शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

उपराजधानीतील पन्नाशी ओलांडलेले पोलीस कार्यालयातच काम करणार; पोलीस आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:10 IST

५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलीस दलातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातल्याचे स्पष्ट होताच हादरलेल्या पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.त्यामुळे सुमारे एक हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्त अथवा इतर बाहेर ठिकाणचे कर्तव्य बजावणार नाहीत. तर ते पोलीस ठाणे अथवा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात राहूनच कर्तव्यपूर्ती करणार आहेत. कोरोनाचा संसर्ग अंधाधुंद गोळीबारासारखा धोकादायक आहे. कुणाला कशा पद्धतीने प्रादुर्भाव होईल याचा कसलीही नेम नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला धोका जास्त असतो. त्यात ज्यांना उच्च रक्तदाब. मधुमेहासारखी व्याधी आहे, अशांसाठी कोरोना फारच धोकादायक असतो, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. नागपूर पोलीस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातल्याचे शनिवारी उघडकीस आले आणि अवघ्या पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे खबरदारी नव्हे तर अतिखबरदारीचे अनेक उपाय हाती घेण्यात आले आहेत. शहरातील जे परिसर (रेड झोन) सील करण्यात आले, अशा ठिकाणच्या पोलिसांना सुरक्षा किट देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अन्य सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना सावधगिरीच्या सर्व उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय शहर पोलीस दलात असलेल्या ५० वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला फिल्डवर पाठवायचे नाही. त्यांना कोणत्याही बंदोबस्ताची ड्यूटी देऊ नका, पोलिस ठाण्यात अथवा कार्यालयातच बसवून त्यांच्याकडून काम करून घ्या, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहर पोलिस दलातील सुमारे एक हजार पोलिस कर्मचारी ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना रक्तदाब, मधुमेह आणि दुसरी कोणती व्याधी आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त आता कार्यालयीन कामकाजच देण्यात आले आहे.

लष्करी दलाची गरज नाहीसरकारने मागणी केल्यानुसार महाराष्ट्राला केंद्राकडून लष्करी जवानांच्या १० कंपन्या मिळाल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ते जाहीर केले. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याकडे विचारणा केली असता, नागपुरात पोलिसांचे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे येथे लष्करी दलाच्या कंपनीची फारशी गरज नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस