शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

नागपूर जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्याचे रॅगिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 10:12 IST

आदिवासी विभागाच्या उदासा येथील आश्रम शाळेत दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत रॅगिंगचा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देदुसरीतील देवांशू मसरामला जबर मारहाण नखाने ओरबडले, पायावर दंड्याने मारलेउदासा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विभागाच्या उदासा येथील आश्रम शाळेत दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत रॅगिंगचा प्रकार घडला आहे. आश्रमशाळेतील मोठ्या मुलांनी जबरदस्त मारहाण केल्यामुळे मुलगा घाबरलेला आहे. शाळेतील इतरही मुलांना रॅगिंगचा फटका बसत असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. मुलाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आश्रमशाळेत यापुढे पाठविणार नसल्याचा निर्णय त्याच्या आईने घेतला आहे.देवांशू कृष्णा मसराम असे मुलाचे नाव आहे. उदासा येथील आश्रमशाळेत ११ जुलैला त्याला दुसऱ्या वर्गात प्रवेश देण्यात आला. दरम्यान आश्रमशाळेतील वरच्या वर्गातील मुलांकडून त्याला जबर मारहाण करण्यात आली. पहाटे ४ वाजता आंघोळ करण्याचा आग्रह त्याला होत होता.वॉशरूममध्ये त्याला मारण्यात आले. त्याच्या पायावर दंड्याने मारल्याचे व्रण आहे. मानेवर नखाचेसुद्धा व्रण दिसत आहे. याच दरम्यान त्याची प्रकृती अस्वस्थ झाली. त्याला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. पण याची कुठलीही माहिती त्याच्या आईला देण्यात आली नाही. झालेल्या घटनेची माहिती घरच्यांना होऊ नये म्हणून मुलाला आमिष दाखविण्यात आले, असा आरोप त्याच्या आईने केला आहे.दरम्यान २६ जुलैला त्याच्या आईने फोन करून माहिती घेतली असता, त्याचे अंग दुखत असल्याचे सांगितले. आई लगेच त्याला घरी घेऊन आली. दोन दिवसानंतर त्याने आईला घडलेली घटना सांगितली. त्याच्या आईने मुलाची मानसिक अवस्था बघून त्याला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलाला मारहाण झाली तरी शिक्षकांकडून काहीही लक्ष दिले गेले नाही. तो तीन दिवस आजारी होता तरी मला सांगण्यात आले नाही. मी जर मुलाला घरी आणले नसते, तर मुलाच्या जीवाला धोका झाला असता. याची तक्रार आदिवासी विभागाकडे मी करणार आहे.- सुचिता मसराम,मुलाची आई

आश्रमशाळेत रॅगिंगचा असा कुठलाही प्रकार घडला नाही. त्याच्या आईने मला तक्रार केली होती. मी लगेच त्याची दखल घेऊन तक्रारीचा निपटारा केला. वरच्या वर्गातील मुलांना नेमके काय झाल्याची विचारणा केली. तेव्हा मुलांनी सांगितले की त्याची शाळेत शिकण्याची मानसिकता नाही. मुलगा आजारी असता तर ग्रामीण रुग्णालयात नोंद घेतली जाते. आई-वडिलांना कळविले जाते. असे काहीच घडलेले नाही.मी देवांशुच्या आईसोबत बोललो आहे. असे काहीच घडलेले नाही.- विनायक पंडे, मुख्याध्यापक,आश्रमशाळा उदासा

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रCrimeगुन्हा