शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

काँग्रेसचे मनोरे कोसळले, मनपा निवडणुकीआधीच मनोबल खचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 11:35 IST

संघापासून भाजपपर्यंत सर्वांनीच नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर फोकस केला आहे. गडकरी-फडणवीस यांची जोडी ताकदीने मैदानात उतरली आहे.

ठळक मुद्देभाजपने होळीपूर्वीच उधळला गुलाल चौकार मारण्याचा मार्ग सुकर

कमलेश वानखेडे

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता काबीज केल्याने नागपुरातही भाजपचा उत्साह वाढला आहे. गेल्या १५ वर्षांत महापालिकेतील भाजपची सत्ता उलथून फेकण्यासाठी कंबर कसणाऱ्या काँग्रेसजनांचे मनोबल पुरते खचले आहे. कितीही जोर लावला तरी भाजपला नमविणे सोपे नाही, संघभूमीत तर आणखीनच कठीण आहे, असे निराशेचे सूर काँग्रेसजन आळवू लागले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे महत्त्व भाजपसाठी किती आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. संघापासून भाजपपर्यंत सर्वांनीच नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर फोकस केला आहे. गडकरी-फडणवीस यांची जोडी ताकदीने मैदानात उतरली आहे.

येथे सत्तेचा चौकार मारण्यासाठी भाजप शक्ती पणाला लावणार आहे. काँग्रेससाठी नागपुरात तशीही लढाई सोपी नाही. टक्कर देण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली. आपसात लढण्याऐवजी एक होऊन लढू, अशी समजदारीची भाषा ठेच लागलेले काँग्रेस नेते करू लागले आहेत. मात्र, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तरांचल व मणिपूर या पाच राज्याच्या निकालांनी काँग्रेस नेत्यांसह लढण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. इच्छुक कार्यकर्ते दिवसभर एकमेकांना फोन करून चिंता व्यक्त करीत होते. काही कार्यकर्ते तर काँग्रेस नेत्यांनाच दोष देत होते.

या निकालांनी भाजपने होळीपूर्वीच गुलाल उधळला. असाच गुलाल महापालिकेच्या निवडणुकीतही उधळू, असा दावा करीत भाजप नेते काँग्रेस नेत्यांना दिवसभर डिवचताना दिसले.

भाजपमधील आऊटगोईंग थांबणार

दक्षिण नागपुरातील छोटू भोयर व सतीश होले या दोन नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी ही जमेची बाजू होती. भाजपमधील आणखी काही नगरसेवक व वजनदार कार्यकर्ते अशीच वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत होते. काँग्रेस नेत्यांशी प्राथमिक चर्चाही आटोपल्या होत्या. मात्र, पाच राज्याच्या निकालाने अजूनही भाजपचीच हवा असल्याचा मेसेज गेला. त्यामुळे आता भाजपमधील आऊटगोईंग थांबण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेत्यांचा कस लागणार

या निकालांनी भाजपचा पगडा कायम असल्याचे पुन्हा एकदा नागरिकांच्या मनावर कोरल्या गेले. त्यामुळे नागरिकांच्या मनातून भाजपची पाटी कोरी करण्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. संघटन बळकट करून थेट गल्ली, वस्त्यात शिरून ताकदीने बाजू मांडावी लागेल. काँग्रेस नेत्यांनी हे ‘मॅनेजमेंट’ वेळीच केले नाही तर कार्यकर्ते निराशेच्या गर्तेत जाण्याचा धोका आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा