शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक सुधारणांसाठी राजकीय एकमत व्हावे : वीरप्पा मोईली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 05:09 IST

‘जीएसटी’, नोटाबंदीनंतर आर्थिक विकास दरात घट झाल्यामुळे एकीकडे काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते.

ठळक मुद्देन्यायपालिकेतील वाद बाहेर येणे अयोग्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जीएसटी’, नोटाबंदीनंतर आर्थिक विकास दरात घट झाल्यामुळे एकीकडे काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री डॉ.एम.वीरप्पा मोईली यांनी मात्र देशाला आर्थिक सुधारणा आवश्यक असल्याचे भाष्य केले आहे. आर्थिक सुधारणांशिवाय देश प्रगती करणार नाही व यासाठी राजकीय एकमत व्हायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.डॉ. एम. वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समिती (वित्त) यांनी सोमवारी नागपूरला भेट दिली. यानंतर खा.अजय संचेती यांच्या निवासस्थानी डॉ.मोईली यांच्यासमवेत समितीच्या सदस्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. १९९१ साली देशात पहिली आर्थिक सुधारणा झाली व त्यानंतर देशात चांगला विकास झाला. मागील चार ते पाच वर्षांपासून दुसऱ्या  आर्थिक सुधारणांसंदर्भात पावले उचलण्यात येत आहेत. याची देशाला आवश्यकता आहे. एका रात्रीत बदल होणार नाही. ही मोठी प्रक्रिया आहे व यात सर्वांनी सहभागी व्हायला हवे, असे डॉ.मोईली म्हणाले. ‘इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी कोड’ सुधारणा विधेयकामुळे कर्जबुडव्यांवर चाप बसणार आहे. या विधेयकामुळे एक नवीन प्रक्रिया तर सुरू झाली आहे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी समितीचे सदस्य खा.निशिकांत दुबे, बी.मेहताब, शिवकुमार उदासी हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय संचेती यांच्या निवासस्थानी खा.बंडारु दत्तात्रेय, खा.चंद्रकांत खैरे, डॉ.महेंद्र प्रसाद, मलाथी मोईली, पी.सी.गड्डीगौडकर, वेंकटेश बाबू यांनीदेखील भेट दिली.न्यायाधीशांमधील वाद दुर्दैवीसर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरोधात घेतलेल्या भूमिकेसंदर्भात डॉ.मोईली यांनी आपले मत मांडले. न्यायपालिकेतील वाद अशा पद्धतीने बाहेर येणे दुर्दैवी आहे. हे सर्व न्यायाधीश अतिशय प्रामाणिक व समर्पित आहेत. परंतु असे व्हायला नको होते. जर अंतर्गत वाद असतील त्यांना सोडविण्यासाठी सरन्यायाधीशांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे डॉ.मोईली म्हणाले. या प्रकरणामागे राजकीय हस्तक्षेप असल्याच्या मुद्याचे त्यांनी खंडन करीत आपल्या देशाच्या न्यायपालिकेचा जगभरात आदर कायम आहे, असे प्रतिपादन केले.‘पाँझी’ योजनांविरोधात येणार विधेयकदेशभरात आर्थिक लाभाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘पाँझी’ योजना व ‘चिटफंड’ योजनांचे जाळे पसरले आहे. कायद्यात तरतूद नसल्यामुळे या योजनांमध्ये पैसे गमाविल्यानंतर गुंतवणूकदारांना कुठलीही सुरक्षा राहत नाही. त्यामुळेच ही बाब कायदेशीर कक्षेत आणण्यासाठी व अशा योजनांवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच विधेयक सादर करण्यात येईल, अशी माहिती डॉ.वीरप्पा मोईली व बी.मेहताब यांनी दिली.कर्जमाफीने शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीतदेशातील शेतकरी अडचणीत आहे व त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी समग्र दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. केवळ कर्जमाफी करून किंवा ‘पॅकेज’जाहीर करून शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत. तर यासाठी सर्वसमावेशक असे धोरण जाहीर करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात उच्चपातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती डॉ.मोईली यांनी दिली.

 

टॅग्स :nagpurनागपूर