शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

दीक्षाभूमीला वंदन करून स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:47 IST

नागपुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अरुण साधू यांना मिळावे हा अलौकिक योगायोगच होता.

ठळक मुद्देबहुआयामी साहित्यिक हरपला : अरुण साधू यांच्या आठवणींना दिला नागपूरकरांनी उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अरुण साधू यांना मिळावे हा अलौकिक योगायोगच होता. साहित्याच्या अवकाशात लीलया वावरणाºया या वैदर्भीय मातब्बराने त्यातही आपले वेगळेपण जपले. पुरोगामी विचारांवर अपार श्रद्धा ठेवणाºया या साहित्यिक व पत्रकाराने धम्मस्थळ दीक्षाभूमीला वंदन करूनच संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. अरुण साधू यांचे सोमवारी निधन झाले. नागपूरकरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी लोकमतशी बोलताना साहित्य संमेलनाची आठवण आणि अरुण साधू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. साहित्य विश्वात साहित्यिक, समीक्षक, पत्रकार असे विविधांगी व्यक्तिमत्त्व म्हणून अरुण साधू यांनी ठसा उमटविला आहे. मराठी साहित्यात कमतरता असलेल्या राजकीय कादंबरीला त्यांनी नवे आयाम दिले. त्यांच्या प्रचंड गाजलेल्या ‘सिंहासन’ या राजकीय कादंबरीवर निर्माण झालेला मराठी चित्रपट ‘मास्टरपीस’ ठरला. अशा या बहुआयामी साहित्यिकाची २००७ साली नागपूरला झालेल्या ८० व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपदही मारुती चित्तमपल्ली या वैदर्भीय साहित्यिकाकडे होते. तब्बल ७३ वर्षानंतर संमेलन नागपूरला होत असल्याने त्याचे महत्त्वही मोठे होते. अरुण साधू यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने आदर्श असा आयाम संमेलनाला प्राप्त झाला. अतिशय कमी खर्चात आणि साधेपणाने, मात्र विचारांना चालना देणारे व वाङ्मयीन मूल्यांवर भर देणारे हे संमेलन सर्वार्थाने आदर्श ठरल्याची ग्वाही साहित्य विश्व देतो.संमेलनाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी आदल्या दिवशी दीक्षाभूमीला भेट द्यावी असा निर्णय साधू यांनी घेतला. त्यांनी तशी माहितीही दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले आणि साहित्य महामंडळाला दिली. ठरल्याप्रमाणे ते दीक्षाभूमीवर गेले तेव्हा समितीच्या वतीनेही आदरातिथ्य करून त्यांचे स्वागत करण्यात आले.दुसºया दिवशी साहित्य संमेलनाच्या भाषणात आपली मूल्याधिष्ठित भूमिका त्यांनी प्रखरपणे मांडली. राजकीय विषय वेगळेपणाने हाताळणाºया अरुण साधू यांची शैली वेगळी होती. सामाजिक जाणिवेतून जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. ३० वर्षे पत्रकारितेतल्या झळाळत्या कारकिर्दीसोबतच त्यांनी मराठी साहित्यात राजकीय कादंबरीकार म्हणून कधीही न पुसला जाणारा ठसा उमटवला. वैदर्भीय साहित्यावर त्यांची विशेष आस्था होती.त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची अपरिमित हानी झाली आहे, असे मनोगत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.अरुण साधू हे मराठी साहित्यातील एक वेगळे व्यक्तिमत्त्व होते. ते पत्रकार राहिल्यामुळे त्यांच्या सामाजिक जाणिवा अतिशय व्यापक होत्या. राजकारण, अर्थकारण, सामाजिक व्यवस्था व वर्तमान प्रश्न यांचे भान त्यांना होते. राजकीय व सामाजिक कादंबºयांमध्ये त्यांनी त्याचा साक्षेपी वापर केला. एरवी राजकीय अनुभवाबद्दल मराठी लेखक भाबडे असतात, मात्र साधू यांनी सिहांसन, मुंबई दिनांक व त्रिशंकू या कादंबºयांमधून महाराष्टÑातील राजकारणाचे सामाजिक व सांस्कृतिक अंगाने ताणेबाणे मांडले.या साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी ‘वेगळा विदर्भ हा चावून चोथा झालेला विषय आहे’ असे विधान केल्याने त्यावेळी विदर्भातील राजकीय वातावरण तापले होते. मात्र दिखाऊपणाने लेखक म्हणून मिरविण्यापेक्षा स्पष्ट भूमिका मांडणे त्यांनी अधिक पसंत केले. त्यामुळे मराठीत राजकीय कादंबरी समृद्ध झाली. त्यांच्या व्रतस्थ लेखनाविषयी वाचक व अभ्यासकांमध्ये त्यांच्याबद्दल कायम आदर राहील.- डॉ. प्रमोद मुनघाटे, विभागप्रमुख,राष्टÑसंत तुकडोजी महाराज अध्यासन.