शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

विदर्भात दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 11:54 IST

पावसाळा आता संपत आला आहे. विभागातील मोठी जलाशये कोरडी आहेत. जलाशयांमध्ये केवळ ४६.२४ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाईचा धोका

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळा आता संपत आला आहे. विभागातील मोठी जलाशये कोरडी आहेत. जलाशयांमध्ये केवळ ४६.२४ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरीतील पाण्याची पातळी आधीच खोल गेली आहे. तेव्हा येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास भविष्यात पूर्व विदर्भात दुष्काळाचा धोका निर्माण झाला आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठी जलाशये आहेत. यांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. या आजच्या घडीला (१ आॅक्टोबर रोजी नोंदविल्यानुसार) केवळ १६४३.३९ दलघमी म्हणजेच ४६.२४ टक्के इतका साठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील मोठ्या जलशयामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची साठा क्षमता १०१६.८८ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३०५.१८ म्हणजेच ३०.०१ टक्के इतका साठा आहे. कामठी खैरीमध्ये ३८.१२ टक्के, रामटेकमध्ये ४५.३९ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूरमध्ये ६७.८९ टक्के, इटियाडोह ५२.७२ टक्के, पुजारीटोला ७१.९५ टक्के, कालीसरार ६०.२४ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा-२ मध्ये ३७.२१ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ८६.९३ टक्के, गडचिरोलीतील दीना प्रकल्पात ६९.१३ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर धरणात ३१.६१ टक्के, धाम प्रकल्पात ४०.७३ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ मध्ये ३१.४६ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द ४९.८२ टक्के, बावनथडी ४६.८२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा पाहता पाण्याच्या नियोजनाचा विचार केल्यास नागपूर विभागात तीव्र पाणीटंचाईचा धोका आहे.वणा-पोथरा १०० टक्के भरले१८ मोठ्या प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातील केवळ लोवर नांद, वणा आणि वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. परंतु या धरणाची एकूण साठाक्षमताच कमी आहे. लोवर नांद, वणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ५३ दलघमी इतकी आहे. तर पोथरा प्रकल्पाची एकूण पाणीसाठा क्षमता केवळ ३५ दलघमी इतकी आहे. त्यामुळे ती पूर्ण भरली असली तरी भविष्यातील टंचाईचा सामना करण्यास पुरेशी ठरणार नाही.

प्रचंड मोठा दुष्काळ पडू शकतोपावसाळ्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी आधीच खाली गेली आहे. विदर्भातील बहुतांश शेती ही विहिरीवरच अवलंबून आहे. त्यामुळे पिकांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. खरीपातील काही पिके निघून जतील. परंतु रबीची पिके पाण्याअभावी नष्ट होतील. गहू, चणा, सूर्यफूल, फळबागा यांना मोठा फटका बसेल. कारण पिण्यासाठी पाणी ठेवले जाईल. शेतीला पाणी मिळणार नाही. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचीही मोठी टंचाई भासेल. येत्या काही दिवसात चंगला पाऊस झाला तर ठीक नाही तर प्रचंड मोठा दुष्काळ पडेल, हे निश्चित. यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.- श्रीधर ठाकरे , कृषितज्ज्ञ, अध्यक्ष-महाआॅरेंज

टॅग्स :droughtदुष्काळ