शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वातावरण बदलले की वीज पुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:20 IST

वातावरणात बदल झाल्याने वीज पुरवठा खंडित होणे सामान्य बाब झाली आहे. शहराची वीज वितरण व्यवस्था हलक्याफुलक्या पावसालाही सहन करू शकत नसल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे कंपनी दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावावर तासन्तास वीज पुरवठा खंडित ठेवते. वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : ऑनलाईन अभ्यासासाठी होतेय अडचण

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : वातावरणात बदल झाल्याने वीज पुरवठा खंडित होणे सामान्य बाब झाली आहे. शहराची वीज वितरण व्यवस्था हलक्याफुलक्या पावसालाही सहन करू शकत नसल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे कंपनी दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावावर तासन्तास वीज पुरवठा खंडित ठेवते. वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे.बुधवारी वीज खंडित झाल्याचा फटका बुटीबोरीतील लोकांनादेखील बसला. दुपारी २.२० वाजता वीज गेली आणि रात्री ७.३० ला आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते वातावरण बदल झाल्याने असे घडले आहे. एका हॉटेल जवळ ३ इन्सुलेटर डिस्क फुटले. चौकातसुद्धा एक इन्सुलेटर डिस्क फुटली. काही दिवसांपूर्वी पावसामुळे इन्सुलेटरचे नुकसान झाल्याने बराच वेळ वीज खंडित झाली होती. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. लोकांचे म्हणणे आहे की, ग्रामीण भागात कंपनीचे लक्ष नाही. सर्व कारभार रामभरोसे सुरू आहे. यासंदर्भात कंपनीने वातावरणातील बदलाचे कारण सांगून हात वर केले. त्यांचे म्हणणे आहे की पाऊस जोरदार झाला. वीजसुद्धा कोसळली. कंपनीने तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन