शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नागपूर जिल्ह्यात वादळासह पाऊस; वीज पडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 21:38 IST

Rain with storm सायंकाळी आलेल्या वादळ व पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कहर केला. गुमगाव येथील एका शेळीपालकाचा वीज पडून मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील गावांमधील घरांचे पत्रे आणि छप्पर वादळात उडाले. कोंढाळी तालुक्यालाही वादळासह पावसाने तडाखा दिला. नागपूर शहरासह अन्य तालुक्यांमध्येही वादळासह जोराचा पाऊस आल्याने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले.

ठळक मुद्देकाटोल तालुक्यात घरांचे पत्र उडाले : कोंढाळीतही वादळाचा तडाखा, पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सायंकाळी आलेल्या वादळ व पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कहर केला. गुमगाव येथील एका शेळीपालकाचा वीज पडून मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील गावांमधील घरांचे पत्रे आणि छप्पर वादळात उडाले. कोंढाळी तालुक्यालाही वादळासह पावसाने तडाखा दिला. नागपूर शहरासह अन्य तालुक्यांमध्येही वादळासह जोराचा पाऊस आल्याने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले.

गुमगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी आलेल्या वादळ व पावसात तेथील वाहाब राज मोहम्मद शेटे (६३) यांचा वीज पडून मृत्यू झाला. कोतेवाडा शिवारात ते आपल्या शेळ्यांना चराईसाठी घेऊन गेले असता, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जोरदार वादळ व गडगडाटासह झालेल्या पावसात ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. हेड कॉन्स्टेबल अरविंद घिये, विनोद देशमुख, मंगेश मापारी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविला.

काटोल तालुक्याला सायंकाळी वादळासह पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक घरांचे पत्रे उडाले. यामुळे गावकरी भयभीत झाले होते. वादळात झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या. कोंढाळी तालुक्यातही वादळ व पावसाने घरांचे आणि आंब्याच्या बागांचे नुकसान केले. रामटेक, नरखेड तालुक्यातही वादळासह पावसाने हजेरी लावली. यामुळे आंब्याचे आणि भाजीपाला पिकांचे बरेच नुकसान झाले.

मंगळवारी नागपूरसह ग्रामीण भागात दुपारी कडक उन्ह पडले. तरीही उकाडा चांगलाच जाणवत होता. सायंकाळी वातावरण बदलले आणि वादळासह पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. अन्य जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तविला आहे. तर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला बुलडाणा येथे १९ आणि २० मे हे दोन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

नागपूरकरांना उकाड्यावर पावसाची मात्रा

दोन दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना मंगळवारी सायंकाळी पावसाने गारव्याची मात्रा दिली. सुमारे २० मिनिटे आलेल्या जोराच्या पावसामुळे वातावरण थंडावले. काही काळ जोराचा वाराही सुटला. मात्र नुकसानाचे वृत्त नाही. दिवसभराचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आर्द्रता सकाळी ६९ टक्के होती, सायंकाळी आलेल्या पावसानंतर ९६ टक्के नोंदविली गेली.

चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक

मंगळवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे ४१.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. वाशिम आणि अमरावतीमध्ये ३७.६, बुलडाणा ३७.७, अकोला ३८.४, गडचिरोली ३८.६, यवतमाळ आणि गोंदियात ३९ तर वर्धा येथे ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदियात मागील २४ तासात ३.६ मिली पाऊस पडला.

टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यू