शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

National Inter-religious conference in Nagpur: “तरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यक”: प्रल्हाद वामनराव पै

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 11:50 IST

National Inter-religious conference in Nagpur: तरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे असून, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यक असल्याचे मत प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देतरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यकसर्वांचा विचार करायला शिकायला हवेआपल्या प्रगतीसाठी खूप उपयोगी ठरू शकेल

नागपूर: कोरोना संकट काळापासून तरुण वर्गात निराशा, नैराश्य यात वाढ झालेली दिसते. डिप्रेशनमुळे अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे गेलेले दिसतात. यासंदर्भात ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेच्या सुरुवातीला जीवनविद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै (Pralhad Wamanrao Pai) प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, तरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे असून, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यक असल्याचे मत प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, आताच्या काळात तीव्र स्पर्धा आहे. तरुणाला या स्पर्धेला सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. सततची चिंता, काळजी, भविष्याबद्दलची अनिश्चितता या सर्व गोष्टींमुळे तरुण वर्गात असुरक्षितता वाढली आहे. यांसारख्या कारणांमुळे मनात नकारात्मक विचार येतात. याचे सातत्या वाढले की नकारात्मक विचारांची एक साखळी सुरू होते आणि मग तरुण डिप्रेशनमध्ये जातात. यातून तरुणांना बाहेर काढण्याची गरज आहे. अशा तरुणांमध्ये सकारात्मकता आणण्याची गरज आहे. यासाठीच जीवनविद्या सुपर पॉझिटिव्हिटी शिकवते, असे प्रल्हाद वामनराव पै यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

सर्वांचा विचार करायला शिकायला हवे

जीवनविद्येच्या सुपर पॉझिटिव्हिटीचे तत्त्वज्ञान म्हणजे केवळ तुम्ही स्वतःचा विचार करू नका. केवळ स्वतःचा विचार केल्याने काळजी, नकारात्मकता सुरू होते. यासाठी सर्वांचा विचार करायला शिकायला हवे. सर्वांच्या भल्याचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. यामध्ये आपलेही भले आहे. हेच आम्ही तरुणांना शिकवतो. हे शास्त्रीयदृष्ट्याही योग्य आहे. सर्वांचा विचार केला, सर्वांचे भले होऊ दे, असा विचार केलात तर आपोआप तुमचेही भले होणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आम्ही नेहमी तरुणांना सांगतो की, सर्वांचा विचार करायला सुरुवात कराल, तेव्हा नकारात्मकता कधी येणार नाही, असे प्रल्हाद वामनराव पै यांनी सांगितले. 

आपल्या प्रगतीसाठी खूप उपयोगी ठरू शकेल

केवळ माझा किंवा स्वतःचा विचार कोणीही करू शकतो. प्रत्येक जण स्वतःचा विचार करत असतो. मी मोठा होईन. पण केवळ मी मोठा होण्यापेक्षा सर्वजण कसे मोठे होतील. याचा केवळ विचार किंवा इच्छा केली, तरी आपल्यासह अन्यही मोठे होऊ शकतील. जीवन विद्येचे विचार सर्वांचे भले होऊ दे, सर्वांचे कल्याण होऊ दे, ही सद्गुरू वामनराव पै यांची प्रार्थना सर्वांनी दररोज म्हटली, जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा म्हटली, तर आपल्यात सकारात्मकता येईल आणि ती आपल्याला आपल्या प्रगतीसाठी खूप उपयोगी ठरू शकेल, असे प्रल्हाद वामनराव पै यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, नागपूर ‘ लोकमत ’ च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगभरात धार्मिक सद‌्भावनेचा संदेश जाणार आहे. 

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदnagpurनागपूरLokmatलोकमतPrallhad Paiप्रल्हाद पै