शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

नागपुरातील आऊटर रिंग रोडचा प्लॅन बदलला ; शेतकऱ्यांना पुन्हा बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 14:21 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचए) रिंगरोडच्या नकाशात बदल करून रस्ता सुमारे ५०० फूट सरकवण्यात आला व पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी भूसंपादनाची नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देमाहुरझरी, भरतवाडाच्या शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास तीव्र विरोध२००६ मध्ये केले भूसंपादन, आता पुन्हा दिली नोटीसएकाच शेतातून दोनदा रस्त्यासाठी घेताहेत जमीन

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आऊटर रिंग रोडसाठी २००६ मध्ये माहुरझरी,भरतवाडा येथील शेत जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. त्याचे अवॉर्ड करून शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला. मात्र, त्या जागेवर रिंग रोड बांधण्यातच आला नाही. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचए) रिंगरोडच्या नकाशात बदल करून रस्ता सुमारे ५०० फूट सरकवण्यात आला व पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी भूसंपादनाची नोटीस बजावण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या शेतातून तर जुना व नवा असे दोन्ही रस्ते टाकण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आपल्या जमिनी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सरकारने बळजबरीने जमिनी घेतल्या तर विधानभवनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.एकाच शेतातून रस्त्यांसाठी दोनदा भूसंपादनमौजा भरतवाडा येथील प.ह.नं. १२ मधील खसरा क्रमांक ९(अ), ९(ब-२), ९ (ब३) व ९ (ब४) ही शेतजमीन उषाबाई राऊत, प्रवीण राऊत, प्रमोद राऊत यांच्या मालकीची आहे. २००६ मध्ये रिंग रोडसाठी या शेतजमिनीपैकी १.३१ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. त्यावेळी या शेतीचे दोन तुकडे पडले होते. या संपादित जमिनीवर अद्याप रिंगरोड झालेला नाही. असे असताना आता त्याच शेतीच्या दुसऱ्या टोकावरील जमीन नव्याने रिंग रोडसाठी पुन्हा अधिग्रहित करण्यात येत आहे. त्यामुळे राऊत यांच्या शेताचे तीन तुकडे पडले आहेत. एकाच शेतजमिनीतून दोनदा रस्त्यांसाठी जमीन घेऊन सरकार शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहे का, असा सवाल राऊत यांनी केला आहे.ओलिताची जमीन संत्रा, आंब्याचे नुकसानरिंग रोडसाठी २००६ मध्ये भूसंपादन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तेवढी शेतजमीन सोडून उर्वरित जागेवर संत्रा झाडांची लागवड केली. आता एनएचएने नकाशात बदल करीत रस्ता दुसरीकडून वळविल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा बगिच्याची व ओलित जमीन संपादित केली जात आहे. काही शेतकऱ्यांची आंब्याची झाडेही या अधिग्रहणात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे एकदा जमीन दिल्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा जमीन देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आऊटर रिंग रोडसाठी २००६ मध्ये नागपूर ग्रामीण तालुक्यातील भूसंपादन करण्यात आले. त्या वेळी मौजा माहुरझरी येथील २२ खसऱ्यांचा भूसंपादनात समावेश होता. तर मौजा भरतवाडा येथील याहून अधिक खसरे समाविष्ट होते. सुरुवातीला ६० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी हे भूसंपादन करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. या वेळी शेतकऱ्यांनी संबंधित रस्त्याला विरोध केला नाही. विकासात सहकार्य केले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जमिनींची मोजणी करण्यात आली व शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही देण्यात आला. त्या वेळीही नकाशावर केलेले भूसंपादन व प्रत्यक्षात ताब्यात घेतलेल्या जमिनी यात तफावत होती. एनएचएने या मोजणीनुसार मार्किंग केले असता संबंधित रस्ता भरतवाडा रेल्वे स्टेशनमधून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यानंतर एनएचएने माहुरझरी व भरतवाडा दरम्यानच्या रिंग रोडच्या नकाशात बदल केला. आधी अधिग्रहित केलेल्या जमिनीपासून सुमारे २०० ते ५०० फूट रस्ता पश्चिमेस सरकवून नव्याने मार्किंग करून नकाशा तयार करण्यात आला. एनएचएने ३० मे २०१६ रोजी या नव्या नकाशानुसार माहुरझरी व भरतवाडा येथील शेतजमिनीचे पुन्हा भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेमुळे शेतकऱ्यांना धक्का बसला. रिंग रोडसाठी एकदा जमीन दिली असताना आता पुन्हा जमिनी कशी द्यायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. शेतकऱ्यांनी एनएचएकडे आक्षेप नोंदविले. जमिनी देण्यास नकार दर्शविला. एनएचएने सुनावणी घेण्याचे सोपस्कार पार पाडले व १० जून २०१७ रोजी पेपर पब्लिकेशन जारी करीत सर्व आक्षेप फेटाळल्याचे सांगत संबंधित शेत जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत असल्याचे जाहीर केले. एनएचएच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.

भरतवाडा येथील घरांना फटकारिंग रोडच्या जुन्या नकाशानुसार भरतवाडा गावाला कुठल्याही प्रकारचे नकसान होत नव्हते. मात्र, नकाशात बदल करून आता रस्ताच बदलण्यात आल्यामुळे भरतवाडा गावातील घरांना फटका बसत आहे. नव्या नकाशानुसार रस्ता झाला तर काही घरे तोडावी लागणार आहेत. गावाठाणाची जमीनही जाणार आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा