शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

उपराजधानीतील भूखंड नियमितीकरणाची प्रक्रियाच ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 10:52 IST

नासुप्रने पाठविलेल्या ३५०० फाईल ऑगस्ट महिन्यापासून तशाच पडून असल्याने भूखंडधारक त्रस्त आहेत.

ठळक मुद्देमनपाकडे हजारो प्रस्ताव प्रलंबित मनुष्यबळ नसल्याने नगररचना विभाग हतबलमूलभूत सुविधांचा अभाव

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नागपूर शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे अधिकार नागपूर सुधार प्रन्यासला होते. राज्य सरकारने नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहरातील विकास प्राधिकरण म्हणून महापालिकेला याबाबतचे अधिकार देण्यात आले. अधिकार संपुष्टात आल्याने नासुप्रने ऑगस्ट २०१९ पासून भूखंड नियमितीकरणाची प्रक्रिया बंद केली. याबाबतचा संपूर्ण रेकॉर्ड महापालिकेच्या नगररचना विभागाकडे हस्तांतरित केला. परंतु महापालिकेडे जबाबदारी आल्यापासून भूखंड नियमितीकरण ठप्प आहे. नासुप्रने पाठविलेल्या ३५०० फाईल ऑगस्ट महिन्यापासून तशाच पडून असल्याने भूखंडधारक त्रस्त आहेत.विकासासोबतच नागपूर शहराचा चौफेर विस्तारही झाला आहे. शहर विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या जागा, शेत जमीन याचा वापर न बदललता हजारो लोकांनी घरे उभारली. ले-आऊ टधारकांनी जमीन अकृषक न करताच भूखंडाची विक्री केली. अशा अनधिकृत ले-आऊटमधील बांधकाम वा भूखंडाचे महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत नियमितीकरण नासुप्रतफे राबविले जात होते. नियमितीकरण शुल्काच्या माध्यमातून नासुप्रच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल जमा झाला. यातूनच अनधिकृत ले-आऊ ट भागात रस्ते, पाणी, वीज, सिवेज लाईन व उद्याने अशा मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जात होता. कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात होते. परंतु राज्य सरकारने नासुप्र बखास्त करून शहरातील नासुप्रच्या कार्यक्षेत्रात विकास व नियोजन प्राधीकरण म्हणून महापालिकेला विकास कामे करण्याचे अधिकार देण्यात आले.शहरातील १९०० व ५७२ अभिन्यासातील ३ लाख भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी अर्ज केले होते. यातील २ लाख २० हजार भूखंंडाचे नियमितीकरण करण्यात आले. यापैकी २०१७ व २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत नासुप्रने तब्बल ७० हजार भूखंड नियमित केले. नियमितीकरणाला वेग आला असतानाच नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे अजूनही ८० हजारांहून अधिक भूखंड नियमित झालेले नाही. नासुप्रने मनपाकडे पाठविलेले अर्ज तसेच पडून आहेत.

उत्पन्नवाढीची अपेक्षा भ्रामकच ठरलीभूखंड नियमितीकरणातून नासुप्रच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल जमा झाला. याबाबतचे अधिकार महापालिकेला मिळाल्यास मोठा महसूल मनपाच्या तिजोरीत जमा होईल. अशी पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र जबाबदारी आल्यापासून नियमितीकरणाची प्रक्रिया ठप्प आहे. उत्पन्नवाढीची अपेक्षा भ्रामक ठरली आहे. नियमितकरण प्रक्रिया सुरू राहिली असती तर महापालिकेच्या तिजोरीत मोठा महसूल जमा झाला असता परंतु याकडे महापौर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.

मनपाकडे सक्षम यंत्रणेचा अभावनियमितीकरणाची प्रक्रिया जोखमीची आहे. खोटे वा बनावट दस्तऐवज तयार करून जागा बळकावणे, एकच भूखंड अनेकांना विकण्याचे प्रकार घडतात. यात लोकांची फसवणूक होते. अशा घटना घडू नये यासाठी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना ले-आऊ ट व भूखंडाची माहिती असणे अपेक्षित आहे. नासुप्रतील अधिकाऱ्यांकडे हे एकच काम असल्याने त्यांना याची माहिती होती. नगररचना विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना याची माहिती नाही. तसेच विभागात मनुष्यबळाचाही अभाव आहे. नियमित कामकाजासाठी कर्मचारी नसताना आता त्यात भूखंड नियमितीकरणाची जबाबदारी आली आहे.

भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी अर्ज केल्यानंतर नियमानुसार शुल्क जमा केल्यानंतर नियमितीकरण केले जाते. नासुप्रकडून रेकॉर्ड प्राप्त झाला आहे. संगणकात नोंदी करण्यात आल्या आहेत. या कामाला लवकरच गती मिळेल.- सुनील दहिकर, प्रभारी सहायक नगररचना सहसंचालक

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास