शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळाला गेला तडा : अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 00:20 IST

गँगमनने रेल्वे रुळाला तडा गेल्याची सूचना वेळीच दिल्यामुळे अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली आहे.

ठळक मुद्देगँगमनने दिली वेळीच सूचना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गँगमनने रेल्वे रुळाला तडा गेल्याची सूचना वेळीच दिल्यामुळे अजनी-खापरीदरम्यान रेल्वेअपघात टळल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ११ वाजता अजनी-खापरी सेक्शनमध्ये गँगमन गस्त घालत होते. यातील एका गँगमनला डाऊन लाईनच्या रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब दृष्टीस पडली. यामुळे रेल्वे रुळामध्ये ५५ एमएमची गॅप पडली होती. या रेल्वे रुळावरून रेल्वेगाडी गेली असती तर अपघात होण्याची शक्यता होती. तेवढ्यात नागपूरवरून सुटलेली रेल्वेगाडी क्रमांक १६०३२ जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस डाऊन लाईनवरून जाणार होती. या गाडीला येताना पाहून गँगमनने लाल झेंडी दाखवून गाडीला थांबण्याची सूचना केली. लोकोपायलटने याची सूचना गार्ड पी. विश्वनाथ यांना दिली. त्यांनी गाडी थांबविण्याचे निर्देश दिले. तडा गेलेल्या रेल्वे रुळाच्या आधीच गाडी इमर्जन्सी ब्रेक लावून थांबविण्यात आली. त्यानंतर रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. या कामात ५० मिनिटांचा वेळ लागला. तोपर्यंत अंदमान एक्स्प्रेस अडकून पडली. या मार्गावरून रवाना होणाऱ्या इतर गाड्यांना रेल्वेस्थानकवर थांबविण्यात आले. यामुळे दिवाळीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. गँगमनच्या लक्षात वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळे मोठा अपघात टळला. यामुळे रेल्वेगाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूरला नागपूर रेल्वेस्थानकावर १३ मिनिटे रोखून धरण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात