शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील पावणेतीन लाख शेतकरी होणार कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 22:45 IST

राज्यातील महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. नागपूर विभागातील तब्बल पावणेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा प्राथमिक अंदाज : प्रत्यक्ष लाभासाठी उजळणार एप्रिल महिना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. नागपूर विभागातील तब्बल पावणेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु या योजनेचा प्रत्यक्ष लाभ एप्रिल महिन्यापासून मिळणार असल्याचे संकेत आहेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यांनी ३० जून २०१६ पर्र्यंतच्या थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ दिला. या योजनेनुसार दीड लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ होणार असून, त्यावरील रक्कम एकमुस्त भरल्यास दीड लाखांचा लाभ मिळणार होता. या योजनेचा राज्यातील ८० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, ३० हजार कोटींच्यावर रक्कम मिळणार असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. जून २०१७ ला याचा आदेश काढला. गेल्या अडीच वर्षात ५० लाख शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. यामध्ये नागपूर जिल्ह्यात सव्वा लाख शेतकरी पात्र ठरणार असल्याचे सांगण्यात येत होते. आजवर ५२ हजारच्या घरातच शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत दोन लाखापर्यंतच्या कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेवर टीका झाल्यानंतर दोन लाखावरील व नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शासन आदेशानंतर प्रशासनाकडून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार नागपूर विभागात २ लाख ७८ हजार ७४६ शेतकऱ्यांना लाभ मिळेल. सर्वाधिक ७५ हजार ३३६ शेतकरी वर्धा जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील ६० हजार ८७० शेतकरी पात्र ठरतील. सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्यातील १७ हजार ९३ शेतकरीच पात्र ठरतील. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात येणार असून, एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात किती जणांना याचा लाभ मिळतो, हे येणारी वेळच सांगेल.जिल्हा                      राष्ट्रीयकृत बँक               जिल्हा मध्यवर्ती बँकनागपूर                    ४९,४८९                       ४६२१भंडारा                    १०,९८९                        २८,९७४चंद्रपूर                     २३,२१६                       ३७,६५४गोंदिया                    ११,०४१                        २०,३३३गडचिरोली               १२,२२१                       ४८७२वर्धा                         ७५,३३६                      ०० 

टॅग्स :FarmerशेतकरीVidarbhaविदर्भ