शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’द्वारे प्रदूषण नियंत्रण : प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला मनपाला ‘प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 23:30 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. कठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीतूनच प्रदूषण नियंत्रणात राहील, असा विश्वास मंडळाच्या विभाग संचालिका डॉ. हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देकठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणी हवी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषणाचा विचार केला तर नागपूर शहर हे प्रदूषण यादीत असले तरी इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत नियंत्रित राहिले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर या स्थितीत अत्यंत समाधानकारक सुधारणा झाली आहे. मात्र लॉकडाऊन संपविल्यानंतर काय, हा चिंतनाचा विषय आहे. प्रदूषणाची स्थिती कायम नियंत्रणात ठेवायची असेल तर लॉकडाऊनसारख्या नियमांचे पालन नेहमी करावे लागेल. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. कठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीतूनच प्रदूषण नियंत्रणात राहील, असा विश्वास मंडळाच्या विभाग संचालिका डॉ. हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.नागपूरचा विचार केल्यास कार्बन, कार्बन मोनाक्साईड, सल्फरडायआॅक्साईड, नायट्रोक्साईड आदी प्रदूषण मानकांचे प्रमाण कायम धोक्याच्या पातळीच्या खाली राहिले आहे. मात्र खरी चिंता पर्टिक्युलेट मॅटर(धूलिकण)ची आहे. धोक्याची पातळी ८० मायक्रोग्रॅम असताना टाळेबंदीपूर्वी ती १२० मायक्रोग्रॅमच्यावर पोहचली होती. मोठ्या प्रमाणात चालणारे बांधकाम, मानवी हालचाल, वाहनांची वाढ आणि वीज प्रकल्प ही यामागची कारणे तज्ज्ञांद्वारे व्यक्त केली जातात. टाळेबंदीच्या काळात धुलिकणांचे प्रमाण ४० ते ५० मायक्रोग्रॅमपर्यंत खाली घसरले. वायू गुणवता ४८ ते ५९ वर स्थिर राहिली आहे, ही अत्यंत समाधानाची बाब म्हणावी लागेल. डॉ. देशपांडे यांच्या मते, टाळेबंदीच्या दोन-तीन दिवसातच परिस्थिती बदलली होती. टाळेबंदीनंतर मानवी हालचाली वाढल्यास कदाचित एवढ्याच दिवसात प्रदूषण पूर्वस्थितीत येईल. हेच आपणाला टाळायचे आहे.यासाठीच मंडळातर्फे ‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. नियम आधीच बनलेले आहेत, गरज आहे ती केवळ कठोर अंमलबजावणीची. कचरा फेकणे, जाळणे याबाबत कठोर पावले उचलावी लागतील. नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरेल. गरज नसेल तिथे गाड्यांचा वापर टाळावा. उद्योग आणि बांधकामे सुरू होतीलच, मात्र नियमांच्या बाबतीत मनपाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यात पोलीस, आरटीओ, अभियांत्रिकी कॉलेज, नीरी, एनएमआरडीए, जिल्हा पुरवठा अधिकारी, स्मार्ट सिटी अशा सर्वसमावेशक कृतीनेच आपण प्रदूषणावर नियंत्रण आणि आपले नागपूर पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित ठेवू शकतो, असा विश्वास डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केला.‘नीरी’चीही तयारीनीरीच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे मुख्य वैज्ञानिक डॉ. के. व्ही. जॉर्ज यांनी आपली भूमिका मांडली. लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असताना केवळ ऊर्जा प्रकल्प सुरू होते आणि तरीही प्रदूषण खाली आले आहे. यावरून ऊर्जा प्रकल्प प्रदूषणास अधिक कारणीभूत नाहीत. त्यामुळे आपल्याला बांधकामे आणि वाहने या प्रदूषणावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही अभ्यास करीत आहोत आणि त्यानुसार योजना तयार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊन काळात प्रदूषणात मोठी घट झाली, पण याच स्थितीत आपण राहू शकत नाही. लॉकडाऊन हटवावे लागेल आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटी पूर्वीप्रमाणे सुरू होतील. अशावेळी प्रदूषण नियंत्रित करणे नागरिकांची व सर्वांची जबाबदारी असेल. लॉकडाऊनसारख्याच नियमांचे पालन सर्वांना करावे लागेल. आता नागरिकांनीही त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.- डॉ हेमा देशपांडे, संचालिका, एमपीसीबी, नागपूर 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentपर्यावरण