शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नागपुरातील मोतीबाग परिसरात गुंडांकडून पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:04 IST

मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडूनच ही घटना दाबून ठेवण्यात आली.

ठळक मुद्देअवैध धंद्यावर करण्यात आलेल्या कारवाईतून घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडूनच ही घटना दाबून ठेवण्यात आली.सूत्रानुसार पहेलवान बाबा दरगाँह जवळ कालू नावाच्या गुंडाचा दबदबा आहे. तो फायरींगसह अनेक कारवाईमध्ये लिप्त आहे. काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून जमानत मिळवून बाहेर आला आहे. कालूचा मोतीबाग परिसरात दारू, जुगार व मटका व मादक पदार्थाच्या विक्रीचा अड्डा आहे. त्याच्या साथीदाराने परिसरात असलेल्या रेल्वे क्वॉर्टरवर कब्जा केला आहे. ३१ जुलै रोजी रात्री पोलीस पथकाने कालूच्या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांना बघून कालू व त्याचे साथीदार संतप्त झाले. त्यांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे पोलीस मागे हटले. दगडफेकीत जखमी होऊ नये म्हणून तेथून पाय काढला. जवळच एका चहाच्या टपरीजवळ एकत्र झाले. पोलीस चहाच्या टपरीवर उभे असल्याची माहिती पडताच गुंड तिथे पोहचले. त्यांनी टपरीवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी टपरी चालकाला घटनेची तक्रार देण्यास सांगितले. पण टपरी चालकाने तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस रिकाम्या हाताने परत गेले.पाच महिन्यापूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावरसुद्धा इप्पा गँगने हल्ला केला होता. इप्पा गॅँगला पकडण्यासाठी गेलेले एपीआय ज्ञानेश्वर भदोडकर व त्यांच्या पथकावर हल्ला केला. त्यात पोलिसांचे वाहन क्षतिग्रस्त झाले होते. त्यानंतर पोलिसांनी इप्पा गँगच्या १३ गुंडावर मकोकाची कारवाई केली होती. यातील पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणात आरोपींचे नाव कमी केल्यामुळे पोलिसांची फजिती झाली होती. लोकमतने सर्वात पहिले हे प्रकरण पुढे आणले होते. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंडांना संरक्षण देणार नाही, यापुढे त्यांची खैर नाही, असा दावा केला आहे. डॉ. उपाध्याय यांच्या शैलीशी नागपूरकर चांगलेच परिचित आहे. त्यामुळे आता गुंडाची खैर नाही, असा विश्वास नागरिकांना आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस