शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राजकीय पक्षांना मिळणार शेतकऱ्यांचे आव्हान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा-काँग्रेसला दूर ठेवत येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत शनिवारी नागपुरात शेतकरी नेते व बुद्धिजींवीची महत्त्वाची बैठक पार पडली. याबैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली.लोकजागर अभियानच्यावतीने शनिवारी राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट ...

ठळक मुद्देनवीन राजकीय पर्याय देणार : शेतकरी नेते व बुद्धिजीवींचे मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा-काँग्रेसला दूर ठेवत येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत शनिवारी नागपुरात शेतकरी नेते व बुद्धिजींवीची महत्त्वाची बैठक पार पडली. याबैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली.लोकजागर अभियानच्यावतीने शनिवारी राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकरनगर चौक येथे राज्यातील काही निवडक शेतकरी नेते, पत्रकार व बुद्धिजीवींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी नेते विजय जावंधिया, चंद्रकांत वानखडे, अमर हबीब, प्रा. शरद पाटील, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, श्रीकांत तराळ, राम नेवले, अमिताभ पावडे, विजय देशमुख, महादेव मिरगे, प्रा. संजय वानखेडे, गजानन अमदाबादकर, नारायण जांभुळे, डॉ. वसंत शिरभाते, राम घोडे, देवीदास लांजेवार यांच्यासह वेगवेगळ्या परिसरांमध्ये शेतकरी संघटनेचे काम करणारे तरुणकार्यकर्ते उपस्थित होते.‘मी एक मतदार आहे. पण काँग्रेस, भाजपला मी मतदान करू शकत नाही. त्यामुळे मतदानासाठी पर्याय असावा. मी केलेले मतदान हे शेतकऱ्यांचे बळ वाढवणारे असावे. यासाठी राज्यभर पुणे, मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी बैठक घेण्यात येणार असून त्या त्या भागातल्या शेतकरी नेत्यांना यात सहभागी केले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब व्यक्त केला आहे.'शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा'भाजप आणि काँग्रेसही शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, नवीन राजकीय पर्याय देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ‘शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा’ या नाऱ्यासह शेतकऱ्यांची मुले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे लोकजगार अभियानाचे अध्यक्ष व या शेतकरी बैठकीचे आयोजक ज्येष्ठ कवी प्रा. ज्ञानेश वाकूडकर यांनी सांगितले. लवकरच शेतकरी नेते आणि तरुण शेतकरी कार्यकर्ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान विभागीय स्तरावर बैठका घेण्यात येणार असून नवीन राजकीय पक्षाची घोषणाही लवकरच करण्यात येईल. राजकीय पर्याय म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मुले निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवल्या जातील. यात १०० युवा महाराष्ट्र नवा' या घोषणेप्रमाणे १०० जागांवर तरुण निवडणूक लढवतील. लोकसभा निवडणुकीतही काही जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर