शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपुरात बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:02 IST

गरीब, कष्टकरी, शेतमजुरांच्या शून्य ते सहा वयोगटातील मुलांच्या पोषण व आरोग्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी गावोगावी, वस्ती, मोहल्ल्यात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहे. अंगणवाड्यांसाठी विजेची विशेष तरतूद नसल्याने बहुतांश अंगणवाड्या सुरू झाल्यापासून आजपर्यंत अंधारात आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या केंद्राचे काम अंधारात चालत असेल तर शिक्षण काय मिळत असेल?

ठळक मुद्देअंगणवाड्यांमध्ये वीजच नाही : शासनाकडून तरतूदही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरीब, कष्टकरी, शेतमजुरांच्या शून्य ते सहा वयोगटातील मुलांच्या पोषण व आरोग्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी गावोगावी, वस्ती, मोहल्ल्यात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहे. अंगणवाड्यांसाठी विजेची विशेष तरतूद नसल्याने बहुतांश अंगणवाड्या सुरू झाल्यापासून आजपर्यंत अंधारात आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या केंद्राचे काम अंधारात चालत असेल तर शिक्षण काय मिळत असेल?एकात्मिक बाल विकास प्रकल्प हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या उपक्रमांपैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो. या प्रकल्पात बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शाळापूर्व शिक्षण आदी सेवा संकलित स्वरूपात पुरवण्यात येते. मुळात हा प्रकल्प गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, कष्टकरी कुटुंबीयांच्या मुलांसाठी राबविण्यात येतो. राज्यात मोठ्या संख्येने अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मोर्चामध्ये त्याची व्यापकता नेहमीच दिसून येते. बहुतांश अंगणवाड्यांना आजही स्वतंत्र इमारत नाही. ग्रामपंचायतीच्या एका भागात, किरायाच्या घरात अंगणवाड्या कार्यरत आहे. या केंद्रातून पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा, अनौपचारिक शालापूर्व शिक्षण, पोषण आणि आरोग्य शिक्षण आदी सेवा पुरविण्यात येतात. गावाखेड्यातील झोपडपट्ट्यातील बालकांसाठी अतिशय उपयुक्त असे अंगणवाडी केंद्र आहे. असे असतानाही अंगणवाड्या अंधारात असणे आश्चर्यच आहे.उन्हाळ्याच्या दिवसात किंवा सध्याच्या वातावरणात पंख्याशिवाय राहणे शक्य नाही. अशा परिस्थितीत बालक दुपारच्या काळात येथे वास्तव्यास असतात. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या अंगणवाड्यांमध्ये सूर्यप्रकाश सुद्धा नीट पडत नाही. त्यामुळे मुलांना काय शिक्षण देणार, कसे आरोग्य जपणार हा प्रश्नच आहे.नागपूर जिल्ह्यात २४२३ अंगणवाड्या आहेत. ज्या अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या परिसरात आहे. त्यातील काही ग्रामपंचायतीने विजेचा पुरवठा केला आहे तर काही अंगणवाड्या ज्या भाड्याच्या घरात आहे, त्यांना घरमालकाकडून वीज पुरवठा केला जातो. मुळात अंगणवाड्यांसाठी विजेच्या संदर्भात स्वतंत्र तरतूद नसल्याचे अधिकारी सांगतात.१०० अंगणवाड्या होणार सोलरवरअंगणवाड्यांसाठी विजेची तरतूद नसल्याने पर्याय नाही. पण नागपूर जि.प.चा खनिज निधीमधून १०० अंगणवाड्या डिजिटल करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे. अशाच माध्यमातून अंगणवाड्या सोलरवर करण्याचा प्रयत्न आहे.भागवत तांबे, महिला व बाल कल्याण अधिकारीस्थानिक स्वराज्य संस्थेला खर्च करण्यास हरकत नाहीग्रा.पं. ला महिला व बाल कल्याणासाठी १० टक्के निधी खर्च करावा लागतो. यातून अंगणवाडीचा वीज बिलाचा खर्च करता येतो. काही ग्रा.पं. हा खर्च करीत आहे. शहरात महापालिकेने सुद्धा वीज बिलावर खर्च करावा.मनीष फुके, सरचिटणीस, नागपूर जिल्हा सरपंच सेवा संघ

 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी