शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

नागपूर जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्याचे रॅगिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 10:12 IST

आदिवासी विभागाच्या उदासा येथील आश्रम शाळेत दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत रॅगिंगचा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देदुसरीतील देवांशू मसरामला जबर मारहाण नखाने ओरबडले, पायावर दंड्याने मारलेउदासा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विभागाच्या उदासा येथील आश्रम शाळेत दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत रॅगिंगचा प्रकार घडला आहे. आश्रमशाळेतील मोठ्या मुलांनी जबरदस्त मारहाण केल्यामुळे मुलगा घाबरलेला आहे. शाळेतील इतरही मुलांना रॅगिंगचा फटका बसत असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. मुलाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आश्रमशाळेत यापुढे पाठविणार नसल्याचा निर्णय त्याच्या आईने घेतला आहे.देवांशू कृष्णा मसराम असे मुलाचे नाव आहे. उदासा येथील आश्रमशाळेत ११ जुलैला त्याला दुसऱ्या वर्गात प्रवेश देण्यात आला. दरम्यान आश्रमशाळेतील वरच्या वर्गातील मुलांकडून त्याला जबर मारहाण करण्यात आली. पहाटे ४ वाजता आंघोळ करण्याचा आग्रह त्याला होत होता.वॉशरूममध्ये त्याला मारण्यात आले. त्याच्या पायावर दंड्याने मारल्याचे व्रण आहे. मानेवर नखाचेसुद्धा व्रण दिसत आहे. याच दरम्यान त्याची प्रकृती अस्वस्थ झाली. त्याला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. पण याची कुठलीही माहिती त्याच्या आईला देण्यात आली नाही. झालेल्या घटनेची माहिती घरच्यांना होऊ नये म्हणून मुलाला आमिष दाखविण्यात आले, असा आरोप त्याच्या आईने केला आहे.दरम्यान २६ जुलैला त्याच्या आईने फोन करून माहिती घेतली असता, त्याचे अंग दुखत असल्याचे सांगितले. आई लगेच त्याला घरी घेऊन आली. दोन दिवसानंतर त्याने आईला घडलेली घटना सांगितली. त्याच्या आईने मुलाची मानसिक अवस्था बघून त्याला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलाला मारहाण झाली तरी शिक्षकांकडून काहीही लक्ष दिले गेले नाही. तो तीन दिवस आजारी होता तरी मला सांगण्यात आले नाही. मी जर मुलाला घरी आणले नसते, तर मुलाच्या जीवाला धोका झाला असता. याची तक्रार आदिवासी विभागाकडे मी करणार आहे.- सुचिता मसराम,मुलाची आई

आश्रमशाळेत रॅगिंगचा असा कुठलाही प्रकार घडला नाही. त्याच्या आईने मला तक्रार केली होती. मी लगेच त्याची दखल घेऊन तक्रारीचा निपटारा केला. वरच्या वर्गातील मुलांना नेमके काय झाल्याची विचारणा केली. तेव्हा मुलांनी सांगितले की त्याची शाळेत शिकण्याची मानसिकता नाही. मुलगा आजारी असता तर ग्रामीण रुग्णालयात नोंद घेतली जाते. आई-वडिलांना कळविले जाते. असे काहीच घडलेले नाही.मी देवांशुच्या आईसोबत बोललो आहे. असे काहीच घडलेले नाही.- विनायक पंडे, मुख्याध्यापक,आश्रमशाळा उदासा

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रCrimeगुन्हा