शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

प्लास्टिकबंदी; उशिरा सुचलेले शहाणपण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:11 PM

पर्यावरण संवर्धनासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याची गरज आहे. शासनाने घेतलेल्या प्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका आहे. बंदीचा निर्णय म्हणजे राज्य शासनाला उशिरा सुचलेले शहापण होय, असे मत माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी शनिवारी मांडले.

ठळक मुद्देआशिष जयस्वाल : ‘खरी-खरी प्लास्टिीकबंदी आवश्यक की अनावश्यक’ यावर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याची गरज आहे. शासनाने घेतलेल्याप्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका आहे. बंदीचा निर्णय म्हणजे राज्य शासनाला उशिरा सुचलेले शहापण होय, असे मत माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी शनिवारी मांडले.वनराई फाऊं डेशन व तेजस्विनी महिला मंचतर्फे श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित खरी-खरी प्लास्टिकबंदी आवश्यक की अनावश्यक या विषयावरील चर्चासत्रात जयस्वाल बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे गिरीश गांधी होते. व्यासपीठावर नीरीचे संशोधक डॉ. अतुल वैद्य, उद्योजक रमेश मंत्री, पर्यावरण कार्यकर्ते पराग करंदीकर, मकरंद पांढरीपांडे, अजय पाटील, महिला मंचच्या अध्यक्ष किरण मुंदडा आदी उपस्थित होते.गौण खनिजांचे उत्खनन करताना खनिकर्म विभागात प्राप्त होणाऱ्या महसुलातील २० टक्के निधी हा पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करणे आवश्यक आहे. परंतु राज्यात हा निधी खर्च केला जात नाही. औद्योगिक विकासात प्रदूषण अटळ आहे. याला आळा घालण्यासाठी प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे जयस्वाल म्हणाले.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा पर्यावरणासाठी घातकच असतो. असेच प्लास्टिकच्या अतिवापराचे दुष्परिणाम होत आहे. नागरिकांनी प्लास्टिक वापराचा अतिरेक टाळावा. यासाठी राज्य शासनाने घेतलेला प्लास्टिकबंदीचा निर्णय योग्यच असल्याचे प्रतिपादन अतुल वैद्य यांनी केले. विकसित देशात भारताच्या तुलनेत प्लास्टिकचा वापर अधिक आहे. परंतु प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते. मात्र आपल्या देशात वापर कमी असूनही प्लास्टिकमुळे समस्या निर्माण झाली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचे अतुल वैद्य म्हणाले.प्लास्टिकबंदीचा निर्णय योग्यच आहे. नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. लोकांनी या निर्णयाचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन मकरंद पांढरीपांडे यांनी केले. प्लास्टिकबंदी ही लोकचळवळ झाल्याशिवाय यशस्वी होणार नाही, असे मत गिरीश गांधी यांनी मांडले. प्रास्ताविक किरण मुंदडा यांनी तर सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार कल्पना मोहता यांनी मानले.

टॅग्स :Ashish Jaiswalआशीष जयस्वालPlastic banप्लॅस्टिक बंदी