शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

National Inter-Religious Conference: “भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर, विश्वगुरू होऊन शांतता प्रस्थापित करण्यास सक्षम”: प्रल्हाद वामनराव पै

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 2:26 PM

National Inter-Religious Conference: भारताकडे विश्वगुरू बनण्याची ताकद असून, विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्षम आहे, असे प्रतिपादन प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.

नागपूर: भारत हा देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) असतील, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) असतील तसेच देशातील अन्य नेते असतील सर्वजण विकासाच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे भारत महासत्ता होऊ शकतो. तसेच भारताकडे विश्वगुरू बनण्याची ताकद असून, विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्षम आहे, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै (Pralhad Wamanrao Pai) यांनी केले. ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत (National Inter-Religious Conference) ते बोलत होते.  

भारत महासत्ता झाला की, आपल्या शब्दाला जगामध्ये वजन येईल. शेवटी तुम्ही मोठे होता, तेव्हाच तुमच्या शब्दाला किंमत आणि वजन येते. संपूर्ण विश्वात शांतता, सुख आणि समाधान आपण पोहोचवण्यास भारत देश कारणीभूत होईल, असा विश्वास प्रल्हाद पै यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. परंतु, केवळ मी सुखी, मी सुखी म्हणून कोणीही सुखी होऊ शकत नाही. जग सुखी तेव्हा मी सुखी, ही वैचारिक क्रांती होईल, तेव्हाच कम्युनल हार्मनीचा प्रश्न सुटण्यास वेळ लागणार नाही आणि हाच संदेश सद्गुरु वामनराव पै यांनी आपल्या सिद्धांतामध्ये दिला आहे, असे प्रल्हाद पै यांनी सांगितले. 

जीवनविद्या हे शास्त्रही आहे आणि कलाही

सद्गुरु वामनराव पै यांचे विचार आचरणात आणले, तर सांप्रदायिक सामंजस्य, सलोखा निर्माण केला जाऊ शकतो. जीवनविद्या म्हणजे काय तर जग सुखी व्हावे. जीवनविद्या हे शास्त्रही आहे आणि कलाही आहे. जीवनविद्येतील सिद्धांताचा मूळ पाया ऋषीमुनी, संतांची शिकवण असली तरी निसर्ग नियमांची जोड सद्गुरुंनी दिली आहे. सत्याची जाणीव समजून घेतली, तर सांप्रदायिक सलोख्याचा प्रश्न सुटेल, असे नमूद करत कर्मसिद्धांतामध्ये क्रिया आणि प्रतिक्रियेला खूप महत्त्व आहे. जशी तुम्ही क्रिया कराल, तशी प्रतिक्रिया उमटते. याचाच अर्थ असा की, सुख आणि दुःख जसे तुम्ही इतरांना द्याल, अगदी तसेच ते बुमरँग होऊन सहस्रपटीने तुमच्याकडे येईल. ही गोष्ट सर्वांना समजली, तर प्रत्येक जण क्रिया-प्रतिक्रिया देताना विचार करेल. हा साधा निसर्ग नियम असून, तो धर्मातीत आहे, असे प्रल्हाद पै यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक धर्माचा आत्मा हा माणुसकी आहे

मी एकटा सुखी होऊ शकत नाही. माझे सुख इतरांच्या सुखात दडलेले आहे. स्वतःला सुखी व्हायचे असेल, तर इतरांच्या सुख देणे, इतरांच्या सुखाचा विचार करणे गरजेचे असून, हाच सद्गुरुंचा सिद्धांत आहे आणि तो तितकाच महत्त्वाचाही आहे. प्रत्येक धर्माचा आत्मा हा माणुसकी आहे. माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून माणसाला सुखी करण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचे असून, हीच देवपूजा, भक्ती आणि उपासना असल्याचे सद्गुरु सांगतात. योगगुरू बाबा रामदेव म्हणाले ते खरे आहे, मानवता हाच धर्म आहे. मानव धर्म महत्त्वाचा असून, बाकी सगळे पंथ, संप्रदाय होऊ शकतात, असे प्रल्हाद पै यांनी नमूद केले. 

भारत युवा देश, पिढी घडवणे महत्त्वाचे

मानवी संस्कृतीची मूल्ये, विचार आणि संस्कार लहानपणापासून द्यायला सुरुवात केली पाहिजे. पंतप्रधान मोदी नेहमी सांगतात की, आपला देश युवा देश आहे. आपल्याकडे बहुतांश युवा पिढी आहे आणि हीच युवा पिढी घडवणे महत्त्वाचे आहे. युवा पिढी बिघडली, तर काही खरे नाही. यासाठीच निसर्ग नियमांवर आधारित समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, कृतज्ञता ही जीवनमूल्य अधिकाधिक युवा पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे सांगत आम्ही आमच्या जीवनविद्येमध्ये मुलांमध्ये लहानपणापासूनच ती मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो, अगदी गर्भसंस्कारापासून त्याची सुरुवात केली जाते. लहानपणापासून जीवनमूल्ये, संस्कार आणि विचार दिला, तर पुढे जाऊन कम्युनल हार्मनीचा विषय लवकर सुटेल, असा विश्वास पल्हाद वामनराव पै यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.  

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदLokmatलोकमतPrallhad Paiप्रल्हाद पैnagpurनागपूर