शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रदूषण पसरविणारे उद्योग एमपीसीबीच्या रडारवर, सात उद्योगांची बँक गॅरंटी जप्त

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 20, 2023 16:31 IST

सुधारणा न झाल्यास उद्योगांना टाळे ठोकणार

नागपूर : वायू व जल प्रदूषण पसरविणारे उद्योग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) रडारवर असून नोटीस दिल्यानंतरही सुधारणा न झालेल्या हिंगणा व बुटीबोरी येथील सात उद्योगांची एकूण ३६.५ लाखांची बँक गॅरंटी मंडळाने जप्त केली आहे. त्यानंतरही उद्योगाच्या संचालनात सुधारणा न झाल्यास अधिकारी उद्योगांना थेट टाळे ठोकणार आहेत.

प्रदूषण मंडळाची कठोर भूमिका

शिल्पा स्टील अ‍ॅण्ड पॉवर (१० लाख बँक गॅरंटी जप्त), जयस्वाल निको लि. रूईखैरी, वर्धा रोड (२ लाख), सुपरिअर ड्रिक्स प्रा.लि. (५ लाख), इंडिगो डेनिम प्रा.लि. (१० लाख), इंडोरामा सिंथेटिक्स (२ लाख), ग्राइंडवेल नॉर्टन (५ लाख), बुटीबोरी एमआयडीसी, केईसी इंटरनॅशनल (२.५ लाख), बुटीबोरी एमआयडीसी अशी उद्योगांची नावे असून त्यांच्याकडून एकूण ३६.५ लाख रुपयांची बँक गॅरंटी जप्त केली आहे.

ही कारवाई वर्ष २०२१ ते डिसेंबर-२२ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. प्रदूषण पसरविणाऱ्यांविरुद्ध मंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. प्रारंभी उद्योगाची तपासणी करून सुधारणा करण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतरही अखेरची सूचना आणि नंतर बँक गॅरंटी जप्तीची कारवाई केली जाते. या प्रक्रियेनुसार या सात उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. उद्योगातील रसायनयुक्त पाणी थेट नाल्यात सोडून जल प्रदूषण करणाऱ्यांना आधीच नोटीस दिल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

२१ उद्योगांना नोटीसा

मंडळाने हिंगणा आणि बुटीबोरी येथील २१ उद्योगांवर विविध कारणांनी ऑक्टोबर-२१ ते एप्रिल-२३ पर्यंत कारवाई केली आहे. यापैकी काहींना अंतरिम तर काहींना कंपनी बंद करण्याचे नोटीस दिले आहेत. या उद्योगांमध्ये नारायण प्रोसिड फूड, हरिवंश पॅकेजिंग, इंडिगो डेनिम, नोव्हेटिव्ह टेक्सटाईल, लार्सन टार्बो, स्वराज इंडस्ट्रीज, ग्राइंडवेल नॉर्टन, शिवम नायट्रेट, युनिटेक पॉवर ट्रान्समिशन, ग्रिप टाइट श्रिंक फिल्मस, प्लास्टिक इंडस्ट्रीज, मालू इलेक्ट्रो, असित ग्लास, खेमका उद्योग, बालाजी एन्टरप्राईजेस, सीबी प्लास्ट, प्रिज्म जॉनसन आदींचा समावेश आहे. तसेच प्लास्टिक अधिनियम २०१८ चे पालन न केल्यासंदर्भात अष्टविनायक प्लास्टिक इंडस्ट्रीला बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

उद्योगांनी करावे प्रदूषण मानकांचे पालन

उद्योगांना प्रदूषण मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. न करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. वायू किंवा जल प्रदूषण पसविणाऱ्यांना आधी नोटीस देण्यात येते. नंतर पुन्हा नोटीस आणि सुधारणा न झाल्यास बँक गॅरंटी जप्त केली जाते. 

- आनंद काटोले, उपक्षेत्रीय अधिकारी, एमपीसीबी, नागपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषणnagpurनागपूर