शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

'अनिल देशमुखांनी कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नये'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 16:16 IST

अनिल देशमुख हे एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी समोर आणावे आणि माफीचे साक्षीदार व्हावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत बोलताना खळबळजनक खुलासा केला आहे. देशमुख हे एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले  हे त्यांनी समोर आणावं आणि माफीचे साक्षीदार व्हावे, असे आंबेडकर म्हणाले आहेत.

विशेष सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत उच्च न्यायालयाच्या विशेष सुटीकालीन खंडपीठाने १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा सोमवारी ताबा घेत पुन्हा चौकशी सुरू केली आहे. त्यावरुन आंबेडकर यांनी हा खुलासा केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते. 

सध्या राज्याच्या राजकारणात गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचार वाढत आहे. आज परिस्थिती अशी आहे की फक्त जे मोहरे आहे त्यांचे नाव पुढे येत आहे. मात्र, राजा आणि वजीराचे नाव पुढे येत नाही. देशमुखांचा बळी दिला जात आहे. कलेक्शन झालं पण तो पैसा देशमुख यांच्याकडे नाही. मग तो पैसा कुठे गेला हे देशमुखांनी सांगावं, असंही ते म्हणाले.

अशा स्थितीत न्यायालयाची भूमिका महत्वाची झाली आहे. न्यायालयाने राजकारणातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरण बद्दलचे प्रकरण लवकर निकाली काढावे. तसेच, राज्याच्या राज्यपालाने ही या सर्व स्थिती बद्दल योग्य निर्णय घ्यावा असे आवाहनही आंबेडकर यांनी केलं आहे.

यासोबतच, देवेंद्र फडणवीस हे ५ वर्ष राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना नवाब मलिक यांच्या कुटुंबातील लोकांनी दाऊदच्या माणसांकडून संपत्ती घेतल्याची माहिती होती. तेव्हा त्यांनी का हे प्रकरण उचलले नाही किंवा कारवाई केली नाही. आज जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, तेव्हा ते लक्ष दुसऱ्या बाजूला वेधण्यासाठी हे सर्व बाहेर आणत आहे, असा आपोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAnil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस