शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

उपराजधानीतील पन्नाशी ओलांडलेले पोलीस कार्यालयातच काम करणार; पोलीस आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:10 IST

५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलीस दलातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातल्याचे स्पष्ट होताच हादरलेल्या पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.त्यामुळे सुमारे एक हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्त अथवा इतर बाहेर ठिकाणचे कर्तव्य बजावणार नाहीत. तर ते पोलीस ठाणे अथवा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात राहूनच कर्तव्यपूर्ती करणार आहेत. कोरोनाचा संसर्ग अंधाधुंद गोळीबारासारखा धोकादायक आहे. कुणाला कशा पद्धतीने प्रादुर्भाव होईल याचा कसलीही नेम नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला धोका जास्त असतो. त्यात ज्यांना उच्च रक्तदाब. मधुमेहासारखी व्याधी आहे, अशांसाठी कोरोना फारच धोकादायक असतो, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. नागपूर पोलीस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातल्याचे शनिवारी उघडकीस आले आणि अवघ्या पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे खबरदारी नव्हे तर अतिखबरदारीचे अनेक उपाय हाती घेण्यात आले आहेत. शहरातील जे परिसर (रेड झोन) सील करण्यात आले, अशा ठिकाणच्या पोलिसांना सुरक्षा किट देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अन्य सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना सावधगिरीच्या सर्व उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय शहर पोलीस दलात असलेल्या ५० वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला फिल्डवर पाठवायचे नाही. त्यांना कोणत्याही बंदोबस्ताची ड्यूटी देऊ नका, पोलिस ठाण्यात अथवा कार्यालयातच बसवून त्यांच्याकडून काम करून घ्या, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहर पोलिस दलातील सुमारे एक हजार पोलिस कर्मचारी ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना रक्तदाब, मधुमेह आणि दुसरी कोणती व्याधी आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त आता कार्यालयीन कामकाजच देण्यात आले आहे.

लष्करी दलाची गरज नाहीसरकारने मागणी केल्यानुसार महाराष्ट्राला केंद्राकडून लष्करी जवानांच्या १० कंपन्या मिळाल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ते जाहीर केले. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याकडे विचारणा केली असता, नागपुरात पोलिसांचे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे येथे लष्करी दलाच्या कंपनीची फारशी गरज नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस