शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

टाकून देणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:11 IST

माता म्हटले की प्रेम, वास्तल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता मुलगी झाली म्हणून जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात.

ठळक मुद्देतीन वर्षांत २९३ बालके बेवारस :कुमारी मातांकडून टाकून देणाऱ्या बालकांचे प्रमाण ६० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माता म्हटले की प्रेम, वास्तल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता मुलगी झाली म्हणून जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. कुणाला कचराकुंडीत, रस्त्यालगत, एस.टी.बसमध्ये, देवळासमोर, इस्पितळात तर कुणाला थेट अनाथालयात बेवारस सोडून फरार होतात. बाल कल्याण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१४ ते २०१७ या कालावधीत शून्य ते सहा वयोगटातील २९३ बालके बेवारस मिळाली. यात कुमारी मातांकडून टाकून दिलेल्या बालकांचे प्रमाण ६० टक्के आहे. बेवारस स्थितीत आढळून येणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८० टक्के आहे.रविवारी रात्री बेलतरोडी मार्गावरील मनीषनगर परिसरात एका चारचाकी वाहनाखाली एक दिवसाची चिमुकली आढळून येताच, पुन्हा एकदा कुमारी माता व नाकारला जाणारा मुलीचा जन्माचा प्रश्न सामोर आला आहे.बदलती जीवनशैली, समाज माध्यमांचे तरुणाईवर असणारे गारुड, लैंगिक शिक्षणाचा अभाव, भिन्नलिंगी आकर्षण यासह अन्य काही कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अधोरेखीत झाले आहे. जुन्या आकडेवारीनुसार शहरात हे प्रमाण ६.० टक्के, तर ग्रामीण भागात १०.४ टक्के इतके आहे. साधारणत १५ ते १९ हा वयोगट शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणारा असतो. त्यात कुमारी अवस्थेत गर्भवती किंवा माता होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. अनैतिक संबंध, गरिबी, लाचारी व निरक्षरतेमुळे होणारी तरुणींची फसवणूक या मागील मुख्य कारण असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.दुसरीकडे, स्त्री म्हणजे आईबापाच्या जीवाला घोर, परक्याघरचे धन. स्त्री म्हणजे हुंड्याचा अकारण भार, या समाजाच्या मानसिकतेला आजही स्त्री-जन्माबाबत कमालीचे औदासिन्य आढळून येते. अलिकडच्या काळात यात सुधारणा होत असलीतरी दुसरी किंवा तिसरी मुलगी झाल्यास तिला टाकून देण्याची मानसिकता अद्यापही कायम असल्याचेही रविवारच्या घटनेतून पुढे आले आहे. बाल कल्याण समितीकडून उपलब्ध माहितीनुसार आई असतानाही गेल्या तीन वर्षांमध्ये शून्य ते सहा वर्षांची २९३ निष्पाप बालके दुधाला मुकली आहेत.त्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनकरविवारी वाहनाखाली पोलिसांना सापडलेल्या त्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे मेडिकलच्या बालरोग विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनुसार, जन्माला आल्यानंतर तिला मातेचे दूध मिळाले नव्हते. उघड्यावर ठेवण्यात आल्याने थंड पडलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या चिमुकलीवर आवश्यक सर्व उपचार सुरू आहेत. तिच्या आरोग्याकडे डॉक्टरांसोबतच मेडिकलचे सामाजिक कार्यकर्ता लक्ष ठेऊन आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर