शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो पुलावरून पावसाच्या पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:08 IST

अजनी चौकातून सोनेगाव पोलीस ठाण्याकडे जाणाºया डबलडेकर पुलावरून पावसाचे पाणी जास्त प्रमाणात रस्त्यावर गळत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

ठळक मुद्देड्रेनेज सिस्टिमचे बांधकाम अपूर्ण : वर्धा मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अजनी चौकातून सोनेगाव पोलीस ठाण्याकडे जाणाºया डबलडेकर पुलावरून पावसाचे पाणी जास्त प्रमाणात रस्त्यावर गळत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. रविवारी आणि सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे महामेट्रोच्या कामाची पोल खुलली आहे. लॉकडाऊनच्या काळात बांधकाम बंद होते. ड्रेनेज सिस्टिमचे काम अपूर्ण असल्यामुळेच पाण्याचा धारा रस्त्यावर पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वर्धा रोडवरील डबलडेकर पूल आॅगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अनलॉकमध्ये पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. पण कामाला अजूनही वेग आलेला नाही. पुलावरून वाहतूक केव्हा सुरू होणार, यावरही अनिश्चितता आहे. बांधकामासोबतच पुलावरून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज सिस्टिमचे कामही अपूर्ण आहे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, याकडे महामेट्रोला लक्ष देण्याची गरज आहे. या कामासाठी वर्धा रोडवर अनेक महिने वाहतूक बंद होती. महामेट्रोच्या कामाला नागरिकांनीही सहकार्य केले. पण महिन्याचे काम वर्षावर जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मेट्रोच्या अन्य पुलावरूनही रस्त्यावर पाण्याच्या धारा वाहत असल्याच्या घटना रविवारी आणि सोमवारी घडल्या आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण होणारवर्धा मार्गावरील डबलडेकर पुलांतर्गत उज्ज्वलनगर येथील पुलाचे काम लॉकडाऊनमुळे अपूर्ण आहे. अनलॉकमध्ये काम सुरू झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पावसाचे पाणी पुलावरून थेट पाईपलाईनद्वारे वाहून जाईल. रस्त्यावर पाणी पडणार नाही. कामाच्या पूर्णत्वानंतर डबलडेकर पूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे.अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन)

टॅग्स :Metroमेट्रोRainपाऊस