शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

नागपूर जिल्ह्यात वादळासह पाऊस; वीज पडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 21:38 IST

Rain with storm सायंकाळी आलेल्या वादळ व पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कहर केला. गुमगाव येथील एका शेळीपालकाचा वीज पडून मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील गावांमधील घरांचे पत्रे आणि छप्पर वादळात उडाले. कोंढाळी तालुक्यालाही वादळासह पावसाने तडाखा दिला. नागपूर शहरासह अन्य तालुक्यांमध्येही वादळासह जोराचा पाऊस आल्याने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले.

ठळक मुद्देकाटोल तालुक्यात घरांचे पत्र उडाले : कोंढाळीतही वादळाचा तडाखा, पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सायंकाळी आलेल्या वादळ व पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कहर केला. गुमगाव येथील एका शेळीपालकाचा वीज पडून मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील गावांमधील घरांचे पत्रे आणि छप्पर वादळात उडाले. कोंढाळी तालुक्यालाही वादळासह पावसाने तडाखा दिला. नागपूर शहरासह अन्य तालुक्यांमध्येही वादळासह जोराचा पाऊस आल्याने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले.

गुमगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी आलेल्या वादळ व पावसात तेथील वाहाब राज मोहम्मद शेटे (६३) यांचा वीज पडून मृत्यू झाला. कोतेवाडा शिवारात ते आपल्या शेळ्यांना चराईसाठी घेऊन गेले असता, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जोरदार वादळ व गडगडाटासह झालेल्या पावसात ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. हेड कॉन्स्टेबल अरविंद घिये, विनोद देशमुख, मंगेश मापारी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविला.

काटोल तालुक्याला सायंकाळी वादळासह पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक घरांचे पत्रे उडाले. यामुळे गावकरी भयभीत झाले होते. वादळात झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या. कोंढाळी तालुक्यातही वादळ व पावसाने घरांचे आणि आंब्याच्या बागांचे नुकसान केले. रामटेक, नरखेड तालुक्यातही वादळासह पावसाने हजेरी लावली. यामुळे आंब्याचे आणि भाजीपाला पिकांचे बरेच नुकसान झाले.

मंगळवारी नागपूरसह ग्रामीण भागात दुपारी कडक उन्ह पडले. तरीही उकाडा चांगलाच जाणवत होता. सायंकाळी वातावरण बदलले आणि वादळासह पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. अन्य जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तविला आहे. तर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला बुलडाणा येथे १९ आणि २० मे हे दोन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

नागपूरकरांना उकाड्यावर पावसाची मात्रा

दोन दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना मंगळवारी सायंकाळी पावसाने गारव्याची मात्रा दिली. सुमारे २० मिनिटे आलेल्या जोराच्या पावसामुळे वातावरण थंडावले. काही काळ जोराचा वाराही सुटला. मात्र नुकसानाचे वृत्त नाही. दिवसभराचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आर्द्रता सकाळी ६९ टक्के होती, सायंकाळी आलेल्या पावसानंतर ९६ टक्के नोंदविली गेली.

चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक

मंगळवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे ४१.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. वाशिम आणि अमरावतीमध्ये ३७.६, बुलडाणा ३७.७, अकोला ३८.४, गडचिरोली ३८.६, यवतमाळ आणि गोंदियात ३९ तर वर्धा येथे ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदियात मागील २४ तासात ३.६ मिली पाऊस पडला.

टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यू