शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

राजकीय पक्षांना मिळणार शेतकऱ्यांचे आव्हान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा-काँग्रेसला दूर ठेवत येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत शनिवारी नागपुरात शेतकरी नेते व बुद्धिजींवीची महत्त्वाची बैठक पार पडली. याबैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली.लोकजागर अभियानच्यावतीने शनिवारी राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट ...

ठळक मुद्देनवीन राजकीय पर्याय देणार : शेतकरी नेते व बुद्धिजीवींचे मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा-काँग्रेसला दूर ठेवत येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत शनिवारी नागपुरात शेतकरी नेते व बुद्धिजींवीची महत्त्वाची बैठक पार पडली. याबैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली.लोकजागर अभियानच्यावतीने शनिवारी राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकरनगर चौक येथे राज्यातील काही निवडक शेतकरी नेते, पत्रकार व बुद्धिजीवींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी नेते विजय जावंधिया, चंद्रकांत वानखडे, अमर हबीब, प्रा. शरद पाटील, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, श्रीकांत तराळ, राम नेवले, अमिताभ पावडे, विजय देशमुख, महादेव मिरगे, प्रा. संजय वानखेडे, गजानन अमदाबादकर, नारायण जांभुळे, डॉ. वसंत शिरभाते, राम घोडे, देवीदास लांजेवार यांच्यासह वेगवेगळ्या परिसरांमध्ये शेतकरी संघटनेचे काम करणारे तरुणकार्यकर्ते उपस्थित होते.‘मी एक मतदार आहे. पण काँग्रेस, भाजपला मी मतदान करू शकत नाही. त्यामुळे मतदानासाठी पर्याय असावा. मी केलेले मतदान हे शेतकऱ्यांचे बळ वाढवणारे असावे. यासाठी राज्यभर पुणे, मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी बैठक घेण्यात येणार असून त्या त्या भागातल्या शेतकरी नेत्यांना यात सहभागी केले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब व्यक्त केला आहे.'शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा'भाजप आणि काँग्रेसही शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, नवीन राजकीय पर्याय देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ‘शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा’ या नाऱ्यासह शेतकऱ्यांची मुले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे लोकजगार अभियानाचे अध्यक्ष व या शेतकरी बैठकीचे आयोजक ज्येष्ठ कवी प्रा. ज्ञानेश वाकूडकर यांनी सांगितले. लवकरच शेतकरी नेते आणि तरुण शेतकरी कार्यकर्ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान विभागीय स्तरावर बैठका घेण्यात येणार असून नवीन राजकीय पक्षाची घोषणाही लवकरच करण्यात येईल. राजकीय पर्याय म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मुले निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवल्या जातील. यात १०० युवा महाराष्ट्र नवा' या घोषणेप्रमाणे १०० जागांवर तरुण निवडणूक लढवतील. लोकसभा निवडणुकीतही काही जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर