शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कारागृहात लष्कर, सिमीच्या दहशतवाद्यांकडून विषप्रयोगाचा प्रयत्न, प्रशांत राही यांचा सनसनाटी आरोप

By नरेश डोंगरे | Updated: March 7, 2024 23:45 IST

प्रशांत राही हे मुळचे श्रीरामपूर, अहमदनगर येथील रहिवासी असून ते आयआयटी बनारसचे विद्यार्थी आहेत.

नागपूर : कारागृहात असताना लष्कर ए तोयबा आणि सिमीच्या दहशतावाद्यांनी आपल्यावर विषप्रयोग केला, असा सनसनाटी आरोप प्रशांत राही नारायण सांगलीकर (६०) यांनी आज केला. दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे असे आरोप लावून राही यांना कथित नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यासोबत कारागृहात डांबण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी साईबाबा, राही तसेच महेश तिरकी आणि हेम केशव मिश्रा यांची निर्दोष सुटका केली. त्यानंतर कारागृहांत बंदिस्त असलेल्या या सर्वांची मुक्तता करण्यात आली. यानंतर निवडक पत्रकारांनी प्रशांत राही यांना गाठून बोलते केले असता त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले.

प्रशांत राही हे मुळचे श्रीरामपूर, अहमदनगर येथील रहिवासी असून ते आयआयटी बनारसचे विद्यार्थी आहेत. ते म्हणाले, देशातील एका प्रमुख इंग्रजी दैनिकात पत्रकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर उत्तराखंडच्या चळवळीत उतरलो. पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीत कार्यरत असताना आपण देशातील विविध सामाजिक संघटनांच्या तसेच विचारवंत, लेखकांच्या संपर्कात आलो. २००७ मध्ये माोवादी समर्थक असल्यावरून आपल्यावर केस दाखल झाली आणि त्यातून बाहेर आल्यानंतर आपण प्रकाशझोतात आलो. प्रा. साईबाबांचा साथीदार असल्याच्या आरोपावरून आपल्याला १ सप्टेंबर २०१३ ला रायपूर (छत्तीसगड) येथे पोलिसांनी अटक केली.

विशेष म्हणजे, मतभिन्नता असल्यामुळे आपण खूप महिन्यांपूर्वीच साईबाबांशी संपर्क तोडला होता. त्यांच्याशी कसलाही संपर्क नसताना अटक करून पोलिसांनी दहशतवादी संघटनेला मदत केल्याचा आरोप लावून २०१७ ला अमरावती कारागृहात आणले. तेथे अंडासेलमध्ये डांबण्यात आले. बाजुलाच ऑर्थर रोड कारागृहातून आणलेले लष्कर ए तोयबा, सिमीचे दहशतवादी होते. मुंबईतील काही भाईदेखिल होते. कारागृहातील अधिकाऱ्यांकडून अडचण होऊ नये, तेथे पाहिजे त्या सोयी-सुविधा मिळाव्या म्हणून ते अधिकाऱ्यांची चापलुसी करीत होते. 

आपण मात्र अन्याय अत्याचार झालेल्यांना दिलासा देण्यासाठी, गुन्हेगारीचे मुळ जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत होतो. कारागृहातील गैरप्रकार आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवित होतो. त्यामुळे लष्कर आणि सिमीच्या दहशतवाद्यांकडून प्रारंभी आपले ब्रेन वॉश करण्याचे प्रयत्न झाले. त्यांनी वेगवेगळे आमिष दाखविले. त्याला दाद देत नसल्यामुळे त्यांनी आपल्यावर जेवणातून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व दहशतवादी खुषमस्करे आहेत आणि एका षडयंत्रानुसार त्यांनी आपल्याला तेथे संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रशांत यांनी केला.

'त्या' विषारी बिया कशाच्या होत्या?कारागृहात मुंबई, पुण्यातून 'पनिशमेंट'च्या धर्तिवर पाठविलेले काही अधिकारी, तिकडून शिफ्ट झालेले दहशतवादी आणि गँगस्टर हे वेगवेगळ्या पदार्थाचा वापर करतात. रेसकोर्सवर नेण्यापूर्वी घोड्यांना ओकारी यावी, रिकामे पोट होऊन ते प्रचंड उत्तेजीत व्हावे यासाठी काही बिया खाऊ घालण्यात येतात. त्या विषारी असतात. १० जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत याच विषारी बिया आपल्याला जेवणातून खाऊ घालण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रशांत म्हणाले. आपल्याला मारण्यासाठीच हे करकारस्थान होते, असा आरोपही त्यांनी केला.

कुठे गेली फॅक्ट फाईंडिंग कमिटी ?नक्षलग्रस्त भागात दलित आदिवासींवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारामागचे सत्य शोधण्यासाठी एक फॅक्ट फाईंडिंग कमिटी नेमण्यात आली. मात्र, या कमिटीने त्यांचा तयार केलेला अहवाल सादर केल्यास देशभर खळबळ निर्माण होईल, याची कल्पना आल्यामुळे सरकारने ही कमिटीच गायब केल्याचा आरोप प्रशांत राही यांनी केला. त्यांनी भिमा कोरेगाव प्रकरणाचाही यावेळी उल्लेख केला.

टॅग्स :nagpurनागपूर