दिले, हे प्रश्न अनुत्तरित आहे. २०१६ च्या दहावीच्या परीक्षेत पुण्याची साक्षी रूपनवार ९७.६०, चिपळूनची आदिती नलवाडे ९७.२०, नागपूरचे हर्षद इंगोले ९८.४०, राजवी आंबुलकर ९८.६०, जान्हवी वासमवार ९८.२० टक्के गुण घेत राज्यात, विभागात, शहरात गुणवत्ता यादीत झळकले होते. राज्यभरात असे अनेक विद्यार्थी आहेत, जे बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले आणि शासनाने २००३ मध्ये सुरू केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी पात्र ठरले. समाजकल्याण विभागाचा दावा आहे की या विद्यार्थ्यांना त्यांचे पुरस्कार चेकमार्फत देण्यात आले. परंतु लोकमतने समाजकल्याण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची तपासणी केली असता, विभागाचा दावा खोटा ठरला. लोकमतने या पुरस्कारासंदर्भात विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. पालकांनी असा कुठलाही पुरस्कार विद्यार्थ्यांना मिळाला नसल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे ज्या पालकांना या पुरस्कारासंदर्भात माहिती आहे, त्यांनी समाजकल्याण विभागाचे आयुक्त, उपायुक्त व राज्य शिक्षण मंडळालासुद्धा पत्र लिहिले. परंतु त्याचेही उत्तर मिळाले नाही. यासंदर्भात समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त व्ही. एम. वाकुडकर यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की आम्ही समारोह आयोजित केला नव्हता, मात्र पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चेकद्वारे राशी पाठविली होती. परंतु केव्हा पाठविली? कुणाला पाठविली? याचे उत्तर त्यांनी दिले नाही. विभागीय उपायुक्त माधव झोड यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, मला याविषयी माहिती नाही. काय आहे योजना राज्यस्तरावर सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांना २.५ लाख रुपये पुरस्कार रूपात प्रदान करण्यात येते. बोर्डस्तरावर प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला १ लाख रुपये, विभागीय स्तरावर प्रथम येणाऱ्याला ५० हजार, जिल्हा स्तरावर प्रथम येणाऱ्याला २५ हजार, तहसीलवर १० हजार व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रथम येणाऱ्याला ५ हजार रुपये पुरस्कार देण्याची योजनेत तरतूद आहे. पुरस्कार देण्याची जबाबदारी समाजकल्याण विभागाची आहे. निकाल लागल्यानंतर किमान सहा महिन्याच्या आत विशेष समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांना सन्मानित करणे आवश्यक आहे. समारंभ व अन्य आयोजनासाठी विभागीय कार्यालयाला वर्षाला सहा लाख रुपये दिले जातात. पुरस्काराची राशी व स्मृती चिन्हांसाठी वेगळा निधी दिला जातो. २००७ पासून पुरस्कारात अनियमितता सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी राजाभाऊ आंबुलकर म्हणाले की, २००७ पासून राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार देण्यात अनियमितता होत आहे. विद्यार्थ्यांना सरकारच्या जीआर नुसार पुरस्काराची रक्कम मिळालेली नाही. समाजकल्याण विभाग सरकारच्या जीआरचे पालन करीत नाही. यासंदर्भात बोर्ड, समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांना बरीच पत्रे लिहिली आहेत. परंतु कुणाकडूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. २०१६ मध्ये दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या राजवी आंबुलकर हिच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार समाजकल्याण विभागाने पुरस्काराच्या रक्कम स्वत:च पचविल्याची शंका आहे.