शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

दाभ्यातील आठ सोसायट्यांमध्ये पाइपलाइन पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:09 AM

- नागरिक पिण्यासाठी आरओ आणि वापरासाठी टँकरच्या पाण्यावरच निर्भर सय्यद मोबीन / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महानगरपालिकेच्या दाभा ...

- नागरिक पिण्यासाठी आरओ आणि वापरासाठी टँकरच्या पाण्यावरच निर्भर

सय्यद मोबीन / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महानगरपालिकेच्या दाभा येथील प्रभाग क्रमांक १२ मधील आठ सोसायट्यांमध्ये अजूनही पाइपलाइन पोहोचली नसल्याने, नागरिकांना पिण्यासाठी आरओ आणि वापरासाठी टँकरवर विसंबून राहावे लागत आहे.

हे क्षेत्र मनपाच्या अखत्यारित येण्याला बराच काळ लोटला आहे. मनपा क्षेत्रातील नव्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभांच्या निर्मितीसह पाइपलाइन टाकण्याची जबाबदारी अमृत योजनेंतर्गत वेपकॉस नामक एका खासगी कंपनीला देण्यात आली आहे. कंपनीकडून ही कामे २०२० पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते, परंतु २०२१चे सहा महिने लोटल्यानंतरही काम झालेले नाही. विशेष म्हणजे, नगरसेवकांनीही कंपनीकडून विश्वासपूर्ण कामे केली जात नसल्याच्या तक्रारी होत्या. यावर आठ महिन्यांपूर्वी महापौर दयाशंकर तिवारी यांनी कंपनीला संबंधित क्षेत्रातील नगरसेवकांसोबत समन्वय साधण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अजूनही कंपनी आपल्या जुन्याच वृत्तीने काम करत असल्याचा आरोप नगरसेवकांचा आहे.

फॉलोअप घेत आहे

अमृत योजनेंतर्गत २०२० पर्यंत दाभा क्षेत्रातील ११ सोसायट्यामध्ये पाइपलाइन पोहोचणे गरजेचे होते. दरम्यान, सतत संपर्क साधत डीपीडीसीअंतर्गत गुरुदत्त सोसायटी, संत ताजुद्दीन सोसायटी, मेट्रो ऑरेंज सिटी सोसायटीमध्ये पाइपलाइन टाकण्यात आली. उर्वरित आठ सोसायट्यांमध्ये पाइपलाइनचे काम झाले नाही. सुखसागर सोसायटीमध्ये जलकुंभाचे काम अत्यंत मंद वेगाने सुरू आहे. सर्वच सोसायटींमध्ये पाइपलाइन टाकली जावी, यासाठी सातत्याने फाॅलोअप घेत आहे.

- दर्शन स्वानंद धवड़, नगरसेविका, प्रभाग क्रमांक १२

या सोसायट्यांमध्ये पाइपलाइन पोहोचली नाही

दाभा येथील सुखसागर सोसायटी, नागपूर विजय सोसायटी, वैष्णव माता कॉलनी, आकांक्षी सोसायटी, नीता हाउसिंग सोसायटी, मेट्रो सिटी सोसायटी आदींमध्ये पाइपलाइन अजूनही टाकण्यात आलेली नाही.

आरोग्यावर पडतोय प्रभाव

पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने अनेक नागरिकांना आरओचे पाणी पिणे आता सवयीचा भाग झाला आहे. मात्र, सामान्य पाणी प्यायल्यावर त्यांची प्रकृती ढासळत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

..............