शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पाण्यासाठी पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 23:15 IST

पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या कोचमध्ये पाणी नसल्याने नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन पाचवेळा चेनपुलिंग केली.

ठळक मुद्देपाचवेळा केली चेनपुलिंग : नऊ गाड्यांना झाला उशीर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या कोचमध्ये पाणी नसल्याची तक्रार करूनही रेल्वेने कोचमध्ये पाणी भरले नाही. पुढील रेल्वे स्थानकावर पाणी भरू असे सांगून प्रवाशांना गप्प बसविण्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन पाचवेळा चेनपुलिंग केली. अखेर कोचमध्ये पाणी भरल्यानंतर ही गाडी तब्बल एक तासाने पुढील प्रवासासाठी रवाना झाली. परंतु यामुळे नऊ रेल्वेगाड्यांना विलंब झाला.रेल्वेगाडी क्रमांक १२९०५ पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या बी २ कोचमध्ये पाणी नव्हते. प्रवाशांनी अकोला रेल्वे स्थानकावर पाणी भरण्याची मागणी केली. परंतु पुढील रेल्वे स्थानकावर पाणी भरू असे त्यांना सांगण्यात आले. बडनेरा रेल्वे स्थानकावरही पाणी भरण्यात आले नाही. त्यामुळे प्रवासी चांगलेच संतापले. नागपूर रेल्वे स्थानकावर ही गाडी सकाळी ९.५० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली. यावेळी कोचमध्ये पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका प्रवाशांनी घेतली. कोचमधील पाण्याचा व्हॉल्व्ह नादुरुस्त होता. तो दुरुस्त करून कोचमध्ये पाणी भरण्यासाठी तगादा लावला. परंतु पाणी न भरताच गाडी निघाल्यामुळे प्रवाशांनी चेनपुलिंग केली. पाणी भरण्यात येत नसल्याचे पाहून प्रवाशांनी तब्बल पाचवेळा चेनपुलिंग करून गाडी रोखून धरली. अखेर रेल्वे प्रशासनाने या कोचचा व्हॉल्व्ह दुरुस्त करून कोचमध्ये पाणी भरले. त्यानंतर तब्बल एक तासाने १०.५३ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. यामुळे तेलंगणा एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, आझादहिंद एक्स्प्रेस, संघमित्रा एक्स्प्रेससह नऊ रेल्वेगाड्यांना विलंब झाला.

टॅग्स :railwayरेल्वेwater shortageपाणीकपात