शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
5
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
6
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
7
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
8
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
9
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
10
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
11
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
12
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
13
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
14
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
15
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
16
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
17
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
18
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
19
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
20
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:02 IST

गरीब, कष्टकरी, शेतमजुरांच्या शून्य ते सहा वयोगटातील मुलांच्या पोषण व आरोग्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी गावोगावी, वस्ती, मोहल्ल्यात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहे. अंगणवाड्यांसाठी विजेची विशेष तरतूद नसल्याने बहुतांश अंगणवाड्या सुरू झाल्यापासून आजपर्यंत अंधारात आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या केंद्राचे काम अंधारात चालत असेल तर शिक्षण काय मिळत असेल?

ठळक मुद्देअंगणवाड्यांमध्ये वीजच नाही : शासनाकडून तरतूदही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरीब, कष्टकरी, शेतमजुरांच्या शून्य ते सहा वयोगटातील मुलांच्या पोषण व आरोग्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी गावोगावी, वस्ती, मोहल्ल्यात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहे. अंगणवाड्यांसाठी विजेची विशेष तरतूद नसल्याने बहुतांश अंगणवाड्या सुरू झाल्यापासून आजपर्यंत अंधारात आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या केंद्राचे काम अंधारात चालत असेल तर शिक्षण काय मिळत असेल?एकात्मिक बाल विकास प्रकल्प हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या उपक्रमांपैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो. या प्रकल्पात बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शाळापूर्व शिक्षण आदी सेवा संकलित स्वरूपात पुरवण्यात येते. मुळात हा प्रकल्प गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, कष्टकरी कुटुंबीयांच्या मुलांसाठी राबविण्यात येतो. राज्यात मोठ्या संख्येने अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मोर्चामध्ये त्याची व्यापकता नेहमीच दिसून येते. बहुतांश अंगणवाड्यांना आजही स्वतंत्र इमारत नाही. ग्रामपंचायतीच्या एका भागात, किरायाच्या घरात अंगणवाड्या कार्यरत आहे. या केंद्रातून पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा, अनौपचारिक शालापूर्व शिक्षण, पोषण आणि आरोग्य शिक्षण आदी सेवा पुरविण्यात येतात. गावाखेड्यातील झोपडपट्ट्यातील बालकांसाठी अतिशय उपयुक्त असे अंगणवाडी केंद्र आहे. असे असतानाही अंगणवाड्या अंधारात असणे आश्चर्यच आहे.उन्हाळ्याच्या दिवसात किंवा सध्याच्या वातावरणात पंख्याशिवाय राहणे शक्य नाही. अशा परिस्थितीत बालक दुपारच्या काळात येथे वास्तव्यास असतात. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या अंगणवाड्यांमध्ये सूर्यप्रकाश सुद्धा नीट पडत नाही. त्यामुळे मुलांना काय शिक्षण देणार, कसे आरोग्य जपणार हा प्रश्नच आहे.नागपूर जिल्ह्यात २४२३ अंगणवाड्या आहेत. ज्या अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या परिसरात आहे. त्यातील काही ग्रामपंचायतीने विजेचा पुरवठा केला आहे तर काही अंगणवाड्या ज्या भाड्याच्या घरात आहे, त्यांना घरमालकाकडून वीज पुरवठा केला जातो. मुळात अंगणवाड्यांसाठी विजेच्या संदर्भात स्वतंत्र तरतूद नसल्याचे अधिकारी सांगतात.१०० अंगणवाड्या होणार सोलरवरअंगणवाड्यांसाठी विजेची तरतूद नसल्याने पर्याय नाही. पण नागपूर जि.प.चा खनिज निधीमधून १०० अंगणवाड्या डिजिटल करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे. अशाच माध्यमातून अंगणवाड्या सोलरवर करण्याचा प्रयत्न आहे.भागवत तांबे, महिला व बाल कल्याण अधिकारीस्थानिक स्वराज्य संस्थेला खर्च करण्यास हरकत नाहीग्रा.पं. ला महिला व बाल कल्याणासाठी १० टक्के निधी खर्च करावा लागतो. यातून अंगणवाडीचा वीज बिलाचा खर्च करता येतो. काही ग्रा.पं. हा खर्च करीत आहे. शहरात महापालिकेने सुद्धा वीज बिलावर खर्च करावा.मनीष फुके, सरचिटणीस, नागपूर जिल्हा सरपंच सेवा संघ

 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी