शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

नवतंत्रज्ञानाचा आधार घेत फळबागेचे संरक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST

काटोल : निसर्गातील बदलामुळे संत्रा व मोसंबी पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होता. तो वेळीच आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे ...

काटोल : निसर्गातील बदलामुळे संत्रा व मोसंबी पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होता. तो वेळीच आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. दुष्काळी परिस्थितीने शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान विभिन्न प्रयोगांच्या आणि अनुभवाच्या माध्यमातून संत्री-मोसंबीच्या बागा वाचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी केले. संत्री मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयपीएल बायोलॉजिकल लिमिटेड व कृषी मित्र प्रतिष्ठान, काटोलतर्फे कृषी मित्र फार्म, धरतवाडा येथे संत्री-मोसंबी आंबिया बहार तसेच कीड व रोगनियंत्रण यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. आयपीएल बायोलॉजिकल लिमिटेडच्या वतीने याप्रसंगी शेतकऱ्यांना सध्या भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. डिंक्या, मर, मुळकुज, फळगळ आणि गतवर्षी झालेल्या अती पावसामुळे खराब झालेले झाड हे योग्यवेळी औषधाच्या वापराने सुरक्षित ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण राहुल जतकर, सचिन खरबडे यांनी केले. चर्चासत्रानंतर प्रगतशील शेतकरी हेमंत जिचकार, जयसिंग शिंदे, प्रकाश नागमोते, जोगेश सावल, शेषराव वानखेडे, प्रभाकर वाघ, भाऊराव ठाकरे, दीपक पटेल, दीपक मोहिते यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे सदस्य समीर उमप यांच्या हस्ते करण्यात आला. राजेश ठाकरे यांनी प्रास्ताविक केले, तर सुनील शेटे यांनी आभार मानले.