शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली ते पंतप्रधान होतील : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 15:22 IST

२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करेल व राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर : 'राहुल गांधी द्रष्टे नेते आहेत. २०२४ साली ते पंतप्रधान होतील' असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट शेअर केल्यानंतर त्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत.  

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला खोटे आश्वासन देऊन स्वप्न दाखवली मात्र ते पूर्ण करण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी खासगीकरणाचा सपाटा त्यांनी लावला आहे. याच्यामुळे देशात महागाई, बेरोजगारी वाढत चालली आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. तर, राहुल गांधी यांच्याकडे देशासाठी व्हिजन आहे. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल आणि राहुल गांधी हे पंतप्रधान होतील, असा आशावाद पटोले यांनी व्यक्त केला आहे. 

देशात जीएसटी, लागू केल्यानंतर राहुल गांधींंनी त्याच्या दुष्परिणामाविषयी सांगितले होते. कोरोना महामारीबाबतही त्यांनी सूचित केले होते, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यांची थट्टा करण्याच काम भाजपने केलं. भाजप नेते नेहमी काँग्रेसला दोष देत फिरतात. मोदी संसदेत भाषण देताना नेहमी नेहरूमुळे महागाई वाढल्याचे सांगतात. म्हणजे नेहरू अजूनही मोदीच्या स्वप्नात येतात. काँग्रेसचे सर्वच पंतप्रधानांनी देशाला फक्त दिले आहे, देशाकडून काही घेतलं नाही. याउलट ८ वर्षे बहुमताची सत्ता असतानाही सरकारने देशाला प्रगतीकडे नेण्यापेक्षा देशाला ५० वर्षे मागे नेले असून आपल्या चुकीच्या गोष्टी लपविण्यासाठी गांधी परिवाराला बदनाम करण्याचा अपप्रचार सुरू आहे, असेही पटोले म्हणाले.

काँग्रेस बाप आहेबापच राहणार

राष्ट्रवादी नवरा आहे, शिवसेना बायको आहे आणि काँग्रेस वऱ्हाडीच्या भूमिकेत आहे, अशी प्रतिक्रिया नुकतीच भाजपा खासदार सुजय विखे यांनी केली होती. यावर नाना पटोले यांनी काँग्रेस बाप आहे, बापच राहणार असा प्रतिटोला सुजय विखे पाटील यांना लगावला होता. सुजय विखे नवखे आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलं होतं.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधी