शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’द्वारे प्रदूषण नियंत्रण : प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला मनपाला ‘प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 23:30 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. कठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीतूनच प्रदूषण नियंत्रणात राहील, असा विश्वास मंडळाच्या विभाग संचालिका डॉ. हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देकठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणी हवी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषणाचा विचार केला तर नागपूर शहर हे प्रदूषण यादीत असले तरी इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत नियंत्रित राहिले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर या स्थितीत अत्यंत समाधानकारक सुधारणा झाली आहे. मात्र लॉकडाऊन संपविल्यानंतर काय, हा चिंतनाचा विषय आहे. प्रदूषणाची स्थिती कायम नियंत्रणात ठेवायची असेल तर लॉकडाऊनसारख्या नियमांचे पालन नेहमी करावे लागेल. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. कठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीतूनच प्रदूषण नियंत्रणात राहील, असा विश्वास मंडळाच्या विभाग संचालिका डॉ. हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.नागपूरचा विचार केल्यास कार्बन, कार्बन मोनाक्साईड, सल्फरडायआॅक्साईड, नायट्रोक्साईड आदी प्रदूषण मानकांचे प्रमाण कायम धोक्याच्या पातळीच्या खाली राहिले आहे. मात्र खरी चिंता पर्टिक्युलेट मॅटर(धूलिकण)ची आहे. धोक्याची पातळी ८० मायक्रोग्रॅम असताना टाळेबंदीपूर्वी ती १२० मायक्रोग्रॅमच्यावर पोहचली होती. मोठ्या प्रमाणात चालणारे बांधकाम, मानवी हालचाल, वाहनांची वाढ आणि वीज प्रकल्प ही यामागची कारणे तज्ज्ञांद्वारे व्यक्त केली जातात. टाळेबंदीच्या काळात धुलिकणांचे प्रमाण ४० ते ५० मायक्रोग्रॅमपर्यंत खाली घसरले. वायू गुणवता ४८ ते ५९ वर स्थिर राहिली आहे, ही अत्यंत समाधानाची बाब म्हणावी लागेल. डॉ. देशपांडे यांच्या मते, टाळेबंदीच्या दोन-तीन दिवसातच परिस्थिती बदलली होती. टाळेबंदीनंतर मानवी हालचाली वाढल्यास कदाचित एवढ्याच दिवसात प्रदूषण पूर्वस्थितीत येईल. हेच आपणाला टाळायचे आहे.यासाठीच मंडळातर्फे ‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. नियम आधीच बनलेले आहेत, गरज आहे ती केवळ कठोर अंमलबजावणीची. कचरा फेकणे, जाळणे याबाबत कठोर पावले उचलावी लागतील. नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरेल. गरज नसेल तिथे गाड्यांचा वापर टाळावा. उद्योग आणि बांधकामे सुरू होतीलच, मात्र नियमांच्या बाबतीत मनपाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यात पोलीस, आरटीओ, अभियांत्रिकी कॉलेज, नीरी, एनएमआरडीए, जिल्हा पुरवठा अधिकारी, स्मार्ट सिटी अशा सर्वसमावेशक कृतीनेच आपण प्रदूषणावर नियंत्रण आणि आपले नागपूर पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित ठेवू शकतो, असा विश्वास डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केला.‘नीरी’चीही तयारीनीरीच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे मुख्य वैज्ञानिक डॉ. के. व्ही. जॉर्ज यांनी आपली भूमिका मांडली. लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असताना केवळ ऊर्जा प्रकल्प सुरू होते आणि तरीही प्रदूषण खाली आले आहे. यावरून ऊर्जा प्रकल्प प्रदूषणास अधिक कारणीभूत नाहीत. त्यामुळे आपल्याला बांधकामे आणि वाहने या प्रदूषणावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही अभ्यास करीत आहोत आणि त्यानुसार योजना तयार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊन काळात प्रदूषणात मोठी घट झाली, पण याच स्थितीत आपण राहू शकत नाही. लॉकडाऊन हटवावे लागेल आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटी पूर्वीप्रमाणे सुरू होतील. अशावेळी प्रदूषण नियंत्रित करणे नागरिकांची व सर्वांची जबाबदारी असेल. लॉकडाऊनसारख्याच नियमांचे पालन सर्वांना करावे लागेल. आता नागरिकांनीही त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.- डॉ हेमा देशपांडे, संचालिका, एमपीसीबी, नागपूर 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentपर्यावरण