शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

राजकीय पक्षांना मिळणार शेतकऱ्यांचे आव्हान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा-काँग्रेसला दूर ठेवत येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत शनिवारी नागपुरात शेतकरी नेते व बुद्धिजींवीची महत्त्वाची बैठक पार पडली. याबैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली.लोकजागर अभियानच्यावतीने शनिवारी राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट ...

ठळक मुद्देनवीन राजकीय पर्याय देणार : शेतकरी नेते व बुद्धिजीवींचे मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा-काँग्रेसला दूर ठेवत येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत शनिवारी नागपुरात शेतकरी नेते व बुद्धिजींवीची महत्त्वाची बैठक पार पडली. याबैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली.लोकजागर अभियानच्यावतीने शनिवारी राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकरनगर चौक येथे राज्यातील काही निवडक शेतकरी नेते, पत्रकार व बुद्धिजीवींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी नेते विजय जावंधिया, चंद्रकांत वानखडे, अमर हबीब, प्रा. शरद पाटील, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, श्रीकांत तराळ, राम नेवले, अमिताभ पावडे, विजय देशमुख, महादेव मिरगे, प्रा. संजय वानखेडे, गजानन अमदाबादकर, नारायण जांभुळे, डॉ. वसंत शिरभाते, राम घोडे, देवीदास लांजेवार यांच्यासह वेगवेगळ्या परिसरांमध्ये शेतकरी संघटनेचे काम करणारे तरुणकार्यकर्ते उपस्थित होते.‘मी एक मतदार आहे. पण काँग्रेस, भाजपला मी मतदान करू शकत नाही. त्यामुळे मतदानासाठी पर्याय असावा. मी केलेले मतदान हे शेतकऱ्यांचे बळ वाढवणारे असावे. यासाठी राज्यभर पुणे, मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी बैठक घेण्यात येणार असून त्या त्या भागातल्या शेतकरी नेत्यांना यात सहभागी केले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब व्यक्त केला आहे.'शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा'भाजप आणि काँग्रेसही शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, नवीन राजकीय पर्याय देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ‘शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा’ या नाऱ्यासह शेतकऱ्यांची मुले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे लोकजगार अभियानाचे अध्यक्ष व या शेतकरी बैठकीचे आयोजक ज्येष्ठ कवी प्रा. ज्ञानेश वाकूडकर यांनी सांगितले. लवकरच शेतकरी नेते आणि तरुण शेतकरी कार्यकर्ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान विभागीय स्तरावर बैठका घेण्यात येणार असून नवीन राजकीय पक्षाची घोषणाही लवकरच करण्यात येईल. राजकीय पर्याय म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मुले निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवल्या जातील. यात १०० युवा महाराष्ट्र नवा' या घोषणेप्रमाणे १०० जागांवर तरुण निवडणूक लढवतील. लोकसभा निवडणुकीतही काही जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर