शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपुरात पोलीस शिपायाने लावली घरात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:00 IST

एका छोट्या मात्र सुखी कुटुंबात कोतवाली ठाण्यातील एका पोलीस शिपायाने आग लावली आहे. या कुटुंबातील महिलेला पोलीस शिपायाने आपल्या नादी लावून सुखी संसारात विष कालवले आहे. परिणामी महिलेचा पती, मुली आणि कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले असून, या कुटुंबाचा बंदोबस्त करावा म्हणून सदर व्यक्तीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

ठळक मुद्दे१६ वर्षांच्या सुखी संसाराला ग्रहण : पोलीस आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका छोट्या मात्र सुखी कुटुंबात कोतवाली ठाण्यातील एका पोलीस शिपायाने आग लावली आहे. या कुटुंबातील महिलेला पोलीस शिपायाने आपल्या नादी लावून सुखी संसारात विष कालवले आहे. परिणामी महिलेचा पती, मुली आणि कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले असून, या कुटुंबाचा बंदोबस्त करावा म्हणून सदर व्यक्तीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.तक्रार करणारा व्यक्ती (वय ४०) भुतेश्वरनगर गंगाबाई घाट जवळ राहतो. त्याने आयुक्तांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे घरातच छोटेसे किराणा दुकान असून, पत्नी (वय ३६) तसेच दोन मुली व आईवडिलांसह तो आपले कुटुंब चालवतो. ३ फेब्रुवारीला त्याच्या बहिणीने त्याची तक्रार केल्यामुळे कोतवाली पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलवून घेतले आणि त्याची बाजू न ऐकता अटक केली. यावेळी त्याची पत्नी त्याला सोडविण्यासाठी ठाण्यात आली. पत्नीने यावेळी ठाण्यात असलेल्या रंजित राठोर नामक पोलीस शिपायाला मदत मागितली. त्याने आपली साहेबांसोबत चांगली मैत्री असून, तुम्ही घाबरू नका, तुमच्या पतीला सोडविण्यासाठी मदत करतो, आश्वासन देऊन तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला आपला नंबर दिला. दरम्यान, दुपारी ४ वाजता न्यायालयातून पीडित व्यक्तीची सुटका झाली. त्यानंतर पोलीस शिपायाने सकाळ, सायंकाळ पीडित व्यक्तीच्या पत्नीला गुड मॉर्निंग, गूड नाईटचे मेसेज पाठविणे सुरू केले. बराच वेळेपासून नाश्ता बनवायला गेलेली पत्नी आली नसल्याने अचानक तो किचनमध्ये गेला. यावेळी पत्नी मोबाईलवर दुसऱ्यासोबत बोलताना दिसली. पतीला पाहून ती घाबरल्याने तिने मोबाईल लपवून ठेवला. पतीने तिला विचारणा केली असता तिने बनवाबनवी केली. त्यामुळे संशय वाढल्याने त्याने तिचा मोबाईल नंबर तपासला असता ती राठोरसोबत नेहमी बोलत असल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबात वादळ येऊ शकते, हे ध्यानात आल्याने पतीने पत्नीला समजावतानाच राठोरला फोन करून आपल्या कुटुंबाला विस्कळीत न करण्याची विनंती केली. यावेळी राठोरने त्याला अश्लील शिवीगाळ करून खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली.यापुढे पत्नीला टोकले तर परिणाम चांगले होणार नाही, अशीही धमकी दिली. त्यावरून पती-पत्नीत मोठा वाद झाला. त्यानंतर पत्नी मुलींसह घरून निघून गेली आणि साळ्याने जोरदार मारहाण केली. एवढेच नव्हे तर नंतर राठोर आणि त्याच्या सोबतच्या तीन पोलिसांनी ठाण्यात बोलवून बेदम मारहाण केली. पुन्हा पत्नीसोबत काही केल्यास पाच वर्षांसाठी आत टाकेन, अशी धमकी दिली. दुसरीकडे पत्नीने राठोरसोबत घरी येऊन मुलींचे व तिचे कपडे, दागिने आणि कागदपत्रे सोबत नेले. तेव्हापासून पत्नीला फोन करायचा नाही, भेटायचे नाही, अशी पोलीस शिपाई राठोरने धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या एकूणच प्रकारामुळे आपले छोटे मात्र सुखी कुटुंब विस्कळीत झाले असून, राठोर यासाठी जबाबदार असल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे.कोणती कारवाई होणार?चार दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने महिला रेडिओ जॉकीला आक्षेपार्ह मेसेज केल्यामुळे त्याच्यावर सीताबर्डीत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची चर्चा ताजीच असताना आता एका पोलीस शिपायाने एका कुटुंबात कलह वाढवल्याने अवघ्या पोलीस दलाच्याच प्रतिमेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात आता कोणती भूमिका घेतात, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसfireआग