शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपुरातील मोतीबाग परिसरात गुंडांकडून पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:04 IST

मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडूनच ही घटना दाबून ठेवण्यात आली.

ठळक मुद्देअवैध धंद्यावर करण्यात आलेल्या कारवाईतून घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडूनच ही घटना दाबून ठेवण्यात आली.सूत्रानुसार पहेलवान बाबा दरगाँह जवळ कालू नावाच्या गुंडाचा दबदबा आहे. तो फायरींगसह अनेक कारवाईमध्ये लिप्त आहे. काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून जमानत मिळवून बाहेर आला आहे. कालूचा मोतीबाग परिसरात दारू, जुगार व मटका व मादक पदार्थाच्या विक्रीचा अड्डा आहे. त्याच्या साथीदाराने परिसरात असलेल्या रेल्वे क्वॉर्टरवर कब्जा केला आहे. ३१ जुलै रोजी रात्री पोलीस पथकाने कालूच्या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांना बघून कालू व त्याचे साथीदार संतप्त झाले. त्यांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे पोलीस मागे हटले. दगडफेकीत जखमी होऊ नये म्हणून तेथून पाय काढला. जवळच एका चहाच्या टपरीजवळ एकत्र झाले. पोलीस चहाच्या टपरीवर उभे असल्याची माहिती पडताच गुंड तिथे पोहचले. त्यांनी टपरीवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी टपरी चालकाला घटनेची तक्रार देण्यास सांगितले. पण टपरी चालकाने तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस रिकाम्या हाताने परत गेले.पाच महिन्यापूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावरसुद्धा इप्पा गँगने हल्ला केला होता. इप्पा गॅँगला पकडण्यासाठी गेलेले एपीआय ज्ञानेश्वर भदोडकर व त्यांच्या पथकावर हल्ला केला. त्यात पोलिसांचे वाहन क्षतिग्रस्त झाले होते. त्यानंतर पोलिसांनी इप्पा गँगच्या १३ गुंडावर मकोकाची कारवाई केली होती. यातील पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणात आरोपींचे नाव कमी केल्यामुळे पोलिसांची फजिती झाली होती. लोकमतने सर्वात पहिले हे प्रकरण पुढे आणले होते. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंडांना संरक्षण देणार नाही, यापुढे त्यांची खैर नाही, असा दावा केला आहे. डॉ. उपाध्याय यांच्या शैलीशी नागपूरकर चांगलेच परिचित आहे. त्यामुळे आता गुंडाची खैर नाही, असा विश्वास नागरिकांना आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस