शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

भारताला जगात अव्वल बनवणं हाच PM मोदींचा संकल्प, १३० कोटी जनतेनं एक पाऊल पुढे टाकावं; अमित शाह यांची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 14:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की २०४७ पर्यंत भारत जगातं नेतृत्व करताना दिसेल.

नागपूर-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की २०४७ पर्यंत भारत जगातं नेतृत्व करताना दिसेल. यासाठी देशातील प्रत्येक नागरिकानं एक पाऊल पुढे टाकलं तरी देश १३० कोटी पावलं पुढे जाऊ शकतो इतकी आपल्या देशाची ताकद आहे, असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले. ते नागपूर लोकमतच्या सुवर्ण महोत्सव आणि जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यात बोलत होते. 

"आज राजकारणात एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागतात, पण.."; फडणवीसांचं महत्वाचं विधान!

अमित शाह यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात झालेल्या बदलांची आणि घेतल्या गेलेल्या कटू निर्णयांमुळे देशाला मिळालेली नवी दिशा याबाबत माहिती दिली. "भारत आज वेगानं पुढे जात आहे. मला विश्वास आहे की पंतप्रधान मोदींनी जो संकल्प केला आहे की २०४७ साली भारत जगात अव्वल झाला पाहिजे. कदाचित त्यावेळी आपल्यापैकी अनेकजण नसतीलही. पण मी इतकं विश्वासानं सांगू शकतो की २०४७ मधील युवा जगातील अव्वल भारताचं प्रतिनिधीत्व करणारा असेल. जर १३० कोटी जनता तर पाऊल पुढे आली तर संपूर्ण देश १३० पावलं पुढे जातो ही आपली ताकद आहे", असं अमित शाह म्हणाले. 

भारताला जगात अव्वल बनवणं हेच लक्ष्यभारत जगात सर्वप्रथम झाला पाहिजे हेच लक्ष्य घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत, असं अमित शाह म्हणाले. "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या सुरू आहे आणि यात आज आपण पुढे गेलो आहोत. आम्ही कधीच मतांचं राजकारण केलं नाही. मोदीजी सत्तेत येण्याआधी देशात अंतर्गत सुरक्षेबाबतचे तीन मोठे हॉटस्पॉट होते. जम्मू-काश्मीर, नॉर्थ-इस्ट आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला भाग जो महाराष्ट्र, विदर्भाच्या सीमेतही आहे. मी आज दाव्यानं सांगू शकतो की या तिन्ही क्षेत्रात हिंसाचाराच्या घटनांमध्ये ८० टक्के घट करण्याचं काम मोदींच्या नेतृत्त्वात झालं आहे. कलम ३७० हटवलं तेव्हा संसदेत भाषणं ठोकली गेली काश्मीरात रक्ताचे पाट वाहतील. रक्ताचे पाट सोडा साधे लहान दगड देखील कुणी मारू शकलं नाही. दगडफेक व्हायची, हिंसाचार व्हायचा आता सगळं बंद झालं. आता काश्मीरात थिएटर चालतात, गुण्यागोविंदानं सर्व राहतात आणि १ कोटी ८० लाख पर्यटकांनी काश्मीला एका वर्षात भेट दिली आहे. गेल्या ७० वर्षात काश्मीरमध्ये १२ हजार कोटींची गुणवणूक आली. पण गेल्या ८ वर्षात आम्ही १२ हजार कोटी काश्मीरमध्ये गुंतवणूक आणली", असं अमित शाह म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाह