शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मोतीबाग परिसरात गुंडांकडून पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:04 IST

मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडूनच ही घटना दाबून ठेवण्यात आली.

ठळक मुद्देअवैध धंद्यावर करण्यात आलेल्या कारवाईतून घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडूनच ही घटना दाबून ठेवण्यात आली.सूत्रानुसार पहेलवान बाबा दरगाँह जवळ कालू नावाच्या गुंडाचा दबदबा आहे. तो फायरींगसह अनेक कारवाईमध्ये लिप्त आहे. काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून जमानत मिळवून बाहेर आला आहे. कालूचा मोतीबाग परिसरात दारू, जुगार व मटका व मादक पदार्थाच्या विक्रीचा अड्डा आहे. त्याच्या साथीदाराने परिसरात असलेल्या रेल्वे क्वॉर्टरवर कब्जा केला आहे. ३१ जुलै रोजी रात्री पोलीस पथकाने कालूच्या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांना बघून कालू व त्याचे साथीदार संतप्त झाले. त्यांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे पोलीस मागे हटले. दगडफेकीत जखमी होऊ नये म्हणून तेथून पाय काढला. जवळच एका चहाच्या टपरीजवळ एकत्र झाले. पोलीस चहाच्या टपरीवर उभे असल्याची माहिती पडताच गुंड तिथे पोहचले. त्यांनी टपरीवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी टपरी चालकाला घटनेची तक्रार देण्यास सांगितले. पण टपरी चालकाने तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस रिकाम्या हाताने परत गेले.पाच महिन्यापूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावरसुद्धा इप्पा गँगने हल्ला केला होता. इप्पा गॅँगला पकडण्यासाठी गेलेले एपीआय ज्ञानेश्वर भदोडकर व त्यांच्या पथकावर हल्ला केला. त्यात पोलिसांचे वाहन क्षतिग्रस्त झाले होते. त्यानंतर पोलिसांनी इप्पा गँगच्या १३ गुंडावर मकोकाची कारवाई केली होती. यातील पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणात आरोपींचे नाव कमी केल्यामुळे पोलिसांची फजिती झाली होती. लोकमतने सर्वात पहिले हे प्रकरण पुढे आणले होते. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंडांना संरक्षण देणार नाही, यापुढे त्यांची खैर नाही, असा दावा केला आहे. डॉ. उपाध्याय यांच्या शैलीशी नागपूरकर चांगलेच परिचित आहे. त्यामुळे आता गुंडाची खैर नाही, असा विश्वास नागरिकांना आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस