शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

भारताला जगात अव्वल बनवणं हाच PM मोदींचा संकल्प, १३० कोटी जनतेनं एक पाऊल पुढे टाकावं; अमित शाह यांची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 14:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की २०४७ पर्यंत भारत जगातं नेतृत्व करताना दिसेल.

नागपूर-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की २०४७ पर्यंत भारत जगातं नेतृत्व करताना दिसेल. यासाठी देशातील प्रत्येक नागरिकानं एक पाऊल पुढे टाकलं तरी देश १३० कोटी पावलं पुढे जाऊ शकतो इतकी आपल्या देशाची ताकद आहे, असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले. ते नागपूर लोकमतच्या सुवर्ण महोत्सव आणि जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यात बोलत होते. 

"आज राजकारणात एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागतात, पण.."; फडणवीसांचं महत्वाचं विधान!

अमित शाह यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात झालेल्या बदलांची आणि घेतल्या गेलेल्या कटू निर्णयांमुळे देशाला मिळालेली नवी दिशा याबाबत माहिती दिली. "भारत आज वेगानं पुढे जात आहे. मला विश्वास आहे की पंतप्रधान मोदींनी जो संकल्प केला आहे की २०४७ साली भारत जगात अव्वल झाला पाहिजे. कदाचित त्यावेळी आपल्यापैकी अनेकजण नसतीलही. पण मी इतकं विश्वासानं सांगू शकतो की २०४७ मधील युवा जगातील अव्वल भारताचं प्रतिनिधीत्व करणारा असेल. जर १३० कोटी जनता तर पाऊल पुढे आली तर संपूर्ण देश १३० पावलं पुढे जातो ही आपली ताकद आहे", असं अमित शाह म्हणाले. 

भारताला जगात अव्वल बनवणं हेच लक्ष्यभारत जगात सर्वप्रथम झाला पाहिजे हेच लक्ष्य घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत, असं अमित शाह म्हणाले. "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या सुरू आहे आणि यात आज आपण पुढे गेलो आहोत. आम्ही कधीच मतांचं राजकारण केलं नाही. मोदीजी सत्तेत येण्याआधी देशात अंतर्गत सुरक्षेबाबतचे तीन मोठे हॉटस्पॉट होते. जम्मू-काश्मीर, नॉर्थ-इस्ट आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला भाग जो महाराष्ट्र, विदर्भाच्या सीमेतही आहे. मी आज दाव्यानं सांगू शकतो की या तिन्ही क्षेत्रात हिंसाचाराच्या घटनांमध्ये ८० टक्के घट करण्याचं काम मोदींच्या नेतृत्त्वात झालं आहे. कलम ३७० हटवलं तेव्हा संसदेत भाषणं ठोकली गेली काश्मीरात रक्ताचे पाट वाहतील. रक्ताचे पाट सोडा साधे लहान दगड देखील कुणी मारू शकलं नाही. दगडफेक व्हायची, हिंसाचार व्हायचा आता सगळं बंद झालं. आता काश्मीरात थिएटर चालतात, गुण्यागोविंदानं सर्व राहतात आणि १ कोटी ८० लाख पर्यटकांनी काश्मीला एका वर्षात भेट दिली आहे. गेल्या ७० वर्षात काश्मीरमध्ये १२ हजार कोटींची गुणवणूक आली. पण गेल्या ८ वर्षात आम्ही १२ हजार कोटी काश्मीरमध्ये गुंतवणूक आणली", असं अमित शाह म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाह