शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एप्रिलअखेरपर्यंत राहणार पाऊस; पारा ८.६ अंशाने घसरला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2023 21:46 IST

Nagpur News गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सत्र पुढचे चार दिवस म्हणजे संपूर्ण एप्रिल महिना असेच कायम राहणार आहे.

नागपूर : गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सत्र पुढचे चार दिवस म्हणजे संपूर्ण एप्रिल महिना असेच कायम राहणार आहे. बुधवारी उघडीप दिली; पण ढगांमुळे वातावरणात गारवा हाेता. उन्हाळा असूनही सातत्याने सुरू असलेल्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पारा झपाट्याने खाली घसरत आहे. त्यामुळे सूर्याचे चटके वाटण्याऐवजी गारव्याची जाणीव हाेत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मे महिना येईपर्यंत असाच गारवा राहणार आहे.

२४ तासात १.५ अंशाने खाली घसरला व बुधवारी तापमान ३३.९ अंशावर खाली आले, जे सरासरीपेक्षा ८.६ अंशाने कमी आहे. रात्रीचे तापमानही २१.५ अंशावर आहे, जे सरासरीपेक्षा ४.३ अंशाने खाली आहे. तापमान सातत्याने कमी हाेत असल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून कुलर बंद करावे लागले आहेत. एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस हाेताे; पण त्या दिवसाची संख्या नगण्य असते. यावर्षी मात्र उन्हाळ्यापेक्षा पावसानेच ठाण मांडले आहे. महिन्याचे सुरुवातीचे दिवस पावसात गेले. १० एप्रिलनंतर ऊन वाढले व पारा ४० च्यावर गेला. १९ एप्रिल राेजी ४२ अंश नाेंद झाली, जे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान हाेय. त्यानंतर मात्र उतरती कळा लागली. विशेष म्हणजे, यावर्षी १८ ते २० दिवस ढगाळ वातावरणातच गेले आणि चार ते पाच दिवस वादळ आणि गारपीटीचा तडाखा बसला.

विजांचा कडकडाट राहणारच

यंदा एप्रिलचे तापमान ३३ अंशापर्यंत घसरणे हा दशकभराचा विक्रमच म्हणावा लागेल. कारण दशकभरात एप्रिलचे ऊन दिलासादायक कधी वाटले नाही. २०१६ ते २०१९ आणि २०२२ मध्ये पारा ४५ अंशापर्यंत पाेहाेचला हाेता. २०१३ पासून उरलेल्या वर्षात ताे ४३ व ४४ अंशाच्या सरासरीत हाेता. त्यामुळे यंदाचा एप्रिल महिना नागपूरकरांसाठी दिलासादायक ठरला. दरम्यान, हवामान विभागाने ३० एप्रिलपर्यंत जाेरदार पावसाचा इशारा दिला आहे व त्यापुढचे दाेन दिवस ढगाळ वातावरण व विजांचा कडकडाट हाेण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान