शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

टाकून देणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:11 IST

माता म्हटले की प्रेम, वास्तल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता मुलगी झाली म्हणून जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात.

ठळक मुद्देतीन वर्षांत २९३ बालके बेवारस :कुमारी मातांकडून टाकून देणाऱ्या बालकांचे प्रमाण ६० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माता म्हटले की प्रेम, वास्तल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता मुलगी झाली म्हणून जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. कुणाला कचराकुंडीत, रस्त्यालगत, एस.टी.बसमध्ये, देवळासमोर, इस्पितळात तर कुणाला थेट अनाथालयात बेवारस सोडून फरार होतात. बाल कल्याण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१४ ते २०१७ या कालावधीत शून्य ते सहा वयोगटातील २९३ बालके बेवारस मिळाली. यात कुमारी मातांकडून टाकून दिलेल्या बालकांचे प्रमाण ६० टक्के आहे. बेवारस स्थितीत आढळून येणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८० टक्के आहे.रविवारी रात्री बेलतरोडी मार्गावरील मनीषनगर परिसरात एका चारचाकी वाहनाखाली एक दिवसाची चिमुकली आढळून येताच, पुन्हा एकदा कुमारी माता व नाकारला जाणारा मुलीचा जन्माचा प्रश्न सामोर आला आहे.बदलती जीवनशैली, समाज माध्यमांचे तरुणाईवर असणारे गारुड, लैंगिक शिक्षणाचा अभाव, भिन्नलिंगी आकर्षण यासह अन्य काही कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अधोरेखीत झाले आहे. जुन्या आकडेवारीनुसार शहरात हे प्रमाण ६.० टक्के, तर ग्रामीण भागात १०.४ टक्के इतके आहे. साधारणत १५ ते १९ हा वयोगट शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणारा असतो. त्यात कुमारी अवस्थेत गर्भवती किंवा माता होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. अनैतिक संबंध, गरिबी, लाचारी व निरक्षरतेमुळे होणारी तरुणींची फसवणूक या मागील मुख्य कारण असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.दुसरीकडे, स्त्री म्हणजे आईबापाच्या जीवाला घोर, परक्याघरचे धन. स्त्री म्हणजे हुंड्याचा अकारण भार, या समाजाच्या मानसिकतेला आजही स्त्री-जन्माबाबत कमालीचे औदासिन्य आढळून येते. अलिकडच्या काळात यात सुधारणा होत असलीतरी दुसरी किंवा तिसरी मुलगी झाल्यास तिला टाकून देण्याची मानसिकता अद्यापही कायम असल्याचेही रविवारच्या घटनेतून पुढे आले आहे. बाल कल्याण समितीकडून उपलब्ध माहितीनुसार आई असतानाही गेल्या तीन वर्षांमध्ये शून्य ते सहा वर्षांची २९३ निष्पाप बालके दुधाला मुकली आहेत.त्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनकरविवारी वाहनाखाली पोलिसांना सापडलेल्या त्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे मेडिकलच्या बालरोग विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनुसार, जन्माला आल्यानंतर तिला मातेचे दूध मिळाले नव्हते. उघड्यावर ठेवण्यात आल्याने थंड पडलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या चिमुकलीवर आवश्यक सर्व उपचार सुरू आहेत. तिच्या आरोग्याकडे डॉक्टरांसोबतच मेडिकलचे सामाजिक कार्यकर्ता लक्ष ठेऊन आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर