शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

उपराजधानीतील पन्नाशी ओलांडलेले पोलीस कार्यालयातच काम करणार; पोलीस आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:10 IST

५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलीस दलातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातल्याचे स्पष्ट होताच हादरलेल्या पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.त्यामुळे सुमारे एक हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्त अथवा इतर बाहेर ठिकाणचे कर्तव्य बजावणार नाहीत. तर ते पोलीस ठाणे अथवा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात राहूनच कर्तव्यपूर्ती करणार आहेत. कोरोनाचा संसर्ग अंधाधुंद गोळीबारासारखा धोकादायक आहे. कुणाला कशा पद्धतीने प्रादुर्भाव होईल याचा कसलीही नेम नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला धोका जास्त असतो. त्यात ज्यांना उच्च रक्तदाब. मधुमेहासारखी व्याधी आहे, अशांसाठी कोरोना फारच धोकादायक असतो, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. नागपूर पोलीस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातल्याचे शनिवारी उघडकीस आले आणि अवघ्या पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे खबरदारी नव्हे तर अतिखबरदारीचे अनेक उपाय हाती घेण्यात आले आहेत. शहरातील जे परिसर (रेड झोन) सील करण्यात आले, अशा ठिकाणच्या पोलिसांना सुरक्षा किट देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अन्य सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना सावधगिरीच्या सर्व उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय शहर पोलीस दलात असलेल्या ५० वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला फिल्डवर पाठवायचे नाही. त्यांना कोणत्याही बंदोबस्ताची ड्यूटी देऊ नका, पोलिस ठाण्यात अथवा कार्यालयातच बसवून त्यांच्याकडून काम करून घ्या, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहर पोलिस दलातील सुमारे एक हजार पोलिस कर्मचारी ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना रक्तदाब, मधुमेह आणि दुसरी कोणती व्याधी आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त आता कार्यालयीन कामकाजच देण्यात आले आहे.

लष्करी दलाची गरज नाहीसरकारने मागणी केल्यानुसार महाराष्ट्राला केंद्राकडून लष्करी जवानांच्या १० कंपन्या मिळाल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ते जाहीर केले. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याकडे विचारणा केली असता, नागपुरात पोलिसांचे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे येथे लष्करी दलाच्या कंपनीची फारशी गरज नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस