कवींनी केले १२१ तास अखंड काव्यवाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST2021-09-12T04:12:18+5:302021-09-12T04:12:18+5:30
- ‘सखा माझा कृष्ण’ उपक्रम : साहित्य संपदाचे कविसंमेलन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साहित्य संपदाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या ...

कवींनी केले १२१ तास अखंड काव्यवाचन
- ‘सखा माझा कृष्ण’ उपक्रम : साहित्य संपदाचे कविसंमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साहित्य संपदाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर आयोजित केलेल्या अखंड कविसंमेलनात कवींनी सलग १२१ तास काव्यवाचन करीत विक्रमाला गवसणी घातली आहे.
‘सखा माझा कृष्ण’ या उपक्रमांतर्गत हे कविसंमेलन पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे होते. यावेळी त्यांनी बोली भाषांचे महत्त्व पटवून देताना बोलीभाषांचे उच्चारशास्त्र अभ्यासण्याचे आवाहन केले. यावेळी साहित्य संपदाचे संस्थापक वैभव धनावडे व सामाजिक कार्यकर्ते मुन्नालाल रहांगडाले उपस्थित होते. समाजासाठी विशेष योगदान देणारे विकास ग्रुपचे किशोर पेटकर व हिरदिलाल ठाकरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून जीविता पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली होती. याप्रसंगी संगीता थोरात यांच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. ऋतुजा तायडे-महिंद्रे निर्मित सरस्वती चिन्हाचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले. संमेलनात महंत कवी राजशास्त्री, संपदा गणोरकर व इतर निमंत्रित कवींनी काव्य रसिकांना खिळवून ठेवले. सहा वर्षीय स्पृहा मेहर हिचे काव्य सादरीकरण विशेष लक्षणीय ठरले. यावेळी मंजूळ चौधरी, वंदना मत्रे, वर्षा पटले उपस्थित होते.
..............