शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पावसाची उसंत; धानाला फटका : रोवण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 8:52 PM

जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला तर काही भागात तुरळक पाऊस पडला. हा पाऊस धानाच्या पेरणीसाठी पोषक नसल्याने धानाच्या रोवणीला फटका बसला आहे.

ठळक मुद्देतूर, कपाशीचा पेरा घटला : जिल्ह्यात ९३ टक्के पेरण्या पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला तर काही भागात तुरळक पाऊस पडला. हा पाऊस धानाच्या पेरणीसाठी पोषक नसल्याने धानाच्या रोवणीला फटका बसला आहे. आतापर्यंत नियोजित क्षेत्राच्या ६५ टक्के रोवणी झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ९३ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.जूनमध्येच मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढविला. कोरोनाचे संक्रमण असतानाही आजवर शेतकऱ्यांच्या ९३ टक्क्यावर पेरण्या पूर्ण झाल्या. कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यासाठी खरीपाचे ५ लाख १०० हेक्टरवर नियोजन केले होते. सद्यस्थितीत आजवर ४ लाख ४१ हजार हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची १२१ टक्के पेरणी झाली आहे. यंदा सोयाबीनचे नियोजित क्षेत्र ८५ हजार हेक्टर होते. पण पेरणी १०१६२० हेक्टरवर झाली आहे. तुरीचे क्षेत्र यंदा ६५ हजार हेक्टर नियोजित होते. गेल्यावर्षी तुरीची ५१३६३ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, यंदा त्यात घट होऊन ती ५० हजार ४३९ हेक्टर इतकीच झाली आहे. कपाशीची गेल्यावर्षी बंपर पेरणी म्हणजेच २ लाख ३५ हजार २७५ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा कपाशीचे नियोजित क्षेत्र २ लाख ३५ हजार इतके असतानाही आजवर केवळ २००९३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा, भिवापूर, कुही, उमरेड या तालुक्यात धानाची लागवड होते. पावसाचाच खंड पडल्याने जिल्ह्यात धानाची केवळ ६३ हजार ६२१ हेक्टरवरच रोवणी झाली. यंदा धानाचे नियोजित क्षेत्र ९५ हजार हेक्टर इतके आहे. पऱ्हे तयार आहेत, मात्र पावसामुळे रोवणी रखडली आहे.पेंचच्या पाण्याचा फायदापावसाचा खंड पडल्यामुळे धानाची रोवणी अडचणीत आली आहे. परंतू पेंच प्रकल्पाचे पाणी धान रोवणीसाठी सोडल्यामुळे रामटेक, पारशिवनी, कामठी व मौदा या तालुक्यांना फायदा होणार आहे.मिलिंद शेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती