शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

निवासी शाळा सीबीएसई बनवण्याचा प्रस्ताव धुळखात

By आनंद डेकाटे | Updated: September 14, 2023 13:17 IST

३४ शाळांकड़ून मागवण्यात आले होते प्रस्ताव

नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळांना सीबीएसई करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मागील साडे तीन वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता. परंतु यावर अजुनही निर्णय न झाल्याने तो धुळखात पडला आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालया अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर राज्यात २०२२ पासून विभागातर्फे शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या घोषणेत ३५३ निवासी शाळांना मान्यता दिली गेली. त्यापैकी सध्या ९० शाळा आहेत.

२०११ पासून या निवासी शाळांमध्ये सहावीपासून ते दहावीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. प्रत्येक वर्गात ४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. या निवासी शाळेतून कमीत कमी १५ हजाराच्यावर विद्यार्थी शिकतात. मात्र, अलिकडच्या काळात राज्यात सीबीएसई किंवा आयसीएसई, सीआयएससीई, आयबी सारख्या मंडळांनी देशात शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे श्रीमंत वर्गातील पालक आपल्या पाल्यांना या महागड्या शाळांत प्रवेश देतात. तर गरीब विद्यार्थी शासकीय अनुदानीत खाजगी शाळांमध्ये शिकत आहेत.

या गरीब विद्यार्थ्यांना शासकीय निवासी शाळेत सीबीएसई चे शिक्षण मिळावे याकरिता अर्थमंत्री अजीत पवार यांनी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ८ मार्च २०२० रोजी सीबीएसईचे अभ्यासक्रम ९० पैकी ३४ अनुसूचित जातीच्या निवासी शाळेत लागू करण्याची घोषणा केली होती. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या कार्यकाळात ३४ शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता. मात्र त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग असताना सुद्धा निवासी शाळामध्ये सीबीएसई अभ्यासक्र लागू होत नसेल तरही शाेकांतिकाच म्हणावी लागेल. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. 

- अशिष फुलझेले ,सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच, नागपूर

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी