शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यापेक्षा तत्त्वांची बंधने महत्त्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 22:35 IST

नव्या समाज माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर होत असून चांगल्यासोबत विघातक परिणामही समाजाला सहन करावे लागत आहेत. याला आवरणारे कायदेही नाहीत आणि सामाजिक प्रणालीत तशी तत्त्वेही तयार झाली नाहीत. तंत्रज्ञानाद्वारे यावर निर्बंध घालणे भविष्यात शक्यही होईल. मात्र त्यातून व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. समाजात एकमेकांशी वागण्यासाठी प्रत्येक गोष्टींचे कायदे नाहीत, पण सामाजिक तत्त्वांमधून आपण चांगले-वाईट शिकत असतो. तसेच नव्या माध्यमांच्या अभिव्यक्तीच्या नियंत्रणासाठी कायद्यापेक्षा तत्त्वांची बंधने महत्त्वाची ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्दे‘फेक न्यूज’ वर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नव्या समाज माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर होत असून चांगल्यासोबत विघातक परिणामही समाजाला सहन करावे लागत आहेत. याला आवरणारे कायदेही नाहीत आणि सामाजिक प्रणालीत तशी तत्त्वेही तयार झाली नाहीत. तंत्रज्ञानाद्वारे यावर निर्बंध घालणे भविष्यात शक्यही होईल. मात्र त्यातून व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. समाजात एकमेकांशी वागण्यासाठी प्रत्येक गोष्टींचे कायदे नाहीत, पण सामाजिक तत्त्वांमधून आपण चांगले-वाईट शिकत असतो. तसेच नव्या माध्यमांच्या अभिव्यक्तीच्या नियंत्रणासाठी कायद्यापेक्षा तत्त्वांची बंधने महत्त्वाची ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, नागपूर प्रेस क्लब आणि प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लबच्या सभागृहात ‘फेक न्यूज: परिणाम आणि दक्षता’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, पीआयटीईचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, पत्रकार राहुल पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.फडणवीस पुढे म्हणाले, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. जसजसा इंटरनेटचा वापर वाढला आहे तसतसे लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी माध्यमे देखील मिळू लागली. ही संवादाची समाज माध्यमे उपलब्ध झाल्याने लोकांच्या आशाआकांक्षा व अपेक्षा या माध्यमावर व्यक्त होऊ लागल्या व अभिव्यक्तीचा आनंद प्रत्येकजण पुरेपूर घेऊ लागला. हे चांगले असले तरी आज फेक न्यूजमधून अफवा पसरविण्यासाठी या माध्यमांचा वापर होऊ लागला आहे. त्याची कुठलीही शहानिशा न करता लोक एकमेकांना पाठवतात. हे संदेश अफवांचे रूप घेतात आणि दोन समाज एकमेकांच्या समोर उभे ठाकून निर्माण होणाऱ्या दंगली आपण अनुभवल्या आणि माणसे जनावरांपेक्षा कशी हिंसक होतात ते पाहिले आहे. समाज हा संक्रमणावस्थेतून जात आहे, अशावेळी शाश्वत तत्त्वे सांभाळतांना युगानुकूल तत्त्वे निर्माण करावी लागतील. नव्या समाज माध्यमांचा वापर हा संसर्गजन्य आजारासारखा झाला आहे. हा संसर्ग चांगल्या कारणासाठी झाला तर या तत्त्वामधून सदृढ समाज निर्मितीसाठी उपयोग होईल. त्यासाठी समाज प्रबोधन करून युगानुकूल तत्त्वे निर्माण करण्यासाठी माध्यमांनी जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFake Newsफेक न्यूज