शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील भूखंड नियमितीकरणाची प्रक्रियाच ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 10:52 IST

नासुप्रने पाठविलेल्या ३५०० फाईल ऑगस्ट महिन्यापासून तशाच पडून असल्याने भूखंडधारक त्रस्त आहेत.

ठळक मुद्देमनपाकडे हजारो प्रस्ताव प्रलंबित मनुष्यबळ नसल्याने नगररचना विभाग हतबलमूलभूत सुविधांचा अभाव

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नागपूर शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे अधिकार नागपूर सुधार प्रन्यासला होते. राज्य सरकारने नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहरातील विकास प्राधिकरण म्हणून महापालिकेला याबाबतचे अधिकार देण्यात आले. अधिकार संपुष्टात आल्याने नासुप्रने ऑगस्ट २०१९ पासून भूखंड नियमितीकरणाची प्रक्रिया बंद केली. याबाबतचा संपूर्ण रेकॉर्ड महापालिकेच्या नगररचना विभागाकडे हस्तांतरित केला. परंतु महापालिकेडे जबाबदारी आल्यापासून भूखंड नियमितीकरण ठप्प आहे. नासुप्रने पाठविलेल्या ३५०० फाईल ऑगस्ट महिन्यापासून तशाच पडून असल्याने भूखंडधारक त्रस्त आहेत.विकासासोबतच नागपूर शहराचा चौफेर विस्तारही झाला आहे. शहर विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या जागा, शेत जमीन याचा वापर न बदललता हजारो लोकांनी घरे उभारली. ले-आऊ टधारकांनी जमीन अकृषक न करताच भूखंडाची विक्री केली. अशा अनधिकृत ले-आऊटमधील बांधकाम वा भूखंडाचे महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नियमितीकरण नासुप्रतफे राबविले जात होते. नियमितीकरण शुल्काच्या माध्यमातून नासुप्रच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल जमा झाला. यातूनच अनधिकृत ले-आऊ ट भागात रस्ते, पाणी, वीज, सिवेज लाईन व उद्याने अशा मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जात होता. कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात होते. परंतु राज्य सरकारने नासुप्र बखास्त करून शहरातील नासुप्रच्या कार्यक्षेत्रात विकास व नियोजन प्राधीकरण म्हणून महापालिकेला विकास कामे करण्याचे अधिकार देण्यात आले.शहरातील १९०० व ५७२ अभिन्यासातील ३ लाख भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी अर्ज केले होते. यातील २ लाख २० हजार भूखंंडाचे नियमितीकरण करण्यात आले. यापैकी २०१७ व २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत नासुप्रने तब्बल ७० हजार भूखंड नियमित केले. नियमितीकरणाला वेग आला असतानाच नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे अजूनही ८० हजारांहून अधिक भूखंड नियमित झालेले नाही. नासुप्रने मनपाकडे पाठविलेले अर्ज तसेच पडून आहेत.

उत्पन्नवाढीची अपेक्षा भ्रामकच ठरलीभूखंड नियमितीकरणातून नासुप्रच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल जमा झाला. याबाबतचे अधिकार महापालिकेला मिळाल्यास मोठा महसूल मनपाच्या तिजोरीत जमा होईल. अशी पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र जबाबदारी आल्यापासून नियमितीकरणाची प्रक्रिया ठप्प आहे. उत्पन्नवाढीची अपेक्षा भ्रामक ठरली आहे. नियमितकरण प्रक्रिया सुरू राहिली असती तर महापालिकेच्या तिजोरीत मोठा महसूल जमा झाला असता परंतु याकडे महापौर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.

मनपाकडे सक्षम यंत्रणेचा अभावनियमितीकरणाची प्रक्रिया जोखमीची आहे. खोटे वा बनावट दस्तऐवज तयार करून जागा बळकावणे, एकच भूखंड अनेकांना विकण्याचे प्रकार घडतात. यात लोकांची फसवणूक होते. अशा घटना घडू नये यासाठी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना ले-आऊ ट व भूखंडाची माहिती असणे अपेक्षित आहे. नासुप्रतील अधिकाऱ्यांकडे हे एकच काम असल्याने त्यांना याची माहिती होती. नगररचना विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना याची माहिती नाही. तसेच विभागात मनुष्यबळाचाही अभाव आहे. नियमित कामकाजासाठी कर्मचारी नसताना आता त्यात भूखंड नियमितीकरणाची जबाबदारी आली आहे.

भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी अर्ज केल्यानंतर नियमानुसार शुल्क जमा केल्यानंतर नियमितीकरण केले जाते. नासुप्रकडून रेकॉर्ड प्राप्त झाला आहे. संगणकात नोंदी करण्यात आल्या आहेत. या कामाला लवकरच गती मिळेल.- सुनील दहिकर, प्रभारी सहायक नगररचना सहसंचालक

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास