शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

आजच्या राजकारणातील नीतीमूल्ये हरविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:54 IST

आजच्या राजकारणात नीतीमत्ता हरविली आहे, राजकारणात गढूळपणा आला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे यांनी केली.

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शंकरराव, राजारामबापू व अण्णाभाऊ जन्मशताब्दी व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शंकरराव असो, यशवंतराव असो, जुन्या नेत्यामधील मूल्याधिष्ठित, नीतीमत्ता आज आठवली व अनुसरली जाते. आजच्या राजकारणात ती राहिली नाही. रात्री एका पक्षात असलेला नेता सकाळी दुसऱ्याच पक्षात दिसतो. विचार, तत्त्व हद्दपार झाले आहेत. आजच्या राजकारणात नीतीमत्ता हरविली आहे, राजकारणात गढूळपणा आला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे यांनी केली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूरच्यावतीने शंकरराव चव्हाण, राजारामबापू पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भावे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित सोहळ्यात अध्यक्षस्थानी गिरीश गांधी, चंद्रकांत वानखडे, कवी डॉ. सागर खादीवाला, अनंतराव घारड, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, उमाकांत अग्निहोत्री, पत्रकार श्रीकांत बेनी आदी उपस्थित होते. मधुकर भावे पुढे म्हणाले, इतिहासात डोकावून बघितल्यास माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील व विलासराव देशमुख या चार खांबावर महाराष्ट्र राज्य उभे असल्याचे दिसेल. शंकरराव चव्हाण यांनी राज्यात तब्बल ३६ धरणे बांधली आहेत. खºया अर्थाने अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागविली. जायकवाडी प्रकल्पाला केंद्र शासनाचा विरोध असताना अधिकाऱ्यांना पाठविण्यापेक्षा त्यांनी स्वत: जाऊन बाजू मांडली व धरण मंजूर करून घेतले. आज हे धरण महाराष्ट्राची शान आहे.विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पालाही त्यांनी मजबुती दिली. दुसरीकडे राजारामबापू पाटील यांनीही जनतेसाठी प्रचंड कष्ट उपसले, शेतकऱ्यांसाठी पदयात्रा काढल्या. दुष्काळी भागात नळयोजना आणली. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला तोड नाही. प्रबोधन साहित्याच्या माध्यमातून दलित, शोषितांचे दु:ख त्यांनी जगासमोर मांडले. ते हे करू शकले कारण त्यांच्या नीतीमत्ता होती. लोकहितासाठी त्यांनी राजकीय द्वेष बाजूला ठेवला. या तीन सुपुत्रांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक व सामाजिक जडणघडण केली, अशी भावना मधुकर भावे यांनी व्यक्त केली. शंकरराव चव्हाण यांचे म्हणणे तत्कालीन प्रमुखांनी ऐकले असते तर कदाचित शीख दंगली आणि बाबरी विध्वंस झाला नसता, असा उल्लेख त्यांनी केला.गिरीश गांधी यांनी राजारामबापू व शंकरराव चव्हाण यांच्यासोबतचे अनुभव कथन केले. प्रास्ताविक चंद्रकांत वानखडे यांनी केले. संचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. रेखा दंडिगे-घिया यांनी आभार मानले.

टॅग्स :Socialसामाजिक