शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पांढराबोडी तलावाचे सौंदर्यीकरण त्वरीत करा

By admin | Published: August 22, 2014 1:34 AM

पांढराबोडी तलाव कधीकाळी शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक होता. कालांतराने या तलावाचे अस्तित्व संपत गेले. सध्या हा तलाव अतिशय दुर्लक्षित अशा स्थितीत आहे. तलावात घाणीचे साम्राज्य

परिणय फुके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश : शासनाकडून ४२५ कोटीचा निधी मंजूरनागपूर : पांढराबोडी तलाव कधीकाळी शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक होता. कालांतराने या तलावाचे अस्तित्व संपत गेले. सध्या हा तलाव अतिशय दुर्लक्षित अशा स्थितीत आहे. तलावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तलावाला नवसंजीवनी मिळावी, सौंदर्यीकरण व्हावे, अशी मागणी येथील नागरिकांनी नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्याकडे केली होती. यासंदर्भात परिणय फुके यांनी महाराष्ट्र शासन व मनपाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ४२५ कोटींचा निधी मंजूर झाला. असे असतानाही सौंदर्यीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. या तलावाचे सौंदर्यीकरण ताबडतोब करावे, असे निर्देश फुके यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. अनेक वर्षापासुन पांढराबोडी तलावाचा प्रश्न प्रलंबित होता़ तलावासाठी या परिसरातील नागरिकांना कोर्टाची पायरीसुध्दा चढावी लागली होती़ नगरसेवक परिणय फुके यांनी याकरिता महाराष्ट्र शासन आणि मनपाकडे सतत पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच शासनाने ४२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला़ या तलावाच्या विकासामुळे परिसरातील शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे़ सौंदर्यीकरणामुळे परिसराला चौपाटीचे स्वरूप येणार आहे़ तसेच तलावालाही जुने वैभव प्राप्त होणार आहे. पुन्हा एकदा हा परिसर निसर्गरम्य होईल, अशी माहिती नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांनी दिली़ त्यांनी परिसरातील नागरिकांसह तलावाची पाहणी केली. यावेळी प्रसिध्द अ‍ॅड. आनंद परचुरे, रवि वाघमारे, राधेश्याम समरीत, दत्तात्रय गार्वे, दशरथ घोडमारे, विजय देशपांडे, गणेश जैस्वाल, महेश बारंगे, विजय चिकने, सुनील खंडारे, सुरेश कोहळे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)