शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

पुलवामा घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे; पटोलेंसह संजय राऊत यांची चौकशीची मागणी

By कमलेश वानखेडे | Updated: April 15, 2023 14:39 IST

देशातील जनतेतच्या मनात एक मोठा संशय मोदी सरकारबाबत निर्माण झालाय - पटोले

नागपूर : जम्मू काश्मिरचे चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत स्पष्ट केलेली भूमिका भयावह आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घातक आहे. राष्ट्रद्रोह आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देशाला उत्तर द्यावे, या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली.

पटोले म्हणाले, ज्या पद्धतीने पुलवामा घटनेमध्ये देशाच्या सुरक्षेसाठी देशासाठी संरक्षणासाठी निरपराध सैनिकांचा मृत्यू होणे आणि त्याचे राजकरण करून देशाची निवडणूक जिंकणे याचा प्रयत्न झाला आहे. या विश्वासघातकी व्यवस्थेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे. देशातील जनतेतच्या मनात एक मोठा संशय मोदी सरकारबाबत निर्माण झाला आहे. भाजपचे संघटन महासचिव राम माधव यांनी जम्मू काश्मिरच्या सुरक्षेसाठी जे काही पैसे दिले जातात, त्या फाईलवर सही सही करण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही मलिक यांनी केली आहे. यावरून सुरक्षेतही भाजप किती मोठा भ्रष्टाचार करीत आहे हे देखील स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांना उत्तर द्यावे लागेल, अशी मागणी पटोले यांनी केली.

सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा - राऊत 

हा मोठा गौप्यस्फोट नाही, ही गोष्ट देशाला आधीच माहीत होते. त्यावेळचे सत्ताधारी यांना निवडणुका जिंकण्यासाठी काहितरी गडबड करतील हे माहीत होतं. हे प्रश्न आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला. १५० किलो आरडीएक्स त्याठिकाणी गेले, आरडीएक्स पोहचले कसे, पुलवामा रस्त्यावर जवान का पाठवले, त्यांच्यासाठी विमान का पाठवले नाही, की जवानांची हत्या व्हावी आणि निवडणुका जिंकायच्या असा आरोप केल्यावर आमच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला. मात्र आज सत्यपाल मलिक यांनी थेट सत्य मांडले. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चालविला पाहिजे, आणि जे दोषी आहे त्यांचे कोर्ट मार्शल व्हायला पाहिजे. राजकीय लाभ घेण्यासाठी या हत्येचा फायदा केला गेला, याची चौकशी व्हावी खा. संजय राऊत यांनी नागपुरात केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला