शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

राहुल गांधी अपरिपक्व नेते, दलित-आदिवासींची करत आहेत दिशाभूल

By योगेश पांडे | Updated: November 16, 2024 16:41 IST

किरण रिजीजूंचा आरोप : कॉंग्रेस म्हणजे खोटे आश्वासन देणारी फॅक्टरीच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राहुल गांधी इतकी वर्षे राजकारणात आहेत. मात्र त्यांना अद्यापदेखील दलित किंवा आदिवासी समाजाबाबत फारशी माहिती नाही. निवडणूक आली की वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट ते करत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांनी नेहमीच आदिवासी व दलितांची दिशाभूल केली आहे. ते अद्यापही अपरिपक्व नेतेच आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी लावला. नागपुरात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

आज कॉंग्रेस व महाविकासआघाडीचे नेते संविधान हाती घेऊन प्रचार करत आहेत व भाजपवर आरोप करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पुढाकारामुळे २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करणे सुरू झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हरविण्यासाठी कॉंग्रेसनेच षडयंत्र केले होते. त्यांचा कॉंग्रेसने नेहमीच अपमान केला. मात्र मतांच्या राजकारणासाठी आता कॉंग्रेस संविधानप्रेमी असल्याचे नाटक करत आहेत. कॉंग्रेस नेत्यांनीच नेहमी आरक्षणाला विरोध केला आहे, असा दावा किरण रिजीजू यांनी केला. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हिजननुसार संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेवर एक ग्रंथ केंद्र सरकार काढणार आहे. त्यात कॉंग्रेसने केलेल्या विरोधांचे रेकॉर्डदेखील असतील व जनतेसमोर यातून सत्य आणण्यात येईल, असे रिजीजू यांनी सांगितले.

संसदेतील भाषणांचा दर्जा घसरलाएक काळ होता जेव्हा कॉंग्रेसमधूनदेखील संसदेत अतिशय सखोल व अभ्यासपूर्ण भाषणे व्हायची. मात्र राहुल गांधी संसदेत आल्यापासून भाषणांचा व चर्चांचा दर्जा घसरला आहे. त्यांचा स्वत:चा काहीच अभ्यास नसतो. कुणीतरी लिहून दिलेले भाषण ते वाचतात. कॉंग्रेसमधील जे अभ्यासू खासदार आहेत, त्यांना भितीपोटी हवे तसे भाषण करता येत नाही, असा दावा रिजीजू यांनी केला.

८० टक्के मुस्लिमांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. याबाबत विविध पातळ्यांवर मुस्लिम संघटना, महिला संघटनांशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ८० टक्के मुस्लिमांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे. वक्फच्या नावाखाली कोट्यवधींच्या जमिनी लॅंड माफियांनीच गिळंकृत केल्या आहेत. त्याचा गरीबांना कुठलाही फायदा झालेला नाही. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर या जमिनींचा मुस्लिम समाजातील मुले, तरुण, महिला यांच्या विकासासाठीच उपयोग करण्यात येईल, असे रिजीजू यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४