शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिल्हा परिषदेत सदस्य-पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 22:33 IST

Zilla Parishad ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे जिल्हा परिषदेतील काही विद्यमान सदस्यांचे सदस्यत्व रद्द होणार असून नव्याने निवडणूक घ्यावी लागणार असल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे.

ठळक मुद्देचर्चेला उधान : किमान ४ जागा कमी होण्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे जिल्हा परिषदेतील काही विद्यमान सदस्यांचे सदस्यत्व रद्द होणार असून नव्याने निवडणूक घ्यावी लागणार असल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे. १६ सदस्यांबाबत जिल्हा परिषदेत चर्चा असून यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तिन्ही पक्षाचा समावेश आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांसह पदाधिकारी व सदस्यांचीही धाकधूक वाढली आहे.

जिल्हा परिषदेत गुरूवारी स्थायी समितीची बैठक होती. मात्र दुपारीच सर्वोच्च न्यायालयाचा निर्यय आल्याने. बैठकीचे रुपच बदलले. प्रत्येक मुद्द्यावर सत्ताधााऱ्यांना कोंडीत पकडणारे शांत होते. शिवाय तीन-चार तास चालणारी सभा आटोपती घेत सर्व निकालाची वाट बघत वकिलांच्या संपर्कात होते. जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५८ जागा आहेत. यातील ३३ जागा अनुसूचित जाती, जमाती व ओबीसीसाठी आरक्षित आहे. यात १६ जागा ओबीसीसाठी आहेत. नियमानुसार २९ जागा आरक्षित हव्या होत्या. अनुसूचित जाती व जमातीच्या जागा त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार आहे. त्यामुळे ओबीसीच्या ४ जागा कमी होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र यातील कोणत्या सदस्यावर संक्रांत येईल. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाला करावा लागणार आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत काहीही आदेश न आल्याने सर्व सदस्य एकमेकांच्या संपर्कात होते.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरreservationआरक्षण