शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

रेल्वे हाऊसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:06 IST

दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यांचे वेटिंग वाढले आहे तर अनेक रेल्वेगाड्यात ‘रिग्रेट’ म्हणजे तिकीटही मिळत नसल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देवेटिंग वाढले; प्रवाशांची गैरसोय : ट्रॅव्हल्स संचालकांनी वाढविले तिकिटांचे दर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यांचे वेटिंग वाढले आहे तर अनेक रेल्वेगाड्यात ‘रिग्रेट’ म्हणजे तिकीटही मिळत नसल्याची स्थिती आहे. प्रवाशांची या काळात होणारी गर्दी पाहता खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही तिकिटांच्या दरात वाढ केल्यामुळे दिवाळीत प्रवाशांची लूट होत असल्याची स्थिती आहे.नागपुरातून मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. दिवाळीच्या काळात नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये १०० ते १७७ वेटिंग, १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसमध्ये १४६, २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २७ आॅक्टोबरला १५० वेटिंग आहे. तर १२२९० दुरांतो एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत १८२ वेटिंग आहे. नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये २० आॅक्टोबरला १२३ वेटिंग, २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २४ आॅक्टोबरला २८९ वेटिंग आहे. दिल्लीकडे जाणाºया गाड्यात १२६५१ संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये १८ आॅक्टोबरला ४५ वेटिंग आणि २३ आॅक्टोबरला ४४ वेटिंग आहे. १२६१५ नागपूर-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेसमध्ये २१ आॅक्टोबरला रिग्रेट, २२ आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. तर १२७२१ नागपूर-निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेसमध्ये १८ आॅक्टोबरला रिग्रेट, १९ आॅक्टोबरला ९५ वेटिंग, २१ आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. हावडा मार्गावर १२८५९ नागपूर-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये १८ आॅक्टोबरला ९७ वेटिंग, २० आॅक्टोबरला ८१ वेटिंग, २१ आॅक्टोबरला ८३ वेटिंग आहे. १२१२९ आझादहिंद एक्स्प्रेसमध्ये १८ आॅक्टोबरला ९८ वेटिंग, १९ आॅक्टोबरला ४२ वेटिंग आणि २० आॅक्टोबरला ७१ वेटिंग आहे. १८०२९ शालिमार एक्स्पे्रसमध्ये १८ आॅक्टोबरला १०० वेटिंग, १९ आॅक्टोबरला ५२ वेटिंग आणि २० आॅक्टोबरला ८२ वेटिंग आहे.चेन्नईकडे जाणाºया गाड्यात १२६१६ जीटी एक्स्प्रेसमध्ये २० आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. तर १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ८१ आणि २३ आॅक्टोबरला ३८ वेटिंगची स्थिती आहे. रेल्वेगाड्यातील वेटिंगमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, त्यांना विना बर्थचा प्रवास करावा लागणार आहे. प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी अनेक प्रवासी तात्काळच्या रांगेत उभे राहून बर्थ मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत.दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही आपल्या भाड्यात मोठी वाढ केली असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यात पुण्याला जाणाºया प्रवाशांना ९०० रुपयांऐवजी २६०० रुपये मोजावे लागत आहेत. तर कोल्हापूरला जाणाºया प्रवाशांना १३०० रुपयांचे तिकीट २५०० रुपये देऊन खरेदी करावे लागत आहे. हैदराबादला जाणाºया प्रवाशांना ८०० रुपयांचे तिकीट १८०० ते २ हजार रुपयांना खरेदी करण्याची पाळी आली आहे. दिवाळी संपल्यानंतर चार ते पाच दिवस तिकिटांचे दर हे असेच राहणार असल्याची माहिती खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिली.